एक्स्प्लोर

Water Crisis : विदर्भाचे नंदनवन जलसंकटाच्या दृष्टचक्रात; हांडाभर पाण्यासाठी मेळघाटात कित्येक मैलांची पायपीट

निसर्ग सौंदर्यान नटलेल आणि विदर्भाच नंदनवन म्हणून लौकिक मिळवलेला मेळघाट सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. मेळघाटच्या अनेक ग्रामीण भागात हांडाभर पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे.

Water Crisis अमरावती : निसर्ग सौंदर्यान नटलेल आणि विदर्भाच नंदनवन म्हणून लौकिक मिळवलेला मेळघाट (Melghat) सध्या भीषण पाणीटंचाईचा (Water Crisis) सामना करीत आहे. मेळघाटच्या अनेक ग्रामीण भागात हांडाभर पाण्यासाठी कित्येक मैलांची पायपीट करावी लागत आहे. मेळघाटमध्ये मोठ्याप्रमाणत आदिवासी पाडे आणि दुर्गम स्थळी खेडीपाडी आहेत. येथील जवळ जवळ सर्व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने या गावातील नागरिकांना आता टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय.

मात्र ते पाणी सुध्दा घरपोच मिळत नाही. टँकरद्वारे मिळणारे पाणी आधी विहीरीत टाकले जाते आणि त्यानंतर ते नागरिकांना विहिरीतून काढून प्यावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना आता टँकरचा शेवटचा आसरा उरला असून पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांचीच दांडी?

राज्यातील पाणीटंचाईच्या (Water Crisis) गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज आढावा बैठक घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक होणार असून, पाण्याअभावी 23 जिह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीये. अनेक गावं आणि खेडी तहानलेली आहेत. काही ठिकाणी पाणी हा लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. मात्र ज्याच्या हातात जिल्ह्याची सगळे सूत्रे असतात असे पालकमंत्रीच बैठकीला  नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण काही पालकमंत्री विदेशात आहेत. तर काही पालकमंत्री दर्शनासाठी राज्याबाहेर आहेत. त्यामुळे अनेक पालकमंत्री बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलीय. मात्र या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आज ठोस उत्तर राज्यातील खेडोपाड्यात ग्रामस्थांना मिळेल का, याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वर्ध्याला वादळ वाऱ्याचा तडाखा, 25 घरावरील टिनाचे छप्पर उडाले 

एकीकडे पाणी टंचाईचे भीषण सावट असताना विदर्भात अवकळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील मुरदगाव या गावात रात्री झालेल्या वादळाने घराची छपरे उडाली आहे. सुमारे 25 घरांची छपरे उडाल्याने गावातील नागरिकांना रात्र उघडयावर काढावी लागलीय. विद्युत तारे तुटली, अनेक झाडांची पडझड देखील झालीय. रात्रीच्या 30 मिनिटांच्या वादळ वाऱ्याने गावकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. 12 तास उलटून गेल्यावरही प्रशासनाचे अधिकारी पोहचलेच नाही. त्यामुळे गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावकरी रात्रभर प्रतीक्षेत राहिले. तर अनेक जणांच्या घरचे अन्नधान्य ओले झाले आहे. 

पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा

ग्रामीण भागांत घागरभर पाण्यासाठी जनतेचा टाहो सुरू आहे. जलस्राोत पूर्णपणे आटल्यामुळे आणि छोट्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने 23 जिल्ह्यांतील तब्बल 10 हजार गाव-पाड्यांना 3500 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुसरीकडे पाणी आणि चाराटंचाईमुळे विशेषत: दूध उत्पादक शेतकरी संकटात आलाय.. चारा छावण्या त्वरित सुरू करण्याची मागणी जोर धरू लागलीये..  मराठवाड्यात पाण्याअभावी ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच दुधाला चांगला भाव नसल्याने शेतकरी पशुधन विकू लागले आहेत. पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे. अवकाळी आणि दुसरीकडे दुष्काळ-पाणीटंचाई अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. शेतातील पिके जगवण्यासाठी बळीराजा धडपड करतोय.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घाला, संजय गायकवाडांचा अज्ञानपणा दूर होईना, पुस्तकाचं वाचन ऐकायलाही जाणार
शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी घाला, संजय गायकवाडांचा अज्ञानपणा दूर होईना, पुस्तकाचं वाचन ऐकायलाही जाणार
Sanjay Gaikwad and Govind Pansare: गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा, संजय गायकवाडांच्या नावाने पोस्ट व्हायरल होताच खळबळ, नेमकं काय घडलं?
गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा, संजय गायकवाडांच्या नावाने पोस्ट व्हायरल होताच खळबळ, नेमकं काय घडलं?
Vidhan Parishad Election 2026 Jay Pawar: राष्ट्रवादीचे 75 नेते देव पाण्यात बुडवून बसले, पण विधानपरिषदेवर जय पवारांना संधी मिळणार? अमोल मिटकरींचं ट्विट, पडद्यामागे हालचाली?
राष्ट्रवादीचे 75 नेते देव पाण्यात बुडवून बसले, पण विधानपरिषदेवर जय पवारांना संधी मिळणार? अमोल मिटकरींचं ट्विट, पडद्यामागे हालचाली?
Mumbai Watermelon Family death News: मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय

व्हिडीओ

Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Vidhan Parishad Election 2026 Bacchu Kadu: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
Mumbai Watermelon Family death News: मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Embed widget