Refinery Project: रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवला, रिफायनरीच्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध, महिलांचा ठिय्या
Refinery Project: रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवला असून महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केलाय
Ratnagiri Refinery Project: रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. रत्नागिरीत रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंचा (Nilesh Rane) ताफा अडवला असून महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केलाय. रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी निलेश राणे बारसू गावात (Barsu Village) पोहचले. तसेच आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं निलेश राणे यावेळी म्हणालेत.
सध्या रिफायनरीचं भवितव्य काय?
'एबीपी माझा'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सौदी अरेबियाची आरमको कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात बोलणी सुरु आहे. प्रकल्पाला विलंब होत आहे. त्यामुळे कंपनी नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. पण, आता रिफायनरी उभी राहिल्यास ती 20 मिलियन मेट्रिक टन प्रति वर्षी इतक्या क्षमतेचा असणार आहे. सध्या बारसू-सोलगावमधील रिफायनरीला विरोध असून त्याविरोधात स्थानिकांनी मोठं आंदोलन देखील उभारलं आहे. माती परीक्षण आणि ड्रोन सर्व्हे देखील स्थानिकांनी रोखला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. बारसू-सोलगावमध्ये रिफायनरी झाल्यास आम्ही त्याला विरोध करु, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. त्याचवेळी रिफायनरी व्हावी यासाठी देखील आता समर्थक पुढे येत आहेत. अर्थात सध्या सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या हाती कोकणातील रिफायनरीचं भवितव्य असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, संभाजीराजेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
Cyber Fraud : IPS अधिकाऱ्याच्या नावाने पोलिसांनाच गंडा, बनावट व्हॉट्सअॅप प्रोफाईल तयार करुन कनिष्ठ कर्मचाऱ्यांची फसवणूक