एक्स्प्लोर

Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखवायची आहे! अजित पवारांचा थेट इशारा 

Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखववून देऊ, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेन अजित पवार यांनी कोल्हापूरमधील शिवसेना बंडखोरांना थेट इशारा दिला.

Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखववून देऊ, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेन अजित पवार यांनी कोल्हापूरमधील शिवसेना बंडखोरांना थेट इशारा दिला. अजित पवार यांच्या हस्ते आज पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी बोलताना शिंदे फडणवीस सरकारवर चौफेर हल्ला चढवला. शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी न्यायालयात खेचल्याबद्दलही त्यांनी चांगलेच शिंदे गटाला सुनावले.

शिंदे फडणवीस सरकार जातीय तेढ निर्माण करत आहे, जातीपातीचा विचार करून चालणार नाही. आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा जे आमदार बाहेर पडले ते सगळेच पुढील निवडणुकीत पडल्याचे ते म्हणाले. भुजबळांसोबत आलेले 19 आमदार पडले, राणेंसोबत आलेले आमदारही पराभूत झाले. राणे पोटनिवडणुकीतही पडले. अजित पवार पुढे म्हणाले, बरेच लोक पंचायत कार्यालयाच्या उद्नघाटनसाठी तुम्ही या म्हणत होते. मी बऱ्याच दिवसांपूर्वी तारीख दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून दोन दिवस पाऊस होता. कोल्हापूरहून निघाल्यानंतरही पाऊस होता, पण पाऊस न पडता सभा पार पडली. पाऊस आणि राष्ट्रवादीचं जवळचं नातं आहे. मी मिरवणुकीला सहसा येत नाही, पण कोणाला नाराज केलं नाही. कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलं. हाच उत्साह कायम ठेवायचा आहे. रॅलीतील सहभागी तरुणांचे आभार मानतो, महाराष्ट्रात बदल करून दाखवायचा आहे.

शिंदे गटावर हल्लाबोल 

ते 50 खोके एकदम ओके आहे, हे महाराष्ट्रात घडलं नव्हतं. शिवसेना दसरा मेळावा ही बाळासाहेबांची परंपरा आहे. मात्र, शिवसेनेला कोर्टात जावं लागलं. दुसऱ्याचा विचार ऐकू देणार नाही, असं कसं चालेल? याचा विचार केला पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते, जी जबाबदारी द्याल ती पार पडू. तोंडी सांगून सर्वसामान्यांचे सरकार होत नाही, दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे स्वत:हून माणसे आल्याचे हात उंचावून वारंवार सांगत होते. मग स्वत:हून आलेली निम्मी माणसं मध्येच का निघून गेली, निम्म्या खूर्च्या रिकाम्या का झाल्या? असा सवालही त्यांनी केला. 

तिथं माणसं नाहीत, जनावर राहतात का? 

दोन वर्ष कोरोनाने अडचणी होत्या, निधीला अडचणी होत्या. आम्ही आमदारांचा निधी 5 कोटी निधी केला. कोणताही भेदभाव केला नाही. मंजूर केलेली कामं यांनी थांबवली, तिथं माणसं नाहीत, जनावर राहतात का? भाजपच्या आमदारांना निधी देणार बाकीच्यांना नाही? थोडं उण्णीस बीस होईल, पण सत्ताधारी आमदारांना 50 कोटी दिले, तर 25 कोटी विरोधी आमदाराला दिले पाहिजेत. कारण तो साडे तीन ते पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करतो. ताम्रपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही, एकनाथ शिंदे कायमचे बसायला आलेले नाहीत, 145 आकडा गेला की बाजूला व्हावं लागेल. 

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोना संकट आले. राज्याला कोरोना संकटातून बाहेर काडण्याचं काम केलं. सगळ्याचे सोंग करता येते, पण पैशाचे सोंग करत नाही, याचा विसर पडू देता कामा नये. संकट असतानाही शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार थांबू दिला नाही. राज्यावर कर्ज वाढू दिलं नाही. राज्य व्यवस्थित पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांचे मार्गदर्शन घेतले. विचारधारा वेगळी होती, पण मतभेदाचे प्रश्न वेगळे ठेवले. आता ते वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
खरात प्रकरणाची माहिती गृह खात्याला तीन महिन्यापूर्वी असताना मग का थांबवली होती? ती चौकशी खोलपर्यंत जाणार का? केसरकर, रूपालीताईंनी खुलासा करावा; सतेज पाटलांची मागणी
Kolhapur Crime News: 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं
25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Kolhapur jaggery: केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय
केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
Embed widget