एक्स्प्लोर

कसा होता विधानपरिषदेतील कामकाजाचा अखेरचा दिवस?

कोरोना परिस्थिती,राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झालीच नाही. विरोधकांना देखील शासनाला घेरण्याची संधी मिळाली नाही. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशन सांगता झाली.

मुंबई : महाराष्ट्रातील पावसाळी दोन दिवसाच्या अधिवेशनच आज दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आजचा कामकाजाचा मुख्य दिवस होता.कामकाज सुरु झाल्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील 70-30 कोटा रद्द करण्याची घोषणा केली. One state and one merit सांगत सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यच्यावर आक्षेप घेत हक्कभंग नोटीस दिली. सुशांत सिंग प्रकरणी रिपब्लिक चॅनेलवरील बातम्या, अर्णव गोस्वामी यांची भाषा त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि इतर नेत्यांचा एकेरीत केलेला उल्लेख यावरून हक्कभंग शिवसेना आमदाराने मांडला.या हक्कभंगाला पाठिंबा दिला तो छगन भुजबळ यांनी. हा हक्कभंगाबद्दल अनिल परब बोलत असताना विरोधी बाकांवरून गोंधळ करण्यात आला.घोषणाबाजी झाली त्यामुळे सभागृह तहकूब करण्याची तीन वेळा वेळ आली. माजी शिवसेनीक असलेले छगन भुजबळ ही यावेळी मुख्यमंत्री आणि प्रताप सरनाईक यांच्या मदतीला धावून आले.

पुरवणी मागण्या चर्चा होऊन मंजूर करण्यासाठी वेळेची मर्यादा ही दुपारी तीनपर्यंत होती. त्यात अर्णव गोस्वामी ,जगणं राणावत याच मुद्द्यावरून गोंधळ झाल्याने सभागृहाच्या कामकाजाचा वेळ वाया गेला. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.

अखेरीस दुपारी एकच्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांवर आपले भाषण सुरू केले.राज्यातील कोरोना स्थिती,वैदकीय सुविधा ते विदर्भातील पूर या सर्व बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री मुंबईचे काम पाहणार अजित पवार पुण्याचं मग राज्यातील इतर भागाची जबाबदारी कोण घेणार? औरंगाबाद,नागपूर हे महाराष्ट्रात येत नाही का असा खडा सवाल त्यांनी सरकारला विचारला. रुग्णालयाची चुकीची बिल,ऑक्सिजन -बेड - औषधांचा तुटवडा या सगळ्यावर त्यांनी आकडेवारीसहित आपली भूमिका मांडली. आरे कारशेड वरून देखील त्यांनी सरकारला इगो घेऊन सरकार चालवू शकत नाही हे सुनावलं. पावणे दोन तास देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले.वेळ कमी असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना फक्त आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच उत्तर दिले.

राज्यात केलेली आरोग्य व्यवस्था, कोरोना स्थिती त्यांनी सांगितले. तसेच केंद्राने सध्या राज्याला पीपीई किट, मास्क , ventilators देणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे राज्यावर 300 कोटींचा भार येणार आहे. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके असल्याने त्यांनी केंद्राशी बोलून ही मदत सुरू ठेवावी सरकारला मदत करावी असा आवाहन केले. यानंतर पुरवणी मागण्या आणि विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आली.

अधिवेशनाचे कामकाज संपत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीत सगळ्यांनी केलेलं सहकार्य याबाबत आभार मानले. राज्यात नेमकी सरकार कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांवर भाष्य केले. राज्य सरकार 15 ऑगस्ट पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम राबवणार असल्याचे देखील सांगितलं. याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना टोला मारला. फडणवीस सरकार असताना आरेमध्ये रात्री झाड कापली होती. त्यावरून सरकार चालवताना इगो असू नये तसा शॉर्टकट ही मारू नये. रात्री चालणारी काम आम्ही दिवस ढवळ्या सगळं करतो, म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं "बरोबर ना दादा..." यानंतर विधानसभेचे कामकाज संपून हिवाळी अधिवेशन नागपुरात 7 डिसेंबर असल्याचे उपाध्यक्षांनी घोषित केले.कोरोना काळातील जिकरीचे अधिवेशन संपले..

या अधिवेशनात पुरवणी मागण्या आणि विनियोजन आणि विधेयक हेच काम प्रामुख्याने झाले. कोरोना परिस्थिती,राज्यात आलेले नैसर्गिक आपत्ती अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा झालीच नाही. मंत्र्यांनाही प्रश्नोत्तर आणि लक्षवेधी नसल्यामुळे अधिवेशनात विशेष आपल्या खात्यात काय सुरू आहे हे मांडण्याची संधी मिळाली नाही. विरोधकांना देखील शासनाला घेरण्याची संधी मिळाली नाही. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशन सांगता झाली.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
Sushma Andhare: अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
अशोक खरात प्रकरण अत्यंत नाजूक, काही गोष्टी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटूनच सांगायच्यात, सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने नवा सस्पेन्स
Maharashtra Cabinet Meeting: राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय
राज्य सरकारचा 12 वर्षांनंतर मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget