एक्स्प्लोर

सरन्यायाधीशांविरोधात कट कारस्थान? वकिलाच्या दाव्याची सुप्रीम कोर्टाकडून गांभीर्याने दखल

सरन्यायाधीशांविरोधात आरोप लगावण्यासाठी मला दीड कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावाही उत्सव बॅन्स नावाच्या वकिलाने केला आहे. प्रकरण संशयास्पद असल्यामुळे त्याने नकार दिला आणि थोडी चौकशी केली

नवी दिल्ली : 'एक निष्ठावान सरन्यायाधीश आपलं नेटवर्क नेस्तनाभूत करत आहे, म्हणून काही जण या जजच्या विरोधातच कट कारस्थान रचायला सुरुवात करतात. देशाच्या सर्वात मोठ्या कोर्टात अशा 'फिक्सर'ची उपस्थिती आहे, जी न्यायालयाच्या निकालांवर परिणाम साधण्याचा प्रयत्न करत आहे' वकील उत्सव बॅन्स यांच्या दाव्यामुळे सुप्रीम कोर्ट आश्चर्यचकित झालं आहे. कोर्टाने या मुद्द्याच्या तपासावर चर्चा करण्यासाठी सीबीआय, आयबी आणि पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप करणाऱ्या कोर्टाच्या माजी महिला कर्मचाऱ्याशी निगडीत हे प्रकरण आहे. विरोध केल्यामुळे आपल्याला नोकरीवरुन काढून टाकल्याचा दावा तिने केला आहे. संबंधित महिलेला डिसेंबर महिन्यात निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर, एका वकिलाने प्रतिज्ञापत्र दाखल करुन सरन्यायाधीशांविरोधात कट कारस्थान रचलं जात असल्याचा दावा केला आहे. सरन्यायाधीशांच्या कडक शिस्तीमुळे ज्यांचे गोरखधंदे उघडकीस आले, अशा लोकांनी हा कट रचल्याचं वकिलाचं म्हणणं आहे. सरन्यायाधीशांविरोधात आरोप लगावण्यासाठी मला दीड कोटी रुपयांची ऑफर दिली होती, असा दावाही उत्सव बॅन्स नावाच्या वकिलाने केला आहे. प्रकरण संशयास्पद असल्यामुळे त्याने नकार दिला आणि थोडी चौकशी केली. कोर्टात मनाजोगता निकाल लागू न शकल्यामुळे कॉर्पोरेट विश्वातील एक व्यक्ती आणि काही दलाल सरन्यायाधीशांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला समजलं, असं त्याने सांगितलं. सरन्यायाधीशांना पदावरुन पायउतार होण्यास भाग पाडण्याचा त्यांचा उद्देश असल्याचं वकिलाचं म्हणणं आहे. VIDEO | सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचे आरोप, रंजन गोगोईंकडून आरोपांचं खंडण | एबीपी माझा वकीलाच्या प्रतिज्ञापत्रावर आज सकाळी साडेदहा वाजता जस्टिस अरुण मिश्रा, रोहिंटन नरीमन आणि दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वकीलाला आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्यास सांगण्यात आलं. वकीलाने सीलबंद लिफाफ्यात काही कागदपत्रं सुपूर्द केली. लिफाफ्यात काही सीसीटीव्ही फूटेज असून कट समजण्यास मदत होईल, असंही वकीलाने यावेळी सांगितलं. खंडपीठाने कागदपत्र पाहून हे प्रकरण गंभीर असल्याचं मत व्यक्त केलं. 'कोर्टात फिक्सर असणं, बाहेरच्या व्यक्तींशी त्यांनी केलेल्या हातमिळवणीचा दावा आश्चर्यकारक आहे. या पैलूंच्या तपासाची गरज आहे. सीबीआय निर्देशक, आयबी निर्देशक आणि दिल्ली पोलिस आयुक्तांनी साडेबारा वाजता भेटावं. पुढील सुनावणी तीन वाजता होईल' असं न्यायाधीशांनी सकाळी सांगितलं. तीन वाजता कोर्ट वकीलाच्या आरोपांची पडताळणी करण्यासाठी एसआयटी गठित करण्याचे आदेश देईल, असं मानलं जात होतं. मात्र कोर्टाने वकिलाला आणखी काही प्रश्न विचारले. कट रचणाऱ्यांमध्ये तिघा माजी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याबद्दल कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं. यापैकी दोघा कर्मचाऱ्यांना उद्योगपती अनिल अंबानींच्या प्रकरणात आदेश बदलल्याबद्दल निलंबित करण्यात आलं होतं. अवमानना प्रकरणात अनिल अंबानींना कोर्टात हजर राहण्यास सूट दिल्याचा आदेश प्रकाशित केला होता, प्रत्यक्षात कोर्टाने अशी कोणतीही सूट दिली नव्हती. तिसरी कर्मचारी ही सरन्यायाधीशांवर आरोप करणारी महिला आहे. कोर्टाने वकिलाला आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ पुरावे देण्यास सांगितलं आहे. उद्या सकाळी साडेदहा वाजता पुन्हा यावर सुनावणी होईल. महिलेच्या आरोपांची चौकशी महिलेने सरन्यायाधीशांवर केलेल्या आरोपांना कोर्टाने गांभीर्याने घेतलं आहे. नियमानुसार तक्रारीच्या तपासासाठी अंतर्गत समिती (इन हाऊस कमिटी) स्थापन करण्यात आली आहे. तीन जजच्या या समितीमध्ये जस्टिस एस ए बोबडे, एन वी रमना आणि इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमध्ये सेवाज्येष्ठतेनुसार जस्टिस बोबडे हे दुसऱ्या, तर रमना तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तक्रारदार महिलेला आपली बाजू मांडण्यासाठी उद्या बोलावलं आहे. कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलला या प्रकरणी कागदपत्रं सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget