एक्स्प्लोर

'आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे'; पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

पंकजा मुंडेंनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून हे आवाहन केलं आहे. तसेच पुढिल राजकीय वाटचालीसंदर्भातही चर्चा करणार असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. एवढच नाहीतर राजकारणात झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदललेल्या समीकरणांबाबतही त्या बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे.

परळी : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका प्रचंड गाजल्या, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण महाराष्ट्राचा सत्तापेच अखेर सुटला असून निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत असून महाविकासआघाडी म्हणजेच, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत काही मतदार संघातील लढत चुरशीची झाल्याचं पाहायला मिळालं. असाच एक मतदार संघ म्हणजे, परळी विधानसभा मतदारसंघ. या मतदार संघात भावा-बहिणीमधील लढत पाहायला मिळाली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या आमदारकीच्या लढतीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेचा पराभव केला. अशातच विधानसभा निवडणुकीआधी पंकजा मुंडे पक्षाकार्यात सक्रिय होत्या, पण पराभवानंतर मात्र त्या बीड जिल्ह्यात किंबहुना परळी विधानसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होताना दिसल्या नाहीत. पंकजा मुंडें आता पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार अशा चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. पंकजा मुंडेंनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यामातून हे आवाहन केलं आहे. तसेच पुढिल राजकीय वाटचालीसंदर्भातही चर्चा करणार असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. एवढच नाहीतर राजकारणात झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदललेल्या समीकरणांबाबतही त्या बोलणार असल्याचं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काय आहे पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये? पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, 'दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. 'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.' पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ' पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली.' पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून मतदारांचे आभारही मानले आहेत. त्या म्हणाल्या की, 'मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.' दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात सुमारे अठरा एकर जागेवर भव्य-दिव्य स्वरूपाचे स्मारक उभारण्यात आले असून त्यालाच गोपीनाथ गड असं संबोधलं जातं. येथेच गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ आहे. संबंधित बातम्या :  महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध, भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे  साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यावरून उद्योगपती राहुल बजाज यांनी अमित शाहांना घेरले, शाह म्हणाले...    Aarey Metro Car Shed | आरेतील मेट्रो कारशेडचं काम मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतरही सुरुच रब्बी हंगामाकरिता पीकविमा हप्ता भरण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारची अर्धवट कर्जमाफी, शेतकऱ्यांची उघड फसवणूक, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची टीका
Ration Card Rules : तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे का? मग तुमचे रेशन कार्ड रद्द होणार
Ration Card Rules : तुमच्याकडे चारचाकी गाडी आहे का? मग तुमचे रेशन कार्ड रद्द होणार
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर
बनावट ग्रामसेवक नियुक्तीपत्र प्रकरण! नाशिक जिल्ह्यात खळबळ, तरुणाची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget