एक्स्प्लोर

मुंबईतलं पिण्याचं पाणी सर्वात शुद्ध, तर दिल्लीतील पाणी सर्वात अशुद्ध

पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेबाबत देशभरातून खास करुन देशाची राजधानी दिल्लीतून अधिक तक्रारी येत होत्या. त्यामुळे नळाला येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत बीआयएसने (द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड) पडताळणी केली.

मुंबई : देशभरातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत नेहमी चर्चा होत असते. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत अनेकदा शंका व्यक्त केली जाते. मात्र मुंबईतील पाणी पिण्यासाठी सर्वात शुद्ध असल्याचं विविध चाचण्यांमध्ये सिद्ध झालं आहे. पिण्याच्या पाण्याबाबत इंडियन स्टँडर्ड ब्युरोकडून करण्यात आलेल्या चाचणीनंतर मुंबईतील पाणी हे 20 शहरांच्या रँकिंगमध्ये शुद्धतेच्या तुलनेत अव्वल क्रमांकावर आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईचं पाणी पिण्यासाठी आधिक योग्य असल्याचं रँकिंगमध्ये समोर आलं आहे.

देशभरातून पिण्याच्या पाण्याच्या समस्या समोर येत असताना द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (BIS) ने प्रमुख 20 शहरांच्या पिण्याच्या पाण्याची चाचणी करण्याचं ठरवलं. या शहरांमधील पाण्याच्या चाचण्याचा अहवाल आता समोर आला आहे. याबाबत आज केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

पिण्याच्या पाण्याच्या अशुद्धतेबाबत देशभरातून खास करुन देशाची राजधानी दिल्लीतून अधिक तक्रारी येत होत्या. त्यामुळे नळाला येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत बीआयएसने पडताळणी केली. विविध 10 निकषांवर ही पडताळणी करण्यात आली. यामध्ये देशातील विविध 20 राज्यांचा राजधानींचा यामध्ये समावेश होता. गांधीनगर, मुंबई, दिल्ली, पाटणा, कोलकाता, हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांचा यामध्ये समावेश होता. जम्मू काश्मीर आणि उत्तर पूर्व भारत सोडून महत्वाच्या सर्वच शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची पडताळणी करण्यात आली.

यामध्ये मुंबईत सर्वात शुद्ध पाणी नळाद्वारे येत असल्याच अहवालात समोर आलं आहे. तर विकसित राज्य असलेल्या गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये नळाद्वारे येत असलेलं पाणीही अशुद्ध असल्याचे समोर आलं आहे. त्या खालोखाल पाटणामध्ये उपलब्ध असलेलं मातीमिश्रित पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. देशात प्रत्येक घरात 2024 पर्यत पिण्याच्या नळाद्वारे शुद्ध , स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

शुद्ध पाण्याच्या बाबतीत कुठलं शहर कोणत्या स्थानावर?

1. मुंबई 2 हैदराबाद 3. भुवनेश्वर 4. रांची 5. रायपूर 6. अमरावती 7. शिमला 8. चंदीगढ 9. त्रिवेंद्रम 10. पाटणा 11. भोपाळ 12. गुवाहाटी 13. बंगळुरु 14. गांधीनगर 15. लखनौ 16 जम्मू 17. जयपूर 18. देहरादून 19. चेन्नई 20. कोलकाता 21. दिल्ली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
Karnataka Politics : मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला
मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला
Pinarayi Vijayan ED Raid: केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
केरळचे माजी सीएम पी. विजयन यांच्यावर ईडीची छापेमारी; समर्थकांचा ईडीच्या पथकावर हल्ला, कारवर वीटा फेकल्या
42 तरुण मुंडावळ्या बांधून बोहल्यावर बसले; वऱ्हाडी लग्नमंडपात वाटच पाहत राहिले, पण नवरीचा पत्ताच नाही; सत्य समजताच साऱ्यांनाच धक्का; देवास हादरलं!
42 तरुण मुंडावळ्या बांधून बोहल्यावर बसले; वऱ्हाडी लग्नमंडपात वाटच पाहत राहिले, पण नवरीचा पत्ताच नाही; सत्य समजताच साऱ्यांनाच धक्का; देवास हादरलं!

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
Khadi India : ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
ऑनलाईन शॉपिंगसाठी आता सरकारी वेबसाईट, हायटेक ई-कॉमर्स पोर्टल लवकरच लॉन्च
Embed widget