एक्स्प्लोर

 आता निवडणूक होवू द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल; अजित पवरांचा भाजपवर निशाणा 

Ajit Pawar :  आता एक निवडणूक होवू द्या, दूध का दूध आणि  पाणी का पाणी होईल. समाज कुणासोबत, मतदार कुणासोबत हे सगळ्यांनाच कळेल. जेवढे पक्ष आहेत त्यांच्यासह जनतेलाही कळेल, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे.

पुणे : लोकशाही सध्या अडचणीत आणलेली आहे.  त्यातून दसऱ्यासारख्या दिवशी काय राजकारण झालं हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे.  आता एक निवडणूक होवू द्या, दूध का दूध आणि  पाणी का पाणी होईल. समाज कुणासोबत, मतदार कुणासोबत हे सगळ्यांनाच कळेल. जेवढे पक्ष आहेत त्यांच्यासह जनतेलाही कळेल, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे. ते बारामतीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटासह भाजपवर टीका केली. शिवाय शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देखील आपली भूमिका मांडली. 

अजित पवार म्हणाले,  "असा निकाल येईल असं वाटलंच होतं.  मागचे निकाल पाहता बैलजोडीच्या वेळी सिंडीकेट-इंडिकेट झालं, त्यावेळी बैलजोडी गोठवून दुसरं चिन्ह दिलं. त्यानंतर गाय वासरु गोठवून पंजा आणि राष्ट्रवादीला घड्याळ ही चिन्ह दिलं. नांगरधारी शेतकरी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे असतील.  जनसंघाचे पणती चिन्ह होतं.  ते जनता पक्षात गेल्यावर नांगरधरी शेतकरी चिन्ह दिलं. नंतर मग कमळ दिलं. अशा घटना मागे झालेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय की शिवसेना हा पक्षच बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने तो अधिकार निवडणूक आयोगाला दिला आणि निवडणूक आयोगाने असा निकाल देवून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचा देखील अजित पवार यांनी समाचार घेतला. फडणवीस यांचं म्हणणं धांदांत खोटं आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.  "राष्ट्रवादी हा एक व्यावसायिक पक्ष आहे, आधी त्यांनी शिवसेनेला पूर्णपणे कमकुवत केले आणि नंतर पक्ष फोडण्यास भाग पाडले. त्यानंतर आता राष्ट्रवादी ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तर भाजप नेते राम कदम यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यावर बारामतीत फटाके फुटत आहेत असं राम कदम यांनी म्हटलं होतं.  

विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले,  कुणाच्याही आलतूफालतू आरोपाला उत्तर द्यायला मी काही बांधिल नाही. महागाईचा मुद्दा बाजूला ठेवला जातोय. त्यावर काही बोलत नाहीत. बेरोजगारीचा मुद्दा बाजूला ठेवतात. वेदांता प्रकल्प बाहेर गेला त्यावर काही बोललं जात नाहीत.  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी नव नवीन घोषणा करतात आणि जनतेचे लक्ष वळवतात. शेतकऱ्यांना मदत होत नाही याबद्दल ठाम बोलत नाहीत. गॅस दरवाढ, महागाई यावर बोलत नाहीत. 
 
"मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. पण आता अंधेरीत पोटनिवडणूक होतेय, त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिलाय. त्याला आम्ही पाठिंबा दिलाय. कॉंग्रेसही त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. त्यातून मुंबईतली जनता ठरवेल.  
 हे जे काही सुरु आहे ते बरोबर नाही. संविधान मानायचं नाही. कायदे नियम पायदळी तुडवायचे. फोडाफोडी, तोडातोडी हे बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले.  
 
अजित पवार म्हणाले, "2024 उजाडू द्या. त्यावेळी निवडणुका लागल्यानंतर कळेल. मात्र 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो होता. निवडणूक काळातील शिवसेना उमेदवारांचे पोस्टर मी पाहिलेत. त्यावर दोघांचेही फोटो होते. ते शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार होते. त्यामुळे त्यामध्ये मोदींचाही फोटो होता. आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भूमिका मांडणार.  त्यातून फार काही मिळू शकत नाही. पण आता होणाऱ्या पोटनिवडणुकीतून कळेल. मुंबईत होणाऱ्या पोटनिवडणुकीत आता बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावून निवडणूक होईल. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Embed widget