एक्स्प्लोर

Maharashtra Government Formation | राज्यात लवकरच नवं सरकार स्थापन होईल : मुख्यमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 40 मिनिटं बैठक झाली. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण सरकारस्थापने बाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्याला नव्या सरकारची गरज आहे. लवकरच ते स्थापन होईल, असंही म्हटलं. पण यावेळी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी युती शब्द टाळला.

नवी दिल्ली : "महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, याबाबत मी आश्वस्त आहे," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ता स्थापनेवरुन दिली. भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी हे भाष्य केलं. तसंच सत्तेच्या समीकरणासंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेचा निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतर अकराव्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. भेटीचा विषय अवकाळी पाऊस नुकसानग्रस्तांच्या मदतीचा असला तरी त्यात राज्यातील सत्ता स्थापनेचा मुद्दा नक्कीच उपस्थित झाला असणार. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना अवकाळी पाऊस नुकसानीसोबत सत्ता स्थापनेबाबत भाष्य केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, "सत्तेच्या समीकरणारसंदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधील कोणीही टिप्पणी देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्यकता आहे आणि ते लवकरच बनेल, याबाबत मी आश्वस्त आहे." राज्यात नवं सरकार लवकरच स्थापन होईल हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळला. तसंच सरकार कधी आणि कसं स्थापन होणार हे देखील सांगितलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत युतीमधील तिढा लवकरात लवकर सुटण्याची शक्यता नाही. भाजप नेतृत्त्वाने आक्रमक राहण्याचा सल्ला दिल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. संबंधित बातम्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहेत. मात्र सत्तास्थापनेवरुन दोन्ही पक्षांमधील संघर्षामुळे मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट होऊ शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेसाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेना करत आहे. मात्र शिवसेनेची ही मागणी भाजपला मान्य नाही. त्यामुळे आता शिवसेना-भाजपचं राज्यात सरकार पुन्हा येणार की कोणती नवी समीकरणं जुळणार याची उत्सुकता आहे. गृहमंत्र्यांनी जास्तीत जास्त मदतीचं आश्वासन दिलं : मुख्यमंत्री अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अमित शाह यांची भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले की, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात अवकाळी पाऊस झाला, मात्र चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने 325 तालुक्यात शेतीचं नुकसान झालं. अनेक तालुक्यांमध्ये, गावांमध्ये 100 टक्के नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारकडे निवेदन घेऊन आलो. कारण या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री असतात. नुकसानीचं संपूर्ण मोजमाप त्यांच्यासमोर ठेवलं. केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली. शाहांनी माझ्यासमोर विविध सचिवांशी बोलून त्यांना निर्देश दिले. विम्याची मदत नीट मिळावी म्हणून गृहमंत्री विमा कंपन्यांशी बैठक घेणार आहेत. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळेल असं आश्वासन त्यांनी दिलं."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sansad Ratna Awards 2026 : संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्राला पाच पुरस्कार, कोणकोणत्या खासदारांनी राज्याचं नाव उज्ज्वल केलं?
संसद रत्न पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्राला पाच पुरस्कार, कोणकोणत्या खासदारांनी राज्याचं नाव उज्ज्वल केलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
Anna Hazare on Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीबाबत अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला महत्त्वाचा सल्ला; म्हणाले, त्यांना....
कॉक्रोच जनता पार्टीबाबत अण्णा हजारेंचा केंद्र सरकारला महत्त्वाचा सल्ला; म्हणाले, त्यांना....
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
Balochistan Attack: बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती
Nashik News: खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
खेळता खेळता बाथरूममध्ये गेली अन्...; पाण्याच्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू; नाशिकमध्ये मन सुन्न करणारी घटना
Embed widget