एक्स्प्लोर

Aurangabad Corona : औरंगाबादमध्ये एकीकडे कोरोना वाढतोय तर दुसरीकडे अधिकाऱ्यांचा इगो अन् बेजबाबदार लोकप्रतिनिधी!

Aurangabad lockdown : औरंगाबादमध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोघेही आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत हे आता हळूहळू सर्वसामान्य लोकांनाही कळू लागले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढत चालल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा आकडा प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी एकमेकांना जुमानत नसल्यानं कोरोनावर मात कशी करायची असा प्रश्न औरंगाबादकराना पडलाय. अधिकाऱ्यांचा इगो आणि राजकरण्याचा बेजबाबदारपणामुळे औरंगाबादचं काय होईल आणि औरंगाबादला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

औरंगाबाद शहरात आजपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला होता. मात्र या निर्णयाला काही भाजप, मनसे, एमआयएम आणि व्यापाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा विरोध होता. सोबतच शहरातील नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात आणखी काही शिथिलता मिळावी आणि राज्याच्या नव्या नियमावलीवरून लॉकडाऊनबाबतचा निर्णय  घेण्यासाठी 31 मार्चपासून असलेला लॉकडाऊन स्थगित करण्यात आला.
 
मंगळवारी रात्री हा निर्णय झाल्यानंतर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील भलतेच खूश झाले. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि भर रस्त्यात कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला. हारतुरे घालून घेतले. मात्र, हे करताना कोरोनाबाबतच्या नियमांची पूर्णतः पायमल्ली झाली. याची जाणीव खासदारांना नसावी का, असा प्रश्न सर्वांना पडलाय.
 
 त्यामुळे आता एकीकडे लॉकडाऊन करू नका असं सांगत प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या आणि रस्त्यावर नियमांची पायमल्ली करणाऱ्या खासदारावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.  लोकांना कोरोनाबाबतचे नियम सांगायचे आणि आपण मात्र खुशाल नियम मोडायचे अशांवर कारवाई करण्यासाठी भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमत होत पोलीस ठाणे गाठले. इतकंच नाही तर अधिकारीही बेजबाबदार असल्याची टीका केली. 
 
हे झालं आता औरंगाबाद शहरातल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचं वर्तन. दुसरीकडे अधिकारी  त्यापेक्षा अधिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. जिल्हाधिकारी, महानगरपालिका, आयुक्त पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यात लॉकडाउन लावायचे की लावायचे नाही, कोणते नियम शिथिल करायचे आणि कोणते नियम कडक करायचे याबाबत एकवाक्यता नाही. इतकंच काय तर एकाने घेतलेला निर्णय दुसऱ्याच्या पसंतीला उतरत नसल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यात आज संध्याकाळपर्यंत लॉकडाऊनची पुढची दिशा काय आहे? आणि रस्त्यावर जल्लोष करणाऱ्या खासदारावर कारवाईचे काय केले हे कळलेच नाही. 

अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोघेही आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत हे आता हळूहळू सर्वसामान्य लोकांनाही कळू लागले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होण्याऐवजी तो वाढत चालल्यामुळे औरंगाबादकरांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आता यावर सरकार काय निर्णय घेते हे पहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget