एक्स्प्लोर

नोटाबंदीमुळे देशात दंगली होऊ शकतात : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : नोटाबंदीची समस्या गंभीर आहे, नागरिकांना नोटा मिळाल्या नाहीत तर देशात दंगली होऊ शकतात, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने  केली आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अचानक बंद केल्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकांचा उल्लेख करत ही अतिशय गंभीर समस्या असल्याचं सांगितलं. नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध देशभरातील विविध उच्च न्यायालयांसह इतर न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकारने दाखल केली होती. पण सुनावणीला स्थगिती देणार नाही, असं सांगत सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर आणि अनिल आर. दवे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. सुप्रीम कोर्टानुसार, "नोटाबंदीमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि हे सत्य केंद्र सरकार नाकारु शकत नाही. परिस्थिती गंभीर होत आहे. अशा स्थितीत रस्त्यावर दंगलीही होऊ शकतात." "हे प्रकरण 'हाय मॅग्निट्यूड' सारखं आहे, कारण लोक त्याकडे आकर्षित होत आहेत. सर्वच लोक दिलासा मिळावा यासाठी हायकोर्टात येऊ शकत नाही, जे दिलासा मिळण्यासाठी हायकोर्टात जात आहेत, ते परिस्थिती गंभीर असल्याचं सिद्ध करत आहेत," असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. "तुम्ही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या, पण 100 रुपयांच्या नोटांचं काय झालं?," असा प्रश्नही सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी विचारला. त्यावर सरकारने उत्तर दिलं की, "सध्या एटीएममध्ये फक्त 100 रुपयांच्या नोटांसाठीच ड्रॉव्हर आहे, म्हणून नव्या नोटांसाठी आम्हाला री-कॅलिब्रेट करायला लागेल." सरकारच्या या उत्तरानेही सर्वोच्च न्यायालयाचं समाधान झालं नाही. "जनतेला दिलासा मिळावा या दिशेने काम करत आहे, असं तुम्ही मागच्या वेळी सांगितलं होतं. पण तुम्ही तर पैसे बदलण्याची मर्यादा 2000 रुपये केली. अडचण नेमकी काय आहे? नोटांच्या प्रिटिंगसंबंधित काही अडचण आहे का?," असे प्रश्न सरन्यायाधीशानी सरकारला विचारले. यावर सरकारच्या वकिलांनी उत्तर दिलं की, "केवळ प्रिटिंग नाही तर देशभरातील बँकांच्या लाखो शाखांमध्ये नोटा पोहोचवायच्या आहेत. तसंच एटीएमही री-कॅलिब्रेट करायचे आहेत. पण आम्ही शेतकरी, लहान व्यापारी आणि लग्न असणाऱ्यांना दिलासा दिला आहे."

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget