एक्स्प्लोर

लॉकडाऊनदरम्यान बेरोजगारीची कुऱ्हाड, आयटी कर्मचाऱ्यांची 'जस्टिस फाॅर एम्प्लॉईज' मोहीम

लॉकडाऊनच्या काळात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांच्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ‘जस्टिस फाॅर एम्प्लॉईज’ ही ऑनलाईन मोहीम सुरु केली आहे.

पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आयटी क्षेत्रही याला अपवाद नाही. लॉकडाऊनच्या काळात आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार कपात आणि नोकरी गमवावी लागण्याच्या जवळपास 68 हजार तक्रारी आल्याचं नॅशनल इन्फर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉईज सीनेटकडून सांगण्यात आलं. या संघटनेचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी ही माहिती दिली.

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी 'जस्टिस फॉर एम्प्लॉईज' ही ऑनलाईन मोहीम सुरु केली आहे. गेल्या महिनाभरापासून या मोहीमेच्या माध्यमातून आयटी कर्मचारी त्यांचा आवाज उठवत आहेत. #justiceforemployees वापरुन ते आपले अनुभव सांगत आहेत.

हरप्रीत सलुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जवळपास 6 लाख आयटी कर्मचारी आहेत. यातील जवळपास 4 लाख पुणे आणि परिसरात आहेत. साडेतीन ते चार हजार कर्मचाऱ्यांनी नोकरी गेल्याची तक्रार या संघटनेकडे नोंदवली आहे. इतरांनी पगार कपात, पेड लिव्ह रद्द करणे यासारख्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यामुळे आपल्याला न्याय मिळावा अशी अपेक्षा हे आयटी कर्मचारी करत आहेत.

केंद्र सरकारचा यू टर्न, लॉकडाऊनमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचा आदेश मागे

सुरुवातीला ही मोहीम महाराष्ट्रात सुरु केली होती. त्यानंतर दिल्ली, गुरुग्राम, चेन्नई, हैदराबादमधील कर्मचारीही या मोहीमेत सामील झाले. आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार कर्मचारी या मोहीमेद्वारे समोर आल्याचं हरप्रीत सलुजा म्हणाले.

"नॅशनल इन्फर्मेशन टेक्नोलॉजी एम्प्लॉईज सीनेटकडून संपूर्ण महाराष्ट्रातून 68 हजार तक्रारी कामगार आयुक्त कार्यालयात दाखल केल्या आहेत. या तक्रारीवरीन मुंबई-पुण्यातील कार्यालयांनी कंपन्यांना नोटीसही पाठवली आहे. पण त्याचंही उल्लंघन झालं आणि कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आलं. सरकारकडून मार्च महिन्यात जीआर जारी करुन सर्व कंपन्यांना निर्देश देण्यात आले होते की, कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढू नये किंवा त्यांच्या पगारात कपात करु नये. परंतु या जीआरचं उल्लंघन करत मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं तसंच पगारातही कपात केली," असं हरप्रीत सलुजा यांनी सांगितलं.

मध्यंतरीच्या काळात सरकारने हा जीआर मागे घेतला. याबाबत हरप्रीस सलुजा म्हणाले की, "29 मार्च रोजीचा जीआर आणि त्यानंतर आदेश मागे घेतलेला दिवस यांच्यामध्ये 45 दिवसांचं अंतर होतं. त्यामुळे या 45 दिवसांसाठी सरकारच्या जीआरमधील निर्देश वैध आहेत. सुप्रीम कोर्ट यावर 12 जून म्हणजेच आज निर्णय देणार आहे. या निकालाकडून आम्हाला मोठी अपेक्षा  आहे."

Justice for Employees | आयटी कर्मचाऱ्यांची 'जस्टिस फाॅर एम्प्लॉईज' ऑनलाईन मोहीम

महत्त्वाच्या बातम्या

Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Sharad Pawar : इकडे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय उडवून लावला, तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत बोलावलं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
इकडे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय उडवून लावला, तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत बोलावलं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Sharad Pawar on NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य, थेट उडवूनच लावलं, म्हणाले....
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य, थेट उडवूनच लावलं, म्हणाले....

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Embed widget