एक्स्प्लोर

sanjay Raut : अच्छे दिन हे एप्रिल फुलच, गेल्या 7 वर्षापासून लोक 15 लाख रुपयांची वाट बघतायेत, राऊतांचा भाजपला टोला

पाच राज्याच्या निवडणुकीत सरकारने जनतेला एप्रिल फुल केलं आहे. अच्छे दिन हे एप्रिल फुलच असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

Sanjay Raut : राज्यकर्ते या देशातील जनतेला नेहमीच एप्रिल फुल करत असतात. महागाई वाढली, इंधनाच्या किंमती वाढल्या, जनतेचे प्रश्न सोडवण्याठी काही केलं जात नाही. वर्षानुवर्ष झालं एप्रिल फुल सुरु असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. पाच राज्याच्या निवडणुकीत सरकारने जनतेला एप्रिल फुल केलं आहे. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील म्हणून लोक गेल्या 7 वर्षापासून वाट बघतायेत, पण हे एप्रिल फुल असल्याचे म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा लगावला. 

एप्रिल फुल हा गंमतीचा विषय राहिला नसून, हा जनतेच्या जगण्या मरण्याचा प्रश्न झाला आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सरकारने जनतेशी बांधिलकी ठेवली पाहिजे, थापा मारणे, फसवा फसवी बंद केली पाहिजे. लोकांच्या जगण्या मरण्याचे प्रश्न गंभीर होत चालले असल्याचे राऊत म्हणाले. अच्छे दिन हे एप्रिल फुलच आहे असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील याची लोक 7 वर्षापासून वाट बघतायेत असेही राऊत म्हणाले. 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार हे एप्रिल फुलच, पाकव्याप्त कश्मीर हे हिंदुस्थानमध्ये येणार हे एप्रिल फुलच आहे. महाराष्ट्र किंवा देशात सुडाचे राजकारण करत नाही असे सांगणे हे एप्रिल फुलच असल्याचे राऊत म्हणाले. एप्रिल फुलची मालिका गेल्या अनेक वर्षापासून सुरु असल्याचे राऊत म्हणाले.

नागपूरचे वकिल सतीश उके यांच्यावर जी ईडीने कारवाई केली, त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. सतीश उके यांचे काही अपराध असतील, त्यांनी व्यवहार चुकीचे केले असतील, जमीन बळकावली असेल, धमकी दिली असेल तर महाराष्ट्राचे पोलीस तपास करतील. ईडीने येऊन तपास करावा, कारवाई करावी असा गुन्हा नसल्याचे राऊत म्हणाले. कोणत्याही राज्याचे पोलीस अशा प्रकारचा तपास करण्यास सक्षम असतात. त्यांच्या कुटुंबानी कोणाला धमक्या दिल्या असतील, खोट्या तक्रारी दिल्या असतील तर पोलीस तपास करतील. त्यासाठी ईडी आणि सीबीआयने यायची गरज नाही. त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी आणले जात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राज्यातील  गृहखात्याने अधिक कठोर होण गरजेचं असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

नवीन वर्ष सुरु होत आहे. हे वर्ष सर्वांसाठी तणावमुक्त जावो. सुखाचे भरभराटीचे जावो असी शिवसेनेची संकल्पना आहे. महाराष्ट्राचीही भरभराटी होवो. महाराष्ट्रावरती भविष्यात हिंदुत्वाचा भगवा झेंडा (महाविकास आघाडीचा) फडकत राहो, यासाठी आम्ही काम करत राहू असेही राऊत यावेळी म्हणाले. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
बसला ओव्हरटेक करताना रिक्षाचा भीषण अपघात, मुंबईतील दहिसरमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai Goa Highway : 31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
31 मे ची डेडलाईन देऊन गडकरी फसले! मुंबई-गोवा महामार्गाचं काम अजूनही अपूर्णच; टोल वसुलीमुळे कोकणवासीयांचा संताप उफाळला
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 
गडचिरोलीतील मायनिंग प्रकल्पाला आमचा विरोध, वन्यजीव संरक्षण नियम मोडून जंगल कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातली जातायेत, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget