एक्स्प्लोर

Lockdown | प्रेयसीच्या ओढीने मुंबई ते सिंधुदुर्ग पायी प्रवास, परत येताना पोलिसांनी दोघांनाही पकडलं!

लॉकडाऊनच्या काळात प्रेयसीच्या ओढीने मुंबईतील तरुण पोलिसांची नजर चुकवत पायी प्रवास करत, मिळेत ते वाहन पकडत सिंधुदुर्गात पोहोचला. मात्र परत घेऊन येताना रत्नागिरीत पोलिसांनी दोघांनाही पकडलं आणि क्वॉरन्टाईन केलं.

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात आता बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आपल्या लोकांना भेटणे देखील दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यामध्ये प्रेमवीरांनाचाही समावेश आहे. आपल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडच्या विरहाने अनेकांना लॉकडाऊन नकोसा वाटत आहे. सोशल मीडियाचा आधार घेत एकमेकांशी टचमध्ये राहणे शक्य असले तरी पुरे झाला लॉकडाऊन अशा शब्दात अनेकजण आपली घुसमट देखील व्यक्त करत आहेत. तिला किंवा त्याला भेटण्यासाठी अनेकजण नामी शक्कल देखील लढवत आहेत. पण, शेकडो किलोमीटरचे अंतर असल्यास किंवा पोलिसांची नजर चुकवत भेटणार तरी कसे? हा देखील प्रश्नच आहे. मात्र प्रेयसीच्या ओढीने मुंबईतल्या एका तरुणाने सिंधुदुर्गातील कसाल हे गाव गाठले. जवळपास 500 ते 600 किमी अंतर त्याने चालत, मिळेल ते वाहन पकडत त्याने पार केले. पण प्रेयसीला घेऊन परत येत असताना त्याला पोलिसांनी पकडले आणि अखेर क्वॉरन्टाईन करुन ठेवले.

तिच्या ओढीने तो कसा पोहोचला कोकणात? मुंबईत कामाला असलेला प्रियकर हा मूळचा उत्तर प्रदेशचा. तर ती कोकणातील. दोघेही मागील 2 ते 3 वर्षापासून एकमेकांना ओळखतात. तर, मागील एक वर्षापासून दोघेही एकत्र राहतात. प्रियकर मुंबईत स्विगी डिलिव्हरी बॉयचे काम करतो आणि ती आहे नर्स. कोकणात शिमग्याकरता आलेली प्रेयसी लॉकडाऊनच्या काळात गावी अडकून पडली. मुंबईत जाण्यासाठी लाख प्रयत्न झाले पण यश काही आले नाही. अखेर तिला आणण्यासाठी त्याने प्रेयसीचे गाव गाठण्याचा निर्णय घेतला. मिळेल ते वाहन पकडत, पोलिसांची नजर, चौकी-पहारे चुकवत, आडमार्गाने, प्रसंगी चालत तो तिच्या कोकणातील मूळगावी पोहोचला देखील. गावात याची कुणकुण लागू नये म्हणून त्याने गावातील शाळेत वस्ती केली. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या प्रेयसीला घेतले आणि मुंबईच्या दिशेने निघाला देखील. पण, यावेळी त्याच्याकरता मुंबई गाठणं कठीण होते. कारण, जोडीला ती असल्याने पोलिसांची नजर चुकवणे, कडक चौकी-पहारे चुकवणे हे काम तसे जोखमीचे होते. पण, सिंधुदुर्गची सीमा पार करण्यास दोघेही यशस्वी झाले.

त्यानंतर दोघेही रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे पोहोचले. भूक लागल्याने दोघांनी शिवभोजन थाळीच्या ठिकाणी जेवण करण्याचे ठरवले. पण, यावेळी तिथल्या काही पोलिसांच्या ध्यानात ही बाब आली. त्यामुळे एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे सुरु झालेल्या या स्टोरीचा क्लायमॅक्स पोलीस लिहिणार हे निश्चित झाले. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली आणि संपूर्ण गोष्ट समोर आली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत त्यांना परत पाठवण्याबाबत विचारणा करण्यात आली. पण, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी त्यास नकार दिला. दरम्यान, या दोघांना त्यानंतर लांजा येथे क्वॉरन्टाईन करुन ठेवण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब देखील तपासणीकरता पाठवले आहेत. या दोघांचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना सिंधुदुर्गात पाठवले जाणार असल्याची माहिती लांजा पोलीस स्टेशनचे पीआय संजय चौधर यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.

34 जण क्वॉरन्टाईन ही सर्व गोष्ट समोर आल्यानंतर सिंधुदुर्ग प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्गातील ज्या गावी तरुणाने वस्ती केली होती, त्या ठिकाणाच्या 34 जणांना क्वॉरन्टाईन करुन ठेवले आहे. मुंबईमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा तरुण देखील रेडझोनमधून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 34 जणांना क्वॉरन्टाईन करुन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज :   7PM : 6 सप्टेंबर 2024 : ABP MajhaUddhav Thackeray on Shrikant Shinde :  लेकाला डिवचलं;  पिता खवळला; श्रीकांत शिंदेंवर घणाघातJob Majha : भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी : 6 October 2024 : abp MajhaABP Majha Headlines :  7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget