एक्स्प्लोर

सिंचन योजनेवरुन मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये जुंपली

सिंचन योजना पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांत शाब्दिक युद्ध रंगले आहे.

सांगली : सिंचन योजना पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांत शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल सांगलीत आयोजित शेतकरी मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, "आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांमध्ये पूर्णपणे डबाबंद पडलेल्या योजना आम्ही पूर्ण केल्या." त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी "बंद पडलेल्या सिचन योजना शेवटी- शेवटी कशाला सुरु करायच्या?" असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "युती सरकारने सुरू केलेल्या परंतु आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांमध्ये पूर्णपणे डबाबंद पडलेल्या योजना आम्ही पूर्ण केल्या." तर अजित पवार म्हणाले की, "बंद पडलेल्या सिंचन योजना सत्तेचा कार्यकाळ संपत आल्यानंतर का सुरु केल्या? मुख्यमंत्री म्हणाले की, "सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ येथील पाण्याचा समस्या सोडवण्यासाठी या परिसराला जमिनीखालून पाइपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला. त्यामुळे सरकारला जमीन अधिग्रहित करावी लागली नाही. तसेच या योजनांवरचे सरकारचे 800 कोटी रुपये वाचले." "टेंभू, ताकारी , म्हैसाळ सारख्या योजना युती सरकारच्या काळात सुरू झाल्या आणि मध्यंतरीच्या पंधरा वर्षांमध्ये (आघाडी सरकारच्या कार्यकाळात) पूर्णपणे डबाबंद होत्या. या योजनांच्या कामाची आम्ही सुरुवात केली आणि पुढच्या सहा महिन्यात या योजनांचे टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करणार आहोत," असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याबाबत अजित पवार म्हणाले की, "सिंचन योजना बंद पडलेल्या होत्या तर शेवटी शेवटी कशाला सुरु करायच्या? या बंद पडलेल्या योजना सरकारला पूर्ण करायच्या होत्या तर चार वर्षांपूर्वी सरकारमध्ये आले होते, तेव्हा का नाही केल्या? सत्तेचा कार्यकाळ संपत आल्यानंतर का सुरु केल्या आहेत?" अजित पवार म्हणाले की, "केंद्रामध्ये नितीन गडकरी या खात्याचे मंत्री आहेत, राज्य सरकार या लोकांच्या ताब्यात आहे. खरे तर पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल पाहून भाजपच्या नेत्यांना काय घोषणा करावी आणि काय नको असे वाटू लागले आहे. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना आपलंसं करण्याचा भाजप सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे, हेच यातून सिद्ध होते."

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेला ओम बिर्लांनी भेटीसाठी बोलावलं; म्हणाले, 'तुमची बाजू मांडण्यासाठी आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या'
ठाकरेंच्या शिवसेनेला ओम बिर्लांनी भेटीसाठी बोलावलं; म्हणाले, 'तुमची बाजू मांडण्यासाठी आजच लोकसभा अध्यक्षांच्या समोर या'
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: लोहगडावरुन ढकलताच केतन झाडात अडकला; पहिला प्लॅन फसताच सियाने मिठी मारली आणि म्हणाली...
लोहगडावरुन ढकलताच केतन झाडात अडकला; पहिला प्लॅन फसताच सियाने मिठी मारली आणि म्हणाली...

व्हिडीओ

MP Fund Controvercy : धूळखात निधी, वापरणार कधी? | ABP Majha Special Report
Rahul Narvekar Marathi Controvercy : अध्यक्ष महोदय... हे कसलं मराठी? | Special Report
Kiran Pawaskar Statement Controvercy : पावसकरांचं विधान, दोन शिवसेनांत तणाव | Special Report
Sanjay Jadhav On Thackeray: ठाकरेंची चूक, राऊतांवर नाराजी ते आत्ताची भूमिका; संजय जाधव थेट बोलले
Sanjay Dina Patil on Uddhav Thacekray and Shivsena : मला सिक्युरिटीची गरज नाही, गरज त्यांना आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
केतनचा मृतदेह घरी आणताच रियाची ती रिअ‍ॅक्शन; सगळ्यांची नजर पडली, विशाल अग्रवालांची चक्रावणारी माहिती
'आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं' छोटे छोटे जॅक, टॉमी, बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो; अर्चना पाटलांचे ओमराजेंना चिमट्यांवर चिमटे
'आम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हा आम्हाला गद्दार वगैरे म्हटलं गेलं' छोटे छोटे जॅक, टॉमी, बसमध्ये सीट मिळवून देणे हा विकास नसतो; अर्चना पाटलांचे ओमराजेंना चिमट्यांवर चिमटे
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
केतनला लोहगडावर जायचंच नव्हतं, पण सियाने आईला केलं ब्लॅकमेल?
कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा
कोल्हापुरात तरण्याबांड लेकरांनी आयुष्य संपवण्याची मालिका संपता संपेना; आता माजी महापौरांच्या नातवाचा टोकाचा निर्णयानं सन्नाटा
Omraje Nimbalkar Operation Tiger: ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट
ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट
Pune Crime Lohagad Fort: लग्न ठरल्यापासून सियाचे 2004 फोन कॉल, 238 तास गप्पा; केतनशी लग्न ठरल्यानंतरही अनेक मुलांशी चॅटिंग, सियाच्या मोबाईल CDR मधून हादरवणारी माहिती
लग्न ठरल्यापासून सियाचे 2004 फोन कॉल, 238 तास गप्पा; केतनशी लग्न ठरल्यानंतरही अनेक मुलांशी चॅटिंग, सियाच्या मोबाईल CDR मधून हादरवणारी माहिती
Ketan Agrawal Death Case, Pune: केतन अग्रवालला संपवण्यासाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? पुण्यातील भयंकर प्रकरणाची इनसाईड स्टोरी
केतन अग्रवालला संपवण्यासाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? पुण्यातील भयंकर प्रकरणाची Inside Story
Embed widget