एक्स्प्लोर

Mumbai Unlock : मुंबईत सायंकाळी 5 वाजल्यानंतर जमावबंदी आणि संचारबंदी कायम: महापौर किशोरी पेडणेकर

नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली असली तरीही नागरिकांना सतर्क राहतण्याचं आवाहन

Mumbai Unlock : कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाऊननंतर राज्यात बऱ्याच दिवसांनंतर अनलॉकचे नियम सुरु झाले. या नियमांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक शहरांमध्ये दुकानं सुरुही करण्यात आली. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आलेली असली तरीही नागरिकांना सतर्क राहतण्याचं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी केलं. 

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही गोष्टी जाणीवपूर्वक स्पष्ट केल्या. दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आलेली असली तरीही दुकानांतील कामगार 4 वाजेपर्यंतच काम करतील. सायंकाळी 5 वाजल्याच्यानंतर शहरात जमावबंदी आणि संचारबंदी सुरुच असेल. याशिवाय सलून, पार्लर आणि स्पा दुपारी 4 वाजेपर्यंत एसीचा वापर न करता सुरु राहतील. या ठिकाणी एसी सुरु असल्याचं निदर्शनास आल्यास सदर आस्थापनाच्या मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.

Accident : बंधाऱ्यात वाहून जाणाऱ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी एकजण वाहून गेला आणि... 

मुंबईतील प्रवासाबाबत काय म्हणाल्या महापौर ?  
मुंबईच्या लोकल वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांसाठीच सुरु राहतील. तर बीएसटी बसने मात्र प्रवास करण्याची मुभा नागरिकांना असेल. बीएसटी बसमध्ये फक्त बैठकव्यवस्थेइतकीच प्रवासी संख्या असणार आहे. तर, उभ राहून प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे हे किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. कार्गो वाहनांतील प्रवास हा तीन व्यक्तींपुरताच मर्यादित ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आंतरजिल्हा वाहतुकीसाठी पाचव्या स्तरातून येणाऱ्या वाहनांस प्रवासाची परवानगी नाही ही बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली. 

Coronavirus India: तब्बल 61 दिवसांनंतर देशात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद; जाणून घ्या नेमका आकडा

लॉकडाऊनकडून अनलॉककडे जाताना... 
'लॉकडाऊनच्या नंतर अनलॉकच्या मार्गानं जात असताना काही नियमांचं पालन केलं जाणं गरजेचं आहे. नागरिकांनी इथं सहकार्य करत स्वयंशिस्तीचं पालन करणं अपेक्षित आहे. तरच लॉकडाऊन पूर्णपणे उघडेल आणि परिस्थिती पूर्ववत होईल. कारण, कोविडचं संकट अद्यापही संपलेलं नाही, आपण ते संपुष्टात आणण्याच्या नजीक जात आहोत. पण, त्याआधी जी काळजी घ्यायची आहे ती घेतलीच पाहिजे. यासाठी मास्कचा वापर करणं, हात धुणं, गर्दी टाळणं या नियमांचं पालन केलं जाणं गरजेचं आहे' असं महापौर म्हणाल्या. 

लोकल बंद असल्यामुळे बीएसटीवर ताण
महाराष्ट्रात कोरोना अनलॉकच्या पार्श्वभूमीवर पाच स्तर तयार करण्यात आल्याचं सांगत एसटीच्या प्रवासाला परवानगी दिल्यास पाचव्या स्तरातील ठिकाणहून एसटी आली, तर त्या सुरक्षित भागाला बाधित करु शकतात. एसटी पूर्ण महाराष्ट्रात फिरते. पण, बीएसटी मात्र नवी मुंबई आणि पनवेलपर्यंत जाते, त्यामुळंच सध्या याबाबत अधिक खबरदारी घेतली जात आहे असून, मुंबईत राहून मुंबईच्या लोकांना सुरक्षित ठेवण्याचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय सर्वच महानगरपालिकांनी एकमेकांना सांभाळून घेतल्यास जिल्हा, तालुका आणि शहरांमध्ये कोरोनाला थोपवता येईल असं आवाहनही त्यांनी केलं. 

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असली तरीही आपण मात्र ही तिसरी लाट येऊच नये यासाठी काळजी घेत असल्याचं सांगत त्यांनी यावेळी विरोधकांनाही नालेसफाईच्या मुद्द्यावरुन स्पष्ट उत्तर दिलं. नालेसफाईवरून विरोधकांनी विरोधकांनी चांगलेच आरोप केले आहेत. शिवाय आपणही अधिकाऱ्यांची बैठक बोलावलीच आहे त्यामुळे सदर प्रकरणी कोणी दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणारच, असं त्या म्हणाल्या. 

मान्सूनच्या धर्तीवर पालिका प्रशासन सज्ज 
मान्सूनपर्व तयारीसाठी साथीच्या आजारांचे उपचार, औषधं, चाचण्या करण्यासाठीची खबरदारी, त्यासाठीच्या सूचना, पाणी साचणाऱ्या ठिकाणांमध्ये औषध फवारणी ही सर्व व्यवस्था करण्यात येत असल्याचं महापौरांनी सांगितलं. नागरिकांनी या काळात सतर्कता बाळगत आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी शेवटी केलं. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोण अपात्र ठरणार? 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
Mumbai Rain: मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
मुंबईत मन्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
Dharavi redevelopment BEST Land: मोठी बातमी: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बेस्टच्या दोन आगारांची 11 एकरांची मोक्याची जागा जाणार, मोबदल्यात काय मिळणार?
मोठी बातमी: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बेस्टच्या दोन आगारांची 11 एकरांची मोक्याची जागा जाणार, मोबदल्यात काय मिळणार?
Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोण अपात्र ठरणार? 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Embed widget