Maharashtra Live blog updates: रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Maharashtra Live blog updates: तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नावाची घोषणा केली. ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णू देव वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती.
जिष्णू देव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. 1990 च्या दशकात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारण सुरू केले.
त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.
रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी
रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी
रोहित पवार यांची एबीपी माझाला माहिती
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दावोसला जाताना इराक आणि इराणच्या बॉर्डरवर विमानाने हवाई उड्डाणची परवानगी न घेतल्यामुळे विमान पाडण्याचा इशारा दोन्ही देशांनी दिला होता
एकनाथ शिंदे यांनी भेटी दरम्यान संबंधित घटना घडल्याचं मान्य केल्याचं रोहित पवार यांची माहिती
पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पुण्याच्या राजगड तालुक्यातील माणगावच्या हद्दीत पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेलेला असताना एक २७ वर्षीय तरुण पाय घसरून पाण्यात पडल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाल्याची ही घटना घडली
रघुनाथ मोतीराम जगताप असं या तरुणाचं नाव आहे
घटनेची माहिती मिळताच राजगडच्या वेल्हे पोलीसांकडून आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पाणलोट क्षेत्रात त्याचा शोध घेऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर वेल्हे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
अधिक तपास पोलिस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या





















