एक्स्प्लोर

मुंबईत स्वबळावर लढणारी काँग्रेस नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडीबरोबर जाणार

मुंबईत स्वबळावर लढणारी काँग्रेस नवी मुंबईत माञ महाविकास आघाडीबरोबर जाणार आहे. महाविकास आघाडीने विभागवार कार्यकर्ता मेळावे घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

नवी मुंबई : काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला असला तरी नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडी बरोबर महानगरपालिका निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. पुढील दोन महिन्यात महानगरपालिका निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीने विभागवार कार्यकर्ता मेळावा घेत रणशिंग फुंकले आहे. नवी मुंबईत गेल्या 25 वर्षांपासून मनपावर असलेली गणेश नाईकांची एकहाती सत्ता उलथवून टाकण्याचा चंग यावेळी तीन पक्षांनी एकत्र येवून केला आहे.

कोरानामुळे एप्रिल महिन्यात होणारी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने पुढील दोन महिन्यात राज्यातील 5 महानगरापालिका निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा समावेश असल्याने सद्या राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. 2022 मध्ये होणारी मुंबई मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असली तरी नवी मुंबईत मात्र महाविकास आघाडी बरोबर जाण्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. यासाठी महाविकास आघाडीने विभागवार मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 25 वर्षांपासून नवी मुंबई मनपात गणेश नाईक यांची असलेली एकहाती सत्ता यावेळी धुळीस मिळवणार असल्याचे आवाहन काँग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष अनिल कौशिक यांनी भाजपला दिले आहे.

महाविकास आघाडी एकत्र लढणार तीन पक्षांच्या समन्वयकाची जबाबदारी शिवसेनेने आपल्या खांद्यावर घेतली आहे. नवी मुंबईत एकेकाळी शिवसेनेचा भगवा मनपावर फडकत होता. मात्र, गणेश नाईकांनी सेनेला सोडचिट्टी दिल्यानंतर गेल्या 20 वर्षांपासून शिवसेना सत्तेबाहेर आहे. याची सल असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर घेवून यावेळी सत्ता आणायचीच असा चंग शिवसेना नेत्यांनी केला आहे. वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने केलेली चांगली कामे लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न तीन पक्ष करणार असल्याचे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी स्पष्ट केले.

..तर आपलीच सत्ता येणार असल्याचा भाजप आमदार गणेश नाईक यांचा दावा

महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र लढत असले तरी कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही. सिटवाटप फॉर्मूला नक्की झाला असून बंडखोरीला वाव नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने कार्यकर्ता मेळावे घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले असले तरी भाजप दरबारी मात्र शांतता आहे. नागरी प्रश्नांना घेवून आयुक्तांच्या दरबारात जाण्याचा एकमेव अजेंडा भाजप राबवत आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षाबरोबर चौथा पक्ष येवून आपल्या समोर लढले तरी आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा भाजप आमदार गणेश नाईक करीत आहेत.

महाविकास आघाडी सिट वाटप फॉर्मूला

  • एकूण सिट - 111
  • शिवसेना – 65 ते 70
  • काँग्रेस – 22 ते 24
  • राष्ट्रवादी – 20 ते 22

2015 निवडणुकीत जिंकलेले पक्षीय बलाबल :

  • एकूण नगरसेवक – 111
  • राष्ट्रवादी काँग्रेस + अपक्ष – 57
  • शिवसेना – 38
  • काँग्रेस – 10
  • भाजपा – 6

पक्षांतरानंतर सद्या असलेली पक्षीय नगरसेवक संख्या :

  • भाजप – 61
  • शिवसेना – 40
  • काँग्रेस – 6
  • राष्ट्रवादी काँग्रेस - 4
संबंधित बातमी : 'शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घ्या', अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना NCP Meeting | राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक; काय झालं बैठकीत?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
Vasai Virar Rain : वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Embed widget