एक्स्प्लोर

कसा होता विधानपरिषदेतील कामकाजाचा अखेरचा दिवस?

कोरोना परिस्थिती,राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झालीच नाही. विरोधकांना देखील शासनाला घेरण्याची संधी मिळाली नाही. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशन सांगता झाली.

मुंबई : महाराष्ट्रातील पावसाळी दोन दिवसाच्या अधिवेशनच आज दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आजचा कामकाजाचा मुख्य दिवस होता.कामकाज सुरु झाल्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील 70-30 कोटा रद्द करण्याची घोषणा केली. One state and one merit सांगत सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यच्यावर आक्षेप घेत हक्कभंग नोटीस दिली. सुशांत सिंग प्रकरणी रिपब्लिक चॅनेलवरील बातम्या, अर्णव गोस्वामी यांची भाषा त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतर नेत्यांचा एकेरीत केलेला उल्लेख यावरून हक्कभंग शिवसेना आमदाराने मांडला.या हक्कभंगाला पाठिंबा दिला तो छगन भुजबळ यांनी. हा हक्कभंगाबद्दल अनिल परब बोलत असताना विरोधी बाकांवरून गोंधळ करण्यात आला.घोषणाबाजी झाली त्यामुळे सभागृह तहकूब करण्याची तीन वेळा वेळ आली. माजी शिवसेनीक असलेले छगन भुजबळ ही यावेळी मुख्यमंत्री आणि प्रताप सरनाईक यांच्या मदतीला धावून आले.

पुरवणी मागण्या चर्चा होऊन मंजूर करण्यासाठी वेळेची मर्यादा ही दुपारी तीनपर्यंत होती. त्यात अर्णव गोस्वामी ,जगणं राणावत याच मुद्द्यावरून गोंधळ झाल्याने सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया गेला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.

अखेरीस दुपारी एकच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांवर आपले भाषण सुरू केले.राज्यातील कोरोना स्थिती,वैदकीय सुविधा ते विदर्भातील पूर या सर्व बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री मुंबईचे काम पाहणार अजित पवार पुण्याचं मग राज्यातील इतर भागाची जबाबदारी कोण घेणार? औरंगाबाद,नागपूर हे महाराष्ट्रात येत नाही का असा खडा सवाल त्यांनी सरकारला विचारला. रुग्णालयाची चुकीची बिल,ऑक्सिजन -बेड - औषधांचा तुटवडा या सगळ्यावर त्यांनी आकडेवारीसहित आपली भूमिका मांडली. आरे कारशेड वरून देखील त्यांनी सरकारला इगो घेऊन सरकार चालवू शकत नाही हे सुनावलं. पावणे दोन तास देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले.वेळ कमी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना फक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच उत्तर दिले.

राज्यात केलेली आरोग्य व्यवस्था, कोरोना स्थिती त्यांनी सांगितले. तसेच केंद्राने सध्या राज्याला पीपीई किट, मास्क , ventilators देणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे राज्यावर 300 कोटींचा भार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके असल्याने त्यांनी केंद्राशी बोलून ही मदत सुरू ठेवावी सरकारला मदत करावी असा आवाहन केले. यानंतर पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आली.

अधिवेशनाचे कामकाज संपत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीत सगळ्यांनी केलेलं सहकार्य याबाबत आभार मानले. राज्यात नेमकी सरकार कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांवर भाष्य केले. राज्य सरकार 15 ऑगस्ट पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राबवणार असल्याचे देखील सांगितलं. याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टोला मारला. फडणवीस सरकार असताना आरेमध्ये रात्री झाड कापली होती. त्यावरून सरकार चालवताना इगो असू नये तसा शॉर्टकट ही मारू नये. रात्री चालणारी काम आम्ही दिवस ढवळ्या सगळं करतो, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं "बरोबर ना दादा..." यानंतर विधानसभेचे कामकाज संपून हिवाळी अधिवेशन नागपुरात 7 डिसेंबर असल्याचे उपाध्यक्षांनी घोषित केले.कोरोना काळातील जिकरीचे अधिवेशन संपले..

या अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि विनियोजन आणि विधेयक हेच काम प्रामुख्याने झाले. कोरोना परिस्थिती,राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झालीच नाही. मंत्र्यांनाही प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी नसल्यामुळे अधिवेशनात विशेष आपल्या खात्यात काय सुरू आहे हे मांडण्याची संधी मिळाली नाही. विरोधकांना देखील शासनाला घेरण्याची संधी मिळाली नाही. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशन सांगता झाली.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी, आदित्य ठाकरेंच्या मनात सल कायम? म्हणाले, वाद नको होता म्हणून संमती दिली
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
महाराष्ट्र तापला! मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानाच्या पाऱ्यानं गाठला उच्चांक, अकोल्यात 40 अंशाची नोंद 
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget