एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची तीन दिवसांपासून विश्रांती, राजाराम बंधाऱ्यावरून महिनाभराने पाणी ओसरले

Kolhapur Rain Update: पावसाने विश्रांती घेतल्याने आता केवळ तीन बंधाऱ्यावर पाणी असून उर्वरित सर्व बंधाऱ्यांवरील पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. केवळ पंचगंगा नदीवरील 3 बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर पाऊस : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने पूर्णत: उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पारा 28 अंशापर्यंत उन्हाचे चटकेही जाणवू लागले आहेत. सायंकाळ झाल्यानंतर थंडीही जाणवत असल्याने नागरिकांच्या तब्येतीवरही परिणाम होत आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने आता केवळ तीन बंधाऱ्यावर पाणी असून उर्वरित सर्व बंधाऱ्यांवरील पाणी ओसरल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. केवळ पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, रुई आणि इचलकरंजी असे 3 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 15 फुटांपर्यंत खाली आली आहे.  

कोल्हापुरात (Kolhapur News) राजाराम बंधारा तब्बल महिनाभरापासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. राधानगरी धरणाचेही सर्व दरवाजे बंद असून केवळ पाॅवर हाऊसमधून भोगावती नदी पात्रात 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात 4.9 मिमी पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे

हातकणंगले- नाही, शिरोळ - नाही, पन्हाळा- 1, शाहूवाडी- 0.6 मिमी, राधानगरी- नाही, गगनबावडा-4.9 मिमी, करवीर- 0.2 मिमी, कागल- 0.1 मिमी, गडहिंग्लज- नाही, भुदरगड- 1 मिमी,  आजरा- नाही, चंदगड- 1.4  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणीसाठा

कोल्हापूर जिल्ह्यात धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची माहिती तसेच जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. धरणांचे नाव, आजचा पाणीसाठा (टीएमसी मध्ये) आणि धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता (टीएमसीमध्ये) कंसामध्ये आहे. जिल्ह्यातील राधानगरी, कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा व जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी - 8.11 (8.361 टीएमसी), तुळशी 2.69 (3.471 टीएमसी), वारणा 29.64  (34.399 टीएमसी), दुधगंगा 21.08 (25.393 टीएमसी), कासारी 2.63 (2.774 टीएमसी), कडवी 2.52 (2.516 टीएमसी), कुंभी 2.44 (2.715 टीएमसी), पाटगाव 3.39 (3.716 टीएमसी), चिकोत्रा 1.30 (1.522 टीएमसी), चित्री 1.89 (1.886 टीएमसी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.45 (1.560), जांबरे 0.79 (0.820 टीएमसी ) आंबेओहोळ  1.24 (1.240 टीएमसी ), कोदे ल.पा. 0.21 (0.214 टीएमसी )

दरम्यान, काळम्मावाडी धरण 25.39 टीएमसीपैकी 21.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातील गळतीमुळे हे धरण 19 टीएमसीपर्यंत भरले जाणार होते. दरम्यान, गळतीचा अंदाज आणि लोकांच्या मागणीनुसार आणखी दोन टीएमसी पाणीसाठा वाढवला आहे. 

सलग पाऊस गायब झाल्याने चिंता 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला, तरी अधूनमधून जोरदार सरी येत असल्याने पिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने पिकांची काळजी वाढली आहे. माळरानावरील भुईमूग, भात, सोयाबीन ही पिके पाऊस पूर्णपणे उघडल्यास अडचणीत येऊ शकतात.  

इतर महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget