एक्स्प्लोर

काय सांगता?; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; चक्क उन्हामुळे 144 कलम लागू, नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील कुठल्याही संस्थेने किंवा फर्मने आपल्या कामगारांना उन्हात काम करण्यास बाध्य करू नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 144 कलमान्वये आदेश पारित करण्यात आला आहेत

जळगाव: राज्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला असून विदर्भासह खान्देशात तापमानाचा उच्चांक पाहायला मिळत आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असल्याची माहिती असून उष्णतेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील गावात 100 पेक्षा जास्त शेळ्या दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे, उष्णतेच्या लाटेचा (summer) सामना करण्यासाठी आता प्रशासनही सज्ज झालं आहे. जिल्ह्यात पसरलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, तसेच उन्हात काम करण्याची वेळ कुठल्याही कामगारांवर येऊ नये, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाच्या अनुषंगाने सविस्तर स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील कुठल्याही संस्थेने किंवा फर्मने आपल्या कामगारांना उन्हात काम करण्यास बाध्य करू नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये 144 कलमान्वये आदेश पारित करण्यात आला आहेत. मात्र, या 144 कलमाचा अर्थ जमावबंदी अथवा लॉकडाऊन अशा अर्थाने काहीजण लावत आहेत , तो तसा लावण्यात येऊ नये, असेही जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भात माहिती देताना प्रसाद म्हणाले की, सध्या जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. त्यामुळे, अशा काळात नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने, उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

मुलांचे, महिलांचे आणि कामगारांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, त्यांना कोणीही उन्हात काम करण्यास बाध्य करू नये आणि तसे कोणी करत असेल तर 144 या कलमान्वये संबधित व्यक्ती देखील त्या संस्थेविरोधात तक्रार करू शकते, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले. तसेच, अशा प्रकारची तक्रार कोणी केल्यास संबंधित सरकारी यंत्रणांकडे या संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार कलमान्वये आहेत. मात्र, याचा अर्थ कोणीही जमाव बंदी लावण्यात आली किंवा लॉकडाऊन करण्यात आले आहे, असा काढू नये. त्यातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकते, असे स्पष्टीकरणही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. 

जळगाव अपघातीतील तिसऱ्या आरोपीला पोलीस कोठडी

जळगाव जिल्ह्यात रामदेव वादी येथे कार आणि दुचाकी अपघातामध्ये चार जणांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघाताली कारचालकासह कारमधील एकास काल पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर ध्रुव सोनावणे या तिसऱ्या कार मधे बसलेल्या संशयित आरोपीस देखील पोलिसांनी आज अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी, न्यायालयाने उर्वरित दोन आरोपींप्रमाणेच ध्रुव सोनावणे यासदेखील 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा

जळगावमध्ये उन्हाचा कहर; मुक्या जीवांना त्रास, 100 मेंढ्या दगावल्या; आमदाराने घेतली धाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP MajhaBhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP MajhaNagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफरABP Majha Headlines :  1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
जिंकली टीम इंडिया, पण अभिनंदन आशिष शेलारांचं, सभागृहात हल्लाबोल, विरोधकांचा सभात्याग
Embed widget