एक्स्प्लोर

2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने संख्याबळाची आकडेवारी दिलीच नव्हती!

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून आमदारांची यादी मागितली जात आहे. मात्र, 2014 मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने अशी कुठल्याही प्रकारची यादी दिली नसल्याची माहिती, माहिती अधिकारातून समोर आली आहे.

मुंबई : आज महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल विविध पक्षाकडे आमदारांची यादी आणि आकडेवारी मागत आहे. पण वर्ष 2014 ला याच महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी ध्वनिमताचा सोपस्कर मार्ग काढणाऱ्या फडणवीस सरकारने सरकार स्थापनेसाठी संख्याबळाची कोणतीही आकडेवारी दिली नव्हती. अशी कबुली राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना वर्ष 2014 ला दिलेल्या माहितीत दिली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांसकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सरकार स्थापनेसाठी किती संख्याबळाचे समर्थन असल्याचे पत्र दिले, त्या पत्राची प्रत देण्याची मागणी केली होती. राज्यपालाच्या अवर सचिव(प्रशासन)व जन माहिती अधिकारी उज्वला दांडेकर यांनी दिनांक 28.10.2014 ला संध्याकाळी 6.40 वाजता प्राप्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राची प्रत दिली. देवेंद्र फडणवीस बरोबर एकनाथ खडसे-पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे-पालवे या भाजप कोअर कमिटी सदस्याचे हस्ताक्षर असलेल्या पत्राची प्रत दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना कळविण्यात आले की भारतीय जनता पक्ष ही या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने मा. महोदय आपण आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी. आत्ताची राजकीय परिस्थितीही तशीच आहे, मात्र, राज्यपाल आमदारांची यादी मागत आहे, संख्याबळाचे पत्र मागत आहे. त्यामुळं 2014 ला राज्यपाल कार्यालयाने जे नियम लावले ते आता का लावले जात नाहीत? असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील बैठक संपली आहे. यावेळी सर्व मुद्द्यांवर आपलं एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या मुंबईत निवडणुकीच्या आधी आघाडीत असणाऱ्या घटकपक्षांशी चर्चा करुन त्यांना माहिती देणार असल्याचं सांगितलं. काय होती 2014 ची राज्यातील परिस्थिती 2014 मध्ये शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीही स्वतंत्र लढली होती. पण, निकालानंतर सेना-भाजपने युती केली. त्यात भाजपनं 122 तर, शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या होत्या. यावेळी सुरुवातीला शिवसेना सोबत न आल्याने भाजपने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले होते. यावेळी कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा आमदारांची यादी भाजपकडून राजपालांना देण्यात आली नव्हती. अशी माहिती माहिती अधिकारात समोर आली होती. संबंधित बातम्या :  औरंगाबादमधील वकिलाची उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक Chhagan Bhujbal | अडीच वर्ष की पाच वर्ष ठाऊक नाही, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल - छगन भुजबळ | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
NEET Paper Leak: पुणेच बनलंय NEET घोटाळ्याचं केंद्रबिंदू; आधी मांढरे, मग कुलकर्णी आणि आता हवालदार, 3 किमीच्या आतच सगळं कांड, इनसाईड स्टोरी
पुणेच बनलंय NEET घोटाळ्याचं केंद्रबिंदू; आधी मांढरे, मग कुलकर्णी आणि आता हवालदार, 3 किमीच्या आतच सगळं कांड, इनसाईड स्टोरी
Satara News: 'उदयनराजे अन् मी अंपायर… कोण कच्चा लिंबू, कोण आऊट, कोण नॉट आऊट ते आम्हीच ठरवतो', मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून नगरसेवकांना कानपिचक्या
'उदयनराजे अन् मी अंपायर… कोण कच्चा लिंबू, कोण आऊट, कोण नॉट आऊट ते आम्हीच ठरवतो', मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडून नगरसेवकांना कानपिचक्या

व्हिडीओ

Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
8 वर्षांपासून प्रेम, कोर्ट मॅरेजही झालं; पण धुमधडाक्यातील लग्नाला जात आडवी आली, आई-वडिलांनीच मुलगी पळवली, पोलिसांत तक्रार
Share Market : 37400 कोटी बाजारमूल्य असलेली कंपनी 506 रुपयांचा लाभांश देणार, कंपनीचा शेअर किती रुपयांवर?
37400 कोटी बाजारमूल्य असलेली कंपनी 506 रुपयांचा लाभांश देणार, कंपनीचा शेअर किती रुपयांवर?
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
'सरकारचा हुकूमशाही कारभारच..' काॅकरोच वेबसाईटवर 10 लाखांवर सदस्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी 6 लाख सह्या; तीच वेबसाईट बंद पाडताच अभिजित इशारा देत काय म्हणाला?
Petrol Diesel Rate : पेट्रोल डिझेलच्या किंमती मे महिन्यात तिसऱ्यांदा वाढल्या, जाणून घ्या कारणं, आतापर्यंत किती दर वाढले?
पेट्रोल डिझेलच्या किंमती मे महिन्यात तिसऱ्यांदा वाढल्या, जाणून घ्या कारणं, आतापर्यंत किती दर वाढले?
कधी बुलेटसवारी, कधी वंदे भारतने प्रवास; नरेंद्र मोदींच्या आवाहनास मुख्यमंत्री देवाभाऊंचा असाही प्रतिसाद
कधी बुलेटसवारी, कधी वंदे भारतने प्रवास; नरेंद्र मोदींच्या आवाहनास मुख्यमंत्री देवाभाऊंचा असाही प्रतिसाद
Embed widget