एक्स्प्लोर

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 68 वी जयंती

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज 68 वी जयंती.

बीड: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज 68 वी जयंती. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र तरीही त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यावेळी परिवारासह गडावर उपस्थित राहणार आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेमुळे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले सामाजिक उपक्रमांचे सर्व कार्यक्रम रद्द करून, शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 'प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय' तशी विनंती पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री उमा भारती यांना केली होती. कार्यक्रम रद्द करण्यात आले असले तरी महाराष्ट्राच्या विविध भागातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणारे मुंडे भक्त यंदादेखील आपल्या लाडक्या नेत्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल होत आहेत. 'मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, तुम्ही उदयनराजेंना अटक केलीय का?' वैद्यनाथ साखर कारखाना हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांच्या पश्चात हा कारखाना त्यांच्या कष्टाचे आणि स्वप्नाचे प्रतिक म्हणून आमच्यासाठी हा जिवाभावाचा विषय आहे असे  पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. शोकाकूल परिवार हा कारखान्याशी अनेक वर्षे संबधित असल्यामुळे तो आमचाही परिवार आहे, त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आम्ही घेतली आहे. या घटनेने परिवारातील सदस्य गेल्याचे दुःख झाले आहे, अशा भावना व्यक्त करुन पंकजा मुंडे यांनी संपूर्ण कुटूंबियांसह आज गडावर येणाऱ्या भक्तांसाठी सकाळी ११ वा. पासून उपलब्ध राहणार असल्याचे सांगितले आहे. गोपीनाथ मुंडे यांचा अल्पपरिचय
  • महाविद्यालयीन जीवनात गोपीनाथ मुंडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत होते.
  • 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला होता.
  • गोपीनाथ मुंडेंनी 1978 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. पण इथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ते बीड जिल्हा परिषदेवर निवडून गेले.
  • मुंडे 1980 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. मात्र पुढच्याच म्हणजे 1985च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा स्वत:च्याच परळी या मतदारसंघातून पराभव झाला.
  • त्यानंतर 1990ची विधानसभा निवडणूक ते सहज जिंकले. या काळात त्यांनी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्या संबंधांवरुन रान उठवलं.
  • त्याचबरोबर दाभोळमधील एन्रॉन प्रकल्पाविरोधातही आवाज उठवला होता.
  • पुढे 1995च्या युती सरकारमध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांच्याकडे गृह आणि ऊर्जा अशी दोन मंत्र्यालयं होती. यावेळी त्यांनी अंडरवर्ल्डविरुद्ध मोहीम उघडली. सर्वाधिक एन्काऊंटर याचवेळी झाले आणि अंडरवर्ल्डचा कणा मोडला.
  • यानंतर 1995, 1999 आणि 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सहज यश संपादन केलं.
  • 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. यावेळी ते लोकसभेतील भाजपचे उपनेतेही बनले.
  • तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भरघोस यश मिळालं. मुंडे फक्त दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले असं नाही तर त्यांनी मोदींच्या सरकारमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयही मिळालं होतं.
  • मात्र मंत्रिपदाचा भार स्वीकारल्यानंतर काहीच दिवसात त्यांचा अपघात झाला. 3 जून 2014 रोजी त्यांचं निधन झालं.
  • दिल्लीतील मोतीबाग परिसरात समोरुन येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या गोपीनाथ मुंडेंना जबर मार बसला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मुंडेंवर एम्समध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटाका देखील आला. त्यानंतर सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
संबंधित बातम्या 'प्रमोदजी, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय'

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget