एक्स्प्लोर

Nanded Rain : तीन दिवसानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांपुढं पिकं वाचवण्याचं संकट

गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात तब्बल दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसानं थोडी उसंत घेतली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे उरकून घेण्यास थोडीफार सवड मिळाली होती. गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. या जोरदार पावसामुळं शेतात व रस्त्यावर सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे. या सततच्या पावसामुळं पिकं वाचवण्याचं मोठं संकट शेतकऱ्यांपुढं उभं राहिलं आहे. 

नांदेड जिल्ह्यातील 36 प्रकल्प तुडुंब

दरम्यान, जूनमध्ये पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसानं चांगलाच दोर धरला आहे. या महिन्याच्या सुरुवातीस झालेला पाऊस इतका बरसला की चार महिन्यामध्ये होणारी पावसाची सरासरी दोनच महिन्यात पूर्ण झाली. ज्यामुळं विष्णुपुरी प्रकल्पासह जिल्ह्यातील 36 प्रकल्प तुडुंब भरले आहेत. मात्र, या पावसामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यानंतर पावसानं उघडीप घेत थोडी उसंत घेतली होती. ज्यामुळं शेतात व पिकांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होईल असे वाटले होते. तर दुसरीकडं प्रशासनाकडून आता कुठे पंचनामे करण्यास सुरुवात झाली होती. ज्यामुळं शेतकऱ्यांना थोडीफार का होईना मदत मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तीन दिवसांची उघडीप झाल्यानंतर रात्रीपासून जिल्हाभरात पुन्हा पावसानं जोर धरला आहे.


Nanded Rain : तीन दिवसानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांपुढं पिकं वाचवण्याचं संकट

रस्त्यावरही पाणी 

रात्रीपासून नांदेड जिल्हा आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शहरात पाणीच पाणी झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतात पाणी साचलं आहे. शहरातील रस्त्यावर देखील पाणीच साचलं असून, वाहतुकीवर परिणाम होत आहे. दरम्यान, शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळो, पण पुराच्या पाण्याच्या तडाख्यात वाचलेली ही पिके पुन्हा या पावसाच्या जोरात वाचतील की जातील? हा प्रश्न मात्र शेतकऱ्यांना भेडसावत आहे.


Nanded Rain : तीन दिवसानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, शेतकऱ्यांपुढं पिकं वाचवण्याचं संकट

आजपासून चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्यामुळं शेती  पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळं पूरस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अशातच, आजपासून चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना खरबदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच, नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका सुरुच,नामांकित खासगी बँकेला दणका, तब्बल 62 लाखांचा दंड, कारण समोर
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
आता केवळ मोठ्या पडद्यावरच नाही, टेलिव्हिजनवरही खिलाडी कुमारची जादू; 'या' फेमस रिअॅलिटी शोमधून सर्वांना बनवणार करोडपती
Team India Squad Against New Zealand: रिंकू सिंग, इशान किशान IN, शुभमन गिल, जितेश शर्मा OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
रिंकू, इशान IN, शुभमन, जितेश OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Embed widget