एक्स्प्लोर

उजनी धरणातून विसर्ग वाढणार? सीना व भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कतेच्या सूचना 

solapur News Update : उजनी धरणात आज दुपारी एक वाजता उपयुक्त पाणीसाठा 108.08 टक्के इतका झाला आहे. सद्यस्थितीत दौंड येथील भीमा नदीवरील सरीता मापन केंद्राच्या खालील बाजूस उजनी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उजनी धरणातून (Ujani Dam) विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीना आणि भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 

उजनी धरणात आज दुपारी एक वाजता उपयुक्त पाणीसाठा 108.08 टक्के इतका झाला आहे. सद्यस्थितीत दौंड येथील भीमा नदीवरील सरीता मापन केंद्राच्या खालील बाजूस उजनी धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा आणि सीना नदीमध्ये विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग वाढला तर  पुरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्यामध्ये लवकरच मोठया प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीमध्ये उजनी धरणाच्या सांडव्यावरून भिमा नदीमध्ये 50000 क्युसेक्सने विसर्ग चालू असून आज दुपारी दोन वाजता उजनी धरण सांडव्यावरून भिमा नदीमधील विसर्गामध्ये वाढ करून 60000 क्यूसेक्सने विसर्ग करणेत आलेला आहे. त्यामुळे नदीतील एकूण विसर्ग सांडवा 60000 क्यूसेक्स व विद्युत गृह 1600 क्यूसेक्स असा एकूण 61600 क्यूसेक्स विसर्ग भीमा नदीमध्ये राहणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवक नुसार विसर्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून आव्हान
संभाव्य हानी टाळण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. तरी सिना व भिमा नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सतर्क राहावे. संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावे. तसेच मोठ्या प्रमाणात सोडलेल्या विसर्गांमुळे नदी, नाले, ओढे यावर असलेल्या पुलावरील गार्ड स्टोनवरून पाणी वहात असल्यास कोणत्याही नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

पंढरपूर प्रशासन सतर्क 

भीमा नदीत सध्या उजनी धरणातून 60 हजार क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. उजणीत पाणीसाठी वाढत असल्यामुळे पंढरपू प्रशासन देखील सतर्क झालं आहे. कारण चंद्रभागा नदीला देखील पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीत 85 हजार क्युसेकचा विसर्ग पोहोचल्यानंतर परिस्थिती अवघड बनण्यास सुरुवात होणार आहे. चंद्रभागेत 1 लाख 10 हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी आल्यास शहरातील व्यास नारायण मंदिर, बडवे चर याठिकाणी पाणी शिरण्यास सुरुवात होते. यासोबतच सरकोली, पटवर्धन कुरोली, उंबरे पागे यासारख्या ग्रामीण भागातील 8 गावात देखील पाणी शिरण्यास सुरुवात होते. दरम्यान, पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या उजव्या काठावर 13 तर डाव्या तीरावर 28 गावे आहेत. याशिवाय ओढे आणि नाल्यात हे नदीचे पाणी शिरुन धोका होणारी काही गावे असून, एकूण 46 गावांना पुराचा धोका संभवू शकतो.  

 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
राक्षसी वृत्तीचा कारभार, फडणवीसांचं सरकार आपटावंच लागेल; जरांगे पाटलांचा हल्लाबोल, बंगालच्या निकालावरही संशय
Pandharpur : पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात, समर्थक-विरोधक आमनेसामने
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव अन् सोलापूरसाठी विशेष मंजुरी
Solapur Crime Balasaheb Sarvade Case: मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे प्रकरणात मोठी अपडेट, नगरसेविका शालन शिंदेचा जामीन अर्ज फेटाळला; कोर्टात नेमकं काय घडलं?
मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे प्रकरणात मोठी अपडेट, नगरसेविका शालन शिंदेचा जामीन अर्ज फेटाळला; कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget