एक्स्प्लोर

पर्यटकांविना कोकणचे समुद्रकिनारे ओस पडले; सर्वत्र शुकशुकाट

पर्यटकांनी नेहमीच गजबजलेले कोकणातील समुद्र किनारे सध्या लॉकडाऊन, संचारबंदीमुळे ओस पडलेले आहेत.

रत्नागिरी : कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. उंच उंच नारळी पोफळीच्या बागा आणि त्यात कौलारू घरं. समुद्र किनाऱ्यावर येताच नजरेस पडणारा अथांग समुद्र किनारा आणि खळखळणाऱ्या लाटा. पर्यटकांनी नेहमीच गजबजलेले कोकणातील समुद्र किनारे सध्या लॉकडाऊन, संचारबंदीमुळे ओस पडलेले आहेत. 

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, आंजर्ले, गुहागर, केळशी, पाळंदे इत्यादी समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची रेलचेल नेहमीच सुरु असते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यात लॉकडाऊनसदृश नियम लागू करण्यात आले आणि त्यात कोकणातील समुद्र किनारे बंद करण्यात आले. त्यातीलच एक दापोलीतील पाळंदे समुद्र किनारा. 

दापोली शहरापासून जवळच असलेला हा समुद्रकिनारा. त्यामुळे इथे नेहमीच येणाऱ्या पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असते. पण सध्या किनाऱ्यावर निरागस शांतता आणि समुद्राच्या वाहणाऱ्या लाटांचा आवाज या किनाऱ्यावर फक्तं ऐकू येतोय. किनाऱ्यावर असलेली हॉटेल्स, दुकानं, टपरी बंद असल्याने सर्वत्रच शुकशुकाट असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या या किनाऱ्यावरील लाटांवर पक्षी भ्रमण करतांनाचे चित्र पहायला मिळत आहे. 

कोकणात पहिल्या लॉकडाूनच्या वेळीही पर्यटकांनी अशीच पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आणि पुन्हा एकदा कोकण पर्यटकांनी खुलून गेलं होतं. इथल्या स्थानिकांच्या व्यवसायालाही चालना मिळाली होती. पण, पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आणि ही घडी विस्कटली.

Amarnath Yatra 2021: 28 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा; भाविकांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस प्रारंभ

हे चित्र फक्त दापोलीच्या किनाऱ्यावरील आहे अशातला भाग नाही, तर कोकणात सध्या सर्वत्र अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये सक्तीचा लॉकडाऊन पाळण्यात येत असल्यामुळं तिथं अत्यावश्यक सेवांची दुकानंसुद्धा क्वचितच उघडी दिसत आहेत. त्यामुळं कोकण पट्टयामध्ये सध्या कमालीची शांतता दिसून येत आहे. 

मागील काही दिवसांपूर्वी बऱ्याच चाकरमान्यांनी कोकण गाठला आहे. त्यामुळे गावांमध्ये गजबजाट असला तरीही कोकणातील रस्ते, बाजारपेठा आणि समुद्रकिनारे मात्र निर्मनुष्य आहेत. इतकंच नव्हे तर मुंबई- गोवा महामार्गावरही वाहनांची रेलचेल लक्षणीयरित्या कमी झाली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा वगळता या भागात कोणतीही वाहनं दिसून येत नाहीत. त्यामुळं संचारबंदीच्या नियमांनी कोकणाचं चित्र पुरतं बदललं आहे, असंच म्हणावं लागेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Embed widget