एक्स्प्लोर

Shivaraj Patil: महाभारतातील जिहादवरून गदारोळ, शिवराज पाटील यांनी स्पष्टच सांगितले

Shivaraj Patil: महाभारतात जिहाद असल्याच्या वक्तव्यानंतर राजकीय गदारोळ झाल्यानंतर आज माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी वादावर भूमिका स्पष्ट केली आहे.

Shivaraj Patil: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील (Shivraj Patil) यांनी भगवद्गीतेची तुलना जिहादसोबत केल्याचा दावा करत राजकीय वाद निर्माण झाला. गुरुवारी केलेल्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत विरोधक वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचे म्हटले. आपण उपस्थितांना काही प्रश्न विचारले होते, असेही त्यांनी म्हटले.

शिवराज पाटील यांनी म्हटले की, चांगल्या गोष्टींसाठी, माणसाच्या संरक्षणासाठी कोणी शस्त्र उचलले तर त्याला जिहाद म्हणता येणार नाही. महाभारतात दुर्योधनाने जे कृत्य केले त्याला जिहाद असे म्हणू शकता. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धापासून पळ न काढता त्याला सामोरे जाण्यास सांगितले. हा जिहाद नव्हता. लढाई, युद्ध सगळ्याच देशांमध्ये, धार्मिक ग्रंथात असल्याचे त्यांनी म्हटले. 

जिहादबाबत बोलताना शिवराज पाटील यांनी म्हटले की, तुम्ही कुराण वाचले का? कुराणानुसार, देव एक आहे. त्याला रंगरुप, आकार नाही. ज्यू आणि ख्रिश्चनांमध्येदेखील असेच म्हटले जाते. हिंदूच्या जुन्या ग्रंथातही याबाबत नमूद करण्यात आल्याच त्यांनी म्हटले. लढाई, युद्ध सगळ्या देशांमध्ये आहे.  महाभारत, रामायणात युद्ध आहे. पहिले महायुद्ध, दुसरं महायुद्ध झाले. युद्ध तुम्हाला काही प्रमाणात काही करावे लागते, असेही त्यांनी सांगितले. 
वेळेप्रसंगी युद्ध करावेच लागते. 

जिहाद आणि युद्धाची संकल्पना वेगळी असल्याचे शिवराज पाटील यांनी स्पष्ट करताना सांगितले की, जिहाद म्हणजे स्वार्थासाठी केलेले युद्ध आहे. तर, युद्ध हे संरक्षणासाठी, योग्य कारणांसाठी केले जाते. श्रीकृष्णाने गीतेत सांगितले की, तू लढ, कर्तव्यापासून दूर पळून न जाण्यास सांगितले, याला तुम्ही जिहाद म्हणणार का, असा उलट प्रश्न त्यांनी केला. 

सरसंघचालकही भाष्य करणार नाहीत

शिवराज पाटील यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यावर बोलताना पाटील यांनी सांगितले की, सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा माझ्या या विधानावर अद्याप बोलले नाहीत. ते बोलतील असं वाटत नाही. मला काय म्हणायचे आहे, ते आधी समजून घेतील. गावातील भाजपचे नेते काय बोलतात याला महत्त्व देत नसल्याचे पाटील यांनी म्हटले. 

काय म्हणाले होते शिवराज पाटील? 

शिवराज पाटील यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. ते म्हणाले की, "मनामध्ये कोणतीही संशय नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे."

पाहा व्हिडिओ: Shivraj Patil clarifies On jihad : जिहादवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवराज पाटील याचं स्पष्टीकरण : ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maitreya Dadashree: 'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
'एकाच पृथ्वीसाठी चला आपण एक होऊयात'; मैत्रेय दादाश्रींचे जागतिक शांततेसाठी भावनिक आवाहन
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget