2019 च्या मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरीचं शुद्धीकरण, पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी; खासदार-आमदारांची उपस्थिती
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीने 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासेसोबत लग्न केलं होतं.

पुणे: काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील एका मुलीचे अपहरण केल्याची घटना घडल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी तिने आपण स्वत:हून पळून गेल्याचा व्हिडिओ बनवत लग्न केल्याची माहितीही दिली होती. त्यानंतर, लव्ह जिहाद (Love jihad) म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह काहींनी हा मुद्दा उचलून धरल्याचं दिसून आलं. त्यातच, आता पिंपरी चिंचवडमधील सायलीने आपल्या पतीला सोडून पुन्हा हिंदू (Hindu) धर्मात वापसी केली आहे. 2019 ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी सायली सुर्वे हिचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात समाविष्ट करण्यात आलं. लग्नानंतर मला 4 मुले झाली आहेत, त्या मुलांसाठीच माझा छळ होत असतानाही मी सासरी राहिल्याची कबुली सायलीने धर्मांतरानंतर दिली आहे.
पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीने 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासेसोबत लग्न केलं होतं. विशेष म्हणजे सायलीच्या लग्नास कुटुंबीयांचा विरोध होता, पण घरच्यांचा विरोध झुगारून तिने आतिफसोबत लग्न केलं. मात्र, आतिफशी लग्न करणे आपली चूक होती, लग्न झाल्यानंतर सासरी सातत्याने आपला छळ करण्यात आल्याचं सायलीने हिंदू धर्मात घरवापसी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. लग्नानंतर कुंटुबीयाकडून माझा छळ करण्यात आला, आणि आपलं धर्मांतरण देखील केल्या गेलं. याबाबत अनेकवेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील सायली यांनी म्हटले. पोलीस प्रशासनाकडे अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिदुत्वादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि आता त्यांच्यामार्फतच आपल्याला हिंदू धर्मात प्रवेश दिल्याचेही सायलीने सांगितले.
सायलीला हिंदू धर्मात प्रवेश, नवं नाव
सायलीला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी धर्प पद्धतीने होम हवन मंत्रोच्चार करण्याची प्रक्रिया राबविल्या गेली. विशेष म्हणजे खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार उमा खापरे यांच्यासह बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायलीची हिंदू धर्मात वापसी करण्यात आली. याशिवाय, सायली सुर्वेच लग्नानंतर अतेझा तासे असं नामकरण करण्यात आलं होतं ते नाव बदलून शुद्धीकरण प्रक्रियेत पुन्हा तिचं नवं नामकरण करण्यात आलं आहे. आता, तिला अद्या सुर्वे हे नावं देण्यात आल्याची माहिती आहे.
हेही वाचा





















