एक्स्प्लोर

सिंचन योजनेवरुन मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये जुंपली

सिंचन योजना पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांत शाब्दिक युद्ध रंगले आहे.

सांगली : सिंचन योजना पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांत शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल सांगलीत आयोजित शेतकरी मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, "आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांमध्ये पूर्णपणे डबाबंद पडलेल्या योजना आम्ही पूर्ण केल्या." त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी "बंद पडलेल्या सिचन योजना शेवटी- शेवटी कशाला सुरु करायच्या?" असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "युती सरकारने सुरू केलेल्या परंतु आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांमध्ये पूर्णपणे डबाबंद पडलेल्या योजना आम्ही पूर्ण केल्या." तर अजित पवार म्हणाले की, "बंद पडलेल्या सिंचन योजना सत्तेचा कार्यकाळ संपत आल्यानंतर का सुरु केल्या? मुख्यमंत्री म्हणाले की, "सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ येथील पाण्याचा समस्या सोडवण्यासाठी या परिसराला जमिनीखालून पाइपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला. त्यामुळे सरकारला जमीन अधिग्रहित करावी लागली नाही. तसेच या योजनांवरचे सरकारचे 800 कोटी रुपये वाचले." "टेंभू, ताकारी , म्हैसाळ सारख्या योजना युती सरकारच्या काळात सुरू झाल्या आणि मध्यंतरीच्या पंधरा वर्षांमध्ये (आघाडी सरकारच्या कार्यकाळात) पूर्णपणे डबाबंद होत्या. या योजनांच्या कामाची आम्ही सुरुवात केली आणि पुढच्या सहा महिन्यात या योजनांचे टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करणार आहोत," असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याबाबत अजित पवार म्हणाले की, "सिंचन योजना बंद पडलेल्या होत्या तर शेवटी शेवटी कशाला सुरु करायच्या? या बंद पडलेल्या योजना सरकारला पूर्ण करायच्या होत्या तर चार वर्षांपूर्वी सरकारमध्ये आले होते, तेव्हा का नाही केल्या? सत्तेचा कार्यकाळ संपत आल्यानंतर का सुरु केल्या आहेत?" अजित पवार म्हणाले की, "केंद्रामध्ये नितीन गडकरी या खात्याचे मंत्री आहेत, राज्य सरकार या लोकांच्या ताब्यात आहे. खरे तर पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल पाहून भाजपच्या नेत्यांना काय घोषणा करावी आणि काय नको असे वाटू लागले आहे. परंतु आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांना आपलंसं करण्याचा भाजप सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे, हेच यातून सिद्ध होते."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद, पारा 44 अंशावर, कोणत्या जि्ह्यात किती तापमान? 
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद, पारा 44 अंशावर, कोणत्या जि्ह्यात किती तापमान? 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2026 |  बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2026 |  बुधवार
करणी बाधा ते गुप्त धन, अघोरी पूजेच्या नावाखाली भोंदूबाबकडून महिलेची तब्बल 11 लाखांची फसवणूक, जळगावमध्ये धक्कादायक घटना उघडकीस
करणी बाधा ते गुप्त धन, अघोरी पूजेच्या नावाखाली भोंदूबाबकडून महिलेची तब्बल 11 लाखांची फसवणूक, जळगावमध्ये धक्कादायक घटना उघडकीस
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर

व्हिडीओ

Kishori Pednekar On Sanjay Shirsat : गद्दारी करणाऱ्या भामट्याने आमच्या पक्षावर बोलू नये - पेडणेकर
Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
आरसीबीला आज घरच्या मैदानात लखनौला हरवण्यासाठी 'विराट' इतिहास करावा लागणार! 'राॅयल' विजयासह पाँईंट टेबलमध्ये अग्रस्थानी पोहोचण्याची सुद्धा संधी
CBSE 10th Result 2026 Declared: सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
सीबीएसईकडून दहावीचा निकाल जाहीर,  93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मारली बाजी  
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार
राज्यसभेत अवघ्या 12 दिवसांपूर्वी 'आप'ने राघव चड्‌ढांना हटवून अशोक मित्तल यांना उपनेते करताच ईडीची धाड पडली; पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वीच कारवाई, टिपिकल मोदी स्टाईलने तयारी सुरु, मुख्यमंत्र्यांचा प्रहार
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे-केसरकरांना SIT कधी बोलवणार? खरातप्रकरणी शिवसेनेच्या दीपक केसरकरांचे उत्तर
Cameron Green: तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
तब्बल 25 कोटींचा कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप; पगारात कपात होणार! ग्रीनच्या पदरात किती पडणार? बीसीसीआयचा नियम आहे तरी काय?
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार? मनसेनं सांगितला प्रादेशिक धोका; दिल्लीत हिंदी भाषिकांची पकड घट्ट
Share Market : शेअर बाजारात पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांची एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
शेअर बाजारात पैशांचा पाऊस, गुंतवणूकदारांची एका दिवसात 900000 कोटींची कमाई, सेन्सेक्स- निफ्टीत तुफान तेजी
Bihar Politics: नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
Embed widget