एक्स्प्लोर

विरोध असल्यास नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री

“नाणार ग्रामस्थांची जी भूमिका आहे, तीच शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला ठाम विरोध आहे. ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना असहमती पत्राचे गठ्ठे दिले.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात नाणार रिफायनरी प्रकल्पाचा एमओयू होणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. तर ग्रामस्थांचा विरोध असल्यास नाणार रिफायनरी प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाणार ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे अनेक दिग्गज नेतेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले? “नाणार ग्रामस्थांची जी भूमिका आहे, तीच  शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेचा प्रकल्पाला ठाम विरोध आहे. ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना असहमती पत्राचे गठ्ठे दिले.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, “वाडवन बंदराला शिवशाहीचं सरकार असताना लोकांनी विरोध केला, तेव्हा तो रद्द केला होता. विकासाच्या नावाखाली वैभव मरु देऊ नका, हे आम्ही स्पष्ट केलं आहे.”, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. शिवाय, मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाला जाणार की नाही  याचं उत्तर काळ देईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाणार ग्रामस्थ काय म्हणाले? आमचा विरोध मावळला नसून अधिक उग्र झाला आहे आणि आमचा विरोध कायदेशीर आहे, असे नाणारचे ग्रामस्थ अरविंद सामंत यांनी सांगितले. शिवाय, प्रकल्प मंजुरीसाठी 70 टक्के स्थानिकांची सहमती लागते, मात्र आज 78 टक्के स्थानिकांनी असहमती पत्र दिले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. तसेच, “मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, विरोध असल्यास प्रकल्प लादणार नाही. मात्र प्रकल्पाच्या फायद्याचे मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करु, नाही पटले तर सक्ती करणार नाही. काही एनजीओ दिशाभूल करत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पण आम्ही जनसुनावणी घेण्याची मागणी केली आहे.” अशी माहितीही ग्रामस्थ अरविंद सामंत यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यामुळं 250 हून अधिक झाडे उन्मळून पडली, दोन जणांचा मृत्यू
मुंबईत पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यामुळं 250 हून अधिक झाडे उन्मळून पडली, दोन जणांचा मृत्यू
Uddhav Thackeray: राम मंदिरातील दान चोरी अयोध्येची झांकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदूंनी जागं राहावं, कोणी मंदिर लुटत असेल तर अब हिंदू माफ नही करेगा, उद्धव ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे श्रीराम मंदिरातील दानचोरी विरोधात रामरक्षा आंदोलन, अयोध्येतील साधुसंत दादरमध्ये दाखल
ठाकरेंच्या शिवसेनेचे श्रीराम मंदिरातील दानचोरी विरोधात रामरक्षा आंदोलन, अयोध्येतील साधुसंत दादरमध्ये दाखल
Ritu Tawade Mumbai Tree Collapse : झाड पडल्यामुळे मृत्यूच्या घटना, प्रश्न विचारताच महापौर संतापल्या , मी गेले दोन महिने फिरतेय मान्सूनपूर्व कामांच्या पाहणीसाठी...
झाड पडल्यामुळे मृत्यूच्या घटना, प्रश्न विचारताच महापौर संतापल्या , मी गेले दोन महिने फिरतेय मान्सूनपूर्व कामांच्या पाहणीसाठी...

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Nitesh Rane: 'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
'आम्ही नेहमीचे टीकाकार, पण एकाच स्ट्रॉमध्ये कोल्ड कॉफी पिणारे सचिन अहिर आदित्य ठाकरेंवर टीकाटिपणी करत असतील तर..' नितेश राणेंचं खोचक उत्तर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
Embed widget