![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनखात्याच्या अंतर्गत येत नाही मग कशात येतो? असा सवाल काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
![साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर Congress MLA Vishwajit Kadam questioned Forest Minister Sudhir Mungantiwar on the issue of Forest Department Snake News साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/8fe91e3bb3128103b12228733fc8d86c1719999388237339_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sudhir Mungantiwar : साप (Snake) वनखात्याच्या अंतर्गत येत नाही मग कशात येतो? असा सवाल काँग्रेसचे पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सर्प दंश आणि त्याची मदत वनविभागात येत नाही. साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो असे मुनगंटीवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले विश्वजीत कदम?
माझ्या मतदारसंघात सागरेश्वर जुनं अभयारण्य आहे तिथे 2000 हरण आहेत. या भागात हरणांचं नुकसान होत असल्याचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम म्हणाले. सांगली जिल्ह्यात बिबट्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. अनेक हल्ल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र, वनखात्यातून उशीरा प्रतिसाद मिळतो असे कदम म्हणाले. तसेच कृष्णा नदीत मगरींची संख्या मोठ्या प्रमामात वाढत चालली आहे. मगरींचे हल्ले होत आहे. याबाबत वनखात्याकडून काहीही उपापयोजना होत नसल्याचे कदम म्हणाले. त्याचबरोबर घोनस नावाचा जो विषारी साप आहे, त्याची संख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे साप डायरेक्ट 40-50 पिलांना जन्म देतात. पण यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. घोनस चावल्यानंतर अर्धा तासात माणूस दगावतो. याची कोणतीही लस उपलब्ध नसते असेही विश्वजीत कदम म्हणाले. मला समजलं की साप हा वनखात्याच्या अंतर्गत येत नाही मग कशात येतो? असा सवाल विश्वजीत कदम यांनी केला.
नेमकं काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
कुंपण हे डीबीटीच्या माध्यमातून दिले जात असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज्यात कुंपणासाठी डीबीटी दिली जाते. सर्प दंश आणि त्याची मदत वनविभागात येत नाही असेही मुनगंटीवार म्हणाले. साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो. त्यामुळं साप वनविभागाच्या विभागात येत नाही असं कदम म्हणाले. साप हा पाळीव प्राणी नाही. त्याची मदत विनविभागाकडून दिली जात नाही. संपूर्ण देशात हा नियम असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु
सध्या राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलच धारेवर धरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विविध मुद्यावरुन दोन्हीकडूल नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
GK : एक साप दुसऱ्या सापाला डसला तर काय होईल? रंजक आहे यामागची कहाणी, पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)