एक्स्प्लोर

2014 ला सरकार स्थापनेसाठी फडणवीस सरकारने संख्याबळाची आकडेवारी दिलीच नव्हती!

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून आमदारांची यादी मागितली जात आहे. मात्र, 2014 मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने अशी कुठल्याही प्रकारची यादी दिली नसल्याची माहिती, माहिती अधिकारातून समोर आली आहे.

मुंबई : आज महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपाल विविध पक्षाकडे आमदारांची यादी आणि आकडेवारी मागत आहे. पण वर्ष 2014 ला याच महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी ध्वनिमताचा सोपस्कर मार्ग काढणाऱ्या फडणवीस सरकारने सरकार स्थापनेसाठी संख्याबळाची कोणतीही आकडेवारी दिली नव्हती. अशी कबुली राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना वर्ष 2014 ला दिलेल्या माहितीत दिली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल यांसकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सरकार स्थापनेसाठी किती संख्याबळाचे समर्थन असल्याचे पत्र दिले, त्या पत्राची प्रत देण्याची मागणी केली होती. राज्यपालाच्या अवर सचिव(प्रशासन)व जन माहिती अधिकारी उज्वला दांडेकर यांनी दिनांक 28.10.2014 ला संध्याकाळी 6.40 वाजता प्राप्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राची प्रत दिली. देवेंद्र फडणवीस बरोबर एकनाथ खडसे-पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे-पालवे या भाजप कोअर कमिटी सदस्याचे हस्ताक्षर असलेल्या पत्राची प्रत दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना कळविण्यात आले की भारतीय जनता पक्ष ही या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने मा. महोदय आपण आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी. आत्ताची राजकीय परिस्थितीही तशीच आहे, मात्र, राज्यपाल आमदारांची यादी मागत आहे, संख्याबळाचे पत्र मागत आहे. त्यामुळं 2014 ला राज्यपाल कार्यालयाने जे नियम लावले ते आता का लावले जात नाहीत? असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्लीमधील बैठक संपली आहे. यावेळी सर्व मुद्द्यांवर आपलं एकमत झालं असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. बैठकीनंतर राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्या मुंबईत निवडणुकीच्या आधी आघाडीत असणाऱ्या घटकपक्षांशी चर्चा करुन त्यांना माहिती देणार असल्याचं सांगितलं. काय होती 2014 ची राज्यातील परिस्थिती 2014 मध्ये शिवसेना-भाजप दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीही स्वतंत्र लढली होती. पण, निकालानंतर सेना-भाजपने युती केली. त्यात भाजपनं 122 तर, शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या होत्या. यावेळी सुरुवातीला शिवसेना सोबत न आल्याने भाजपने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केले होते. यावेळी कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा आमदारांची यादी भाजपकडून राजपालांना देण्यात आली नव्हती. अशी माहिती माहिती अधिकारात समोर आली होती. संबंधित बातम्या :  औरंगाबादमधील वकिलाची उद्धव ठाकरेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची मुंबईत बैठक Chhagan Bhujbal | अडीच वर्ष की पाच वर्ष ठाऊक नाही, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल - छगन भुजबळ | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Ashok Kharat: 'स्पॉट व्हिजिट'साठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदूबाबाला अलिशान गाड्यांचाही शौक; अशोक खरातच्या 'व्हीआयपी' दरबाराचा पर्दाफाश
'स्पॉट व्हिजिट'साठी 5 लाख घ्यायचा, अमावस्या-पौर्णिमेला भक्तांच्या भल्यामोठ्या रांगा, भोंदूबाबाला अलिशान गाड्यांचाही शौक; अशोक खरातच्या 'व्हीआयपी' दरबाराचा पर्दाफाश
Rupali Chakankar Ashok Kharat Case Nashik Crime News: काल टाळलं, आज हजर राहणार?; अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या...
काल टाळलं, आज हजर राहणार?; अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या...
Beed Crime: बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी लिहून गळ्याला लावला दोर
बीडमध्ये प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट, मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण; छळामुळे तरुणाने चिठ्ठी लिहून गळ्याला लावला दोर

व्हिडीओ

Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Embed widget