एक्स्प्लोर

..तर, 'पाणी' पेट्रोल-डिझेल सारखं विकत घ्यावं लागेल!

जल शक्ती मंत्रालयाला संसदेत काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांच्या उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जल शक्ती मंत्रालयाने दिलेली ही आकडेवारी नक्कीच चिंतेचा विषय आहे.

मुंबई : देशातील सर्व नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. दरडोई पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. संसदेत जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील 20 वर्षांची यात आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, मागील 5 वर्षात दरडोई उपलब्ध असणाऱ्या पाण्याचं प्रमाण वेगाने घटलं आहे. हे असंच सुरु राहिलं तर एक दिवस पेट्रोल-डिझेल सारखं पाणी विकत घ्यावं लागणार आहे. संसदेत जलशक्ती मंत्रालयाला काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांच्या उत्तरातून प्रत्येक भारतीयाला विचार करायला भाग पडेल, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये दरडोई पाण्याची उपलब्धता - गेल्या वीस वर्षांमध्ये दरडोई पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यात मागील 5 वर्षांत याचा वेग अधिक होता. वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस होणारा पाण्याचा बेमुसार उपसा यामुळे भूजलपातळी कमी होत चालली आहे. परिणामी, 2001 साली दरडोई पाण्याची उपलब्धता वर्षाला 18 लाख 16 हजार लिटर इतकी होती. जी 2011 मध्ये 15 लाख 45 हजार लिटरवर घसरली. येणाऱ्या 2021 सालात हे प्रमाण 14 लाख 86 हजार लिटर इतके होणार आहे. तर, आगामी 2021, 2031, 2041 आणि 2051 या वर्षांत पाण्याची उपलब्धता अनुक्रमे 1486 क्यूबिक मीटर, 1367 क्यूबिक मीटर, 1282 क्यूबिक मीटर आणि 1228 क्यूबिक मीटर कमी होऊ शकते. विविध कामांसाठी ताज्या पाण्याची मागणी सातत्याने वाढणे, औद्योगिकीकरण, नागरीकरण, कमी पाऊस इत्यादी कारणांमुळे देशाच्या भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. केंद्रीय भूजल मंडळ(सीजीडब्ल्यूबी)देशभरात भूगर्भातील पाणी पातळीचा अभ्यास करत आहे. यात ते ग्रामीण भागापासून चेन्नई, बंगळुरु सारख्या मोठ्या शहरांचाही समावेश आहे. भूगर्भ पाणी पातळीच्या आकलनासाठी चालू वर्षीची माहितीची तुलना मागील 10 वर्षांशी केली जाते. यातून जवळपास 66 टक्के विहिरींची भूगर्भातील पाण्याची पातळी 0 ते 2 मीटरपर्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील मुंबई उपनगर, दिल्ली, हैदराबाद, नाशिक, पुणे, इंदूर, ग्वालियर, गुवाहाटी, लुधियाना, अमृतसर, फरीदाबाद, वडोदरा, जयपूर, भुवनेश्वर, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ आणि मेरठ, या शहरांमध्ये ही घट 4 मीटर इतकी आढळून आली आहे. पाणी हा राज्याचा विषय - पाणी हा राज्याच्या अखत्यारित येत असल्याने राज्यानेच यावर ठोस पावले उचलायला हवी असल्याचे जल शक्ती मंत्रालयाने म्हटलं आहे. तर, केंद्र सरकार विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्य सरकारला यात हातभार लावणार आहे. यासाठी जलशक्ती मंत्रालयाने जलसंधारण आणि जल सुरक्षा अभियान सुरु केले आहे. या मोहिमेदरम्यान, सरकारी अधिकारी, भूजल तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापनासाठी देशातील दुष्काळी भागात राज्य आणि जिल्ह्यातील प्रशासनासोबत काम करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जलशक्ती मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व पाणीपुरवठा राज्य मंत्र्यांची 11 जून 2019 ला बैठक घेण्यात आली. यात जलसंधारणाबाबत विविध राज्यांनी केलेली कामे व पाणीपुरवठा परिस्थितीशी सामना करण्यासाठी कृती योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारांना जलसंधारण उपाययोजना पूर्ण करण्यासाठी विनंती करण्यात आली. भूजल पातळी वाढवण्यासाठी केंद्राचा मास्टर प्लॅन - भूजल पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे. यात देशभरात 1.11 कोटी वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारण्याची योजना आहे. ही योजना राबवण्यासाठी सर्व राज्यांना माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये अटल मिशन अंतर्गत देशातील 500 शहरं 5 वर्षांच्या कालवधी निवडली आहेत. यात पाणी पुरवठ्यापासून पावसाचे पाणी जिरवण्यापर्यंत योजना राबवण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून मोठ्या शहरांमध्ये पाणी संकट आ वासून उभं आहे. चेन्नई आणि बंगळुरु ही त्याची उदाहरणं आहेत. हेच पाणी संकट इतर शहरातही काही वर्षांत सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळं वेळीच पावले उचलली नाहीत तर, आगामी काळात पाण्यावरुन संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या : NASA : गुरुच्या चंद्रावर बर्फाचे बाष्प, 'युरोपा'वर पाणी असल्याची 'नासा'ची माहिती मुंबईतलं पिण्याचं पाणी सर्वात शुद्ध, तर दिल्लीतील पाणी सर्वात अशुद्ध Water Issue in Nashik | नाशिककरांच्या पाणीवापरात दरडोई 15 लिटरने कपात होण्याची शक्यता | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Panse: 'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल
'मिसिंग लिंक इज Missing'; वाहतूक कोंडीत अडकलेल्या अभिजीत पानसेंचा व्हिडीओ व्हायरल
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याची चर्चा, रक्त धुतानाचा व्हिडीओ कुठून आला? पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं, म्हणाले...
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैलाचा बळी दिल्याची चर्चा, रक्त धुतानाचा व्हिडीओ कुठून आला? पोलिसांनी वृत्त फेटाळून लावलं, म्हणाले...
Mumbai BJP News :....तर निधी देताना विचार केला जाईल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचा नगरसेवकांना सज्जड दम, महापालिकेतील अनुपस्थितीवरून सुनावलं!
....तर निधी देताना विचार केला जाईल; मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा नगरसेवकांना सज्जड दम, महापालिकेतील अनुपस्थितीवरून सुनावलं!

व्हिडीओ

Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली
भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
Crime News: दोन लेकींची लग्नं केली, कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरात डल्ला मारला! आता रवानगी थेट जेलमध्ये
दोन लेकींची लग्नं केली, कर्ज फेडण्यासाठी सासूने चक्क मोठ्या जावयाच्या घरात डल्ला मारला! आता रवानगी थेट जेलमध्ये
Sunetra Pawar Nasrapur : सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन
सुनेत्रा पवार नसरापुरात, पीडित मुलीच्या घरातून मुख्यमंत्र्यांना फोन, आरोपीला कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन
Kalyan APMC : मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
मुंबईतील मृत्यूचा परिणाम! कल्याण APMC मध्ये 12 ट्रक कलिंगड पडून, ग्राहकांची पाठ; शेतकरी-विक्रेते हवालदिल
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Gokul Election: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Video: 'ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन...' हसन मुश्रीफांचे आरोपांच्या फैरी झाडलेल्या आमदार शिवाजी पाटलांना ओपन चॅलेंज
Embed widget