एक्स्प्लोर

..तर, 'पाणी' पेट्रोल-डिझेल सारखं विकत घ्यावं लागेल!

जल शक्ती मंत्रालयाला संसदेत काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांच्या उत्तरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जल शक्ती मंत्रालयाने दिलेली ही आकडेवारी नक्कीच चिंतेचा विषय आहे.

मुंबई : देशातील सर्व नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. दरडोई पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घटत चालली आहे. संसदेत जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील 20 वर्षांची यात आकडेवारी दिली आहे. त्यानुसार, मागील 5 वर्षात दरडोई उपलब्ध असणाऱ्या पाण्याचं प्रमाण वेगाने घटलं आहे. हे असंच सुरु राहिलं तर एक दिवस पेट्रोल-डिझेल सारखं पाणी विकत घ्यावं लागणार आहे. संसदेत जलशक्ती मंत्रालयाला काही प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांच्या उत्तरातून प्रत्येक भारतीयाला विचार करायला भाग पडेल, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये दरडोई पाण्याची उपलब्धता - गेल्या वीस वर्षांमध्ये दरडोई पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यात मागील 5 वर्षांत याचा वेग अधिक होता. वाढती लोकसंख्या आणि दिवसेंदिवस होणारा पाण्याचा बेमुसार उपसा यामुळे भूजलपातळी कमी होत चालली आहे. परिणामी, 2001 साली दरडोई पाण्याची उपलब्धता वर्षाला 18 लाख 16 हजार लिटर इतकी होती. जी 2011 मध्ये 15 लाख 45 हजार लिटरवर घसरली. येणाऱ्या 2021 सालात हे प्रमाण 14 लाख 86 हजार लिटर इतके होणार आहे. तर, आगामी 2021, 2031, 2041 आणि 2051 या वर्षांत पाण्याची उपलब्धता अनुक्रमे 1486 क्यूबिक मीटर, 1367 क्यूबिक मीटर, 1282 क्यूबिक मीटर आणि 1228 क्यूबिक मीटर कमी होऊ शकते. विविध कामांसाठी ताज्या पाण्याची मागणी सातत्याने वाढणे, औद्योगिकीकरण, नागरीकरण, कमी पाऊस इत्यादी कारणांमुळे देशाच्या भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. केंद्रीय भूजल मंडळ(सीजीडब्ल्यूबी)देशभरात भूगर्भातील पाणी पातळीचा अभ्यास करत आहे. यात ते ग्रामीण भागापासून चेन्नई, बंगळुरु सारख्या मोठ्या शहरांचाही समावेश आहे. भूगर्भ पाणी पातळीच्या आकलनासाठी चालू वर्षीची माहितीची तुलना मागील 10 वर्षांशी केली जाते. यातून जवळपास 66 टक्के विहिरींची भूगर्भातील पाण्याची पातळी 0 ते 2 मीटरपर्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील मुंबई उपनगर, दिल्ली, हैदराबाद, नाशिक, पुणे, इंदूर, ग्वालियर, गुवाहाटी, लुधियाना, अमृतसर, फरीदाबाद, वडोदरा, जयपूर, भुवनेश्वर, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ आणि मेरठ, या शहरांमध्ये ही घट 4 मीटर इतकी आढळून आली आहे. पाणी हा राज्याचा विषय - पाणी हा राज्याच्या अखत्यारित येत असल्याने राज्यानेच यावर ठोस पावले उचलायला हवी असल्याचे जल शक्ती मंत्रालयाने म्हटलं आहे. तर, केंद्र सरकार विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्य सरकारला यात हातभार लावणार आहे. यासाठी जलशक्ती मंत्रालयाने जलसंधारण आणि जल सुरक्षा अभियान सुरु केले आहे. या मोहिमेदरम्यान, सरकारी अधिकारी, भूजल तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापनासाठी देशातील दुष्काळी भागात राज्य आणि जिल्ह्यातील प्रशासनासोबत काम करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जलशक्ती मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा व पाणीपुरवठा राज्य मंत्र्यांची 11 जून 2019 ला बैठक घेण्यात आली. यात जलसंधारणाबाबत विविध राज्यांनी केलेली कामे व पाणीपुरवठा परिस्थितीशी सामना करण्यासाठी कृती योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य सरकारांना जलसंधारण उपाययोजना पूर्ण करण्यासाठी विनंती करण्यात आली. भूजल पातळी वाढवण्यासाठी केंद्राचा मास्टर प्लॅन - भूजल पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मास्टर प्लॅन तयार केला आहे. यात देशभरात 1.11 कोटी वॉटर हार्वेस्टींग प्रकल्प उभारण्याची योजना आहे. ही योजना राबवण्यासाठी सर्व राज्यांना माहिती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2015 मध्ये अटल मिशन अंतर्गत देशातील 500 शहरं 5 वर्षांच्या कालवधी निवडली आहेत. यात पाणी पुरवठ्यापासून पावसाचे पाणी जिरवण्यापर्यंत योजना राबवण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून मोठ्या शहरांमध्ये पाणी संकट आ वासून उभं आहे. चेन्नई आणि बंगळुरु ही त्याची उदाहरणं आहेत. हेच पाणी संकट इतर शहरातही काही वर्षांत सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळं वेळीच पावले उचलली नाहीत तर, आगामी काळात पाण्यावरुन संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या : NASA : गुरुच्या चंद्रावर बर्फाचे बाष्प, 'युरोपा'वर पाणी असल्याची 'नासा'ची माहिती मुंबईतलं पिण्याचं पाणी सर्वात शुद्ध, तर दिल्लीतील पाणी सर्वात अशुद्ध Water Issue in Nashik | नाशिककरांच्या पाणीवापरात दरडोई 15 लिटरने कपात होण्याची शक्यता | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

TET Paper Leak : टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
MSRTC Update : ST तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार! परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम
ST तोट्यात गेल्यास थेट नोकरी जाणार! परिवहन मंत्र्यांनी दिला कामचुकार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम
Maharashtra Live Breaking News Updates: TET पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयासमोर आंदोलन
Maharashtra Live Breaking News Updates: TET पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयासमोर आंदोलन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना अटक, दीड कोटींचा व्यवहार; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
Crime : चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
सूडाची भावना की दहशतवादी कट? आरोपीने मुंबईतच 15,000 लोकांसाठी बनवल्या विषारी गोळ्या; 4 जुलैंपर्यंत कोठडी
Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?
Rule Change : 1 जुलैपासून कोणते नियम बदलणार? आयटीआर फायलिंग ते आधार कार्डमध्ये ईमेल अपडेट, जाणून घ्या सविस्तर
आधार कार्ड अपडेट,क्रेडिड कार्ड ते पासपोर्ट, 1 जुलैपास कोणते नियम बदलणार? जाणून घ्या
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
माझी कटिबद्धता संविधानाशी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझे मार्गदर्शक; विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण
Embed widget