एक्स्प्लोर

Maharashtra Draught : मराठवाड्यात पाण्यासाठी जनतेचा टाहो; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांचीच दांडी? काही परदेशात, काही देवदर्शनाला

Maharashtra Draught : हंडाभर पाण्यासाठी कैक किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. पुण्या-मुंबईसारख्या शहरात रोज पाणी येतं. शॉवरनं आंघोळी होतायत, पण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पाण्याला सोन्यासारखं जपत आहेत.

Maharashtra Draught : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  आज मराठवाड्यातील पाणीटंचाईची (Marathwada Water Crisis)  आढावा बैठक घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक होणार असून, या बैठकीला मराठवाड्यातील पालकमंत्री गैरहजर असण्याची शक्यता आहे.  पाण्याअभावी 23 जिह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीये. अनेक गावं आणि खेडी तहानलेली आहेत. काही ठिकाणी पाणी हा  लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. मात्र ज्याच्या हातात जिल्ह्याची सगळे सूत्रे असतात  असे पालकमंत्रीच बैठकीला  नसल्याने  आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण काही पालकमंत्री विदेशात आहेत. तर काही पालकमंत्री दर्शनासाठी राज्याबाहेर आहेत. त्यामुळे अनेक पालकमंत्री बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.

राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर झाली.  सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 24.03 टक्क्यांवर आलाय. या परिस्थितीत सरकारमध्ये  जिल्ह्यचे प्रश्न मार्गी लावणारे तसेच  प्रशासन आणि  लोकप्रतिनिधी यातील दुवा म्हणून  काम पालकमंत्री  सध्या विदेशात गेले आहे.   हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सध्या परदेशात आहेत. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत. जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे देखील देवदर्शनासाठी संभाजीनगर जिल्ह्याच्याबाहेर आहेत. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनासाठी राज्यबाहेर आहेत. संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे आजारी असून ते मुंबईत आहेत. त्यामुळे ते देखील बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन बैठकीला उपस्थित राहणार आहेत. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत स्वतः बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई

राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 24.03 टक्क्यांवर आलाय.. तर दुसरीकडे पाण्याअभावी 23 जिह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीये.. राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. अनेक गावं आणि खेडी तहानलेली आहेत. टँकरची वाट बघण्यात दिवसच्या दिवस जातोय. हंडाभर पाण्यासाठी कैक किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. पुण्या-मुंबईसारख्या शहरात रोज पाणी येतं. शॉवरनं आंघोळी होतायत, पण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पाण्याला सोन्यासारखं जपत आहेत.

पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा

 ग्रामीण भागांत घागरभर पाण्यासाठी जनतेचा टाहो सुरू आहे. जलस्राोत पूर्णपणे आटल्यामुळे आणि छोट्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने 23 जिल्ह्यांतील तब्बल 10 हजार गाव-पाड्यांना 3500 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुसरीकडे पाणी आणि चाराटंचाईमुळे विशेषत: दूध उत्पादक शेतकरी संकटात आलाय.. चारा छावण्या त्वरित सुरू करण्याची मागणी जोर धरू लागलीये..  मराठवाड्यात पाण्याअभावी ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच दुधाला चांगला भाव नसल्याने शेतकरी पशुधन विकू लागले आहेत. पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे.  अवकाळी आणि दुसरीकडे दुष्काळ-पाणीटंचाई अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. शेतातील पिके जगवण्यासाठी बळीराजा धडपड करतोय.

Video :

हे ही वाचा :

महाराष्ट्र तापला, जनावरं तहानली; मराठवाड्यातील गंगापूरमधून पहिली चारा छावणी

 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Embed widget