एक्स्प्लोर
Advertisement
UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)
मंत्रालय नव्हे उंदरालय, शिवसेनेचं टीकास्त्र
एकनाथ खडसे यांनी मंत्रालायत मोठा उंदीर घोटाळ्याचा दावा केल्यानंतर, आज शिवसेनेने ‘सामना’तून टीकास्त्र सोडलं.
मुंबई: फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच, शिवसेनेनेही आपली टीकेची मालिका कायम ठेवली आहे.
एकनाथ खडसे यांनी मंत्रालायत मोठा उंदीर घोटाळ्याचा दावा केल्यानंतर, आज शिवसेनेने ‘सामना’तून टीकास्त्र सोडलं.
मंत्रालय नाही तर उंदरालय, अशा मथळ्याखाली सामनात अग्रलेख लिहिण्यात आला आहे.
उंदीर घोटाळ्याने सरकारची तिजोरी कुरतडलीच, पण सध्याच्या राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले, अशी घणाघाती टीका सामनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातल्या कथित स्वच्छ प्रशासनाला बिळं पडली आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू उंदरालय झालं आहे. मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे, असे मिश्किल टोमणे सामनातून लागवण्यात आले आहेत.
सामनात नेमकं काय म्हटलंय?
उंदीर घोटाळा हा एक नवीन शब्द यानिमित्ताने शब्दकोशात समाविष्ट झाला आहे. इतरही काही नवी विशेषणे, म्हणी, वाप्रचार प्रचारात येण्याची चिन्हे आहेत. ‘तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ असे म्हणण्याऐवजी भविष्यात ‘तुझ्या उसाला लागंल उंदीर’ असे म्हटले जाईल. ‘कागदी घोडे’ असा शब्द सरकारी कामकाजासंदर्भात वापरला जातो. त्याची जागा ‘कागदी उंदीर’ हा शब्द घेईल.
उंदीर घोटाळय़ाने फक्त सरकारी तिजोरीच कुरतडलेली नाही तर विद्यमान राजवटीच्या पारदर्शक कारभाराचे ढोलही फोडले आहेत, येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन ‘भुसभुशीत’ झाली आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षाचेच लोक करीत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’ झाले आहे. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळय़ाचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण ‘अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता ‘पिंजरा’ लावून बसलीच आहे!
संबंधित बातम्या
मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप
उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
क्राईम
Advertisement