एक्स्प्लोर

'मी उद्धव बाळासाहेब ठाकरे'... लेखक, कवी, उत्तम फोटोग्राफर ते मुख्यमंत्री, भन्नाट जीवनप्रवास

28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतील. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना आज पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे. आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पत्र दिलं आहे. 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शपथ घेतील. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. अनेक अडथळ्यांनंतर शिवसेना आज पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आली आहे. आणि ती ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली. महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली. २७ जुलै १९६० रोजी मुंबईमध्ये जन्म झालेले श्री. उद्धव ठाकरे जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् चे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे. राजकीय कारकीर्द उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या श्री. ठाकरे यांच्याकडे 2002 च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. व्यक्तिगत जीवन उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे हे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. कलात्मक पैलू महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या 2010 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या 2011 मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली. योगदान
  • शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले.
  • 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनिज बुकने घेतली आहे.
  • ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला. • मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण. विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी.
  • २००२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश. गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश.
  • राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी २००७ मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली.
  • उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.
  • संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local : पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात, अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प
विरार वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान भीषण अपघात, अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू, पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Sushma Andhare Vs Sheetal Mhatre : फार्म हाऊसला पाणी, राजकीय उणीदुणी Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
पंजाब एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू, टिटवाळा-कल्याण मार्गावर लोकल सेवा दीड तास विस्कळीत
Rinku Singh: उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
उत्तर प्रदेशात रिंकू सिंहला स्पेशल गिफ्ट पण ते स्वीकारण्यासाठी गेलाच नाही! कार्यक्रमात तोच धागा पकडत सीएम योगी नेमकं काय म्हणाले?
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
सप्तशृंगी गडाकडे पायी चालणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कारने चिरडल्याने महिला ठार, दोन भाविक जखमी
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू
Income Tax Update : 1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
1 एप्रिलपासून नवे आयकर नियम लागू; PAN, ITR ते जेवणाच्या कार्डपर्यंत काय बदल? जाणून घ्या
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
...तर झिरवाळांना आपण सोडायचं नाही; व्हायरल व्हिडिओवर रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं, तटकरेंनाही टोला
Embed widget