एक्स्प्लोर

जम्मू काश्मीरमध्ये हालचालींना वेग, 28 हजार सैनिक तैनात

अचानक 280 पेक्षा जास्त कंपन्या म्हणजेच (28 हजार जवान) रात्री उशिरापर्यंत तैनात करण्याचं कोणतंही कारण दिलं नाही. शहरात प्रवेश करणारे आणि बाहेर जाणारे सर्व रस्ते सीआरपीएफच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण असून त्यांनी आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असतानाच खोऱ्यात सुरक्षा दलाच्या 280 कंपन्या (28 हजार जवान) तैनात करण्यात येत आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील तसंच खोऱ्यातील इतर ठिकाणांवर जवान तैनात केले जात आहे. या सुरक्षा दलांमध्ये केंद्रीस राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि भारत-तिबेत सीमा पोलिस (आयटीबीपी) यांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अशाप्रकारे अचानक 280 पेक्षा जास्त कंपन्या म्हणजेच (28 हजार जवान) रात्री उशिरापर्यंत तैनात करण्याचं कोणतंही कारण दिलं नाही. शहरात प्रवेश करणारे आणि बाहेर जाणारे सर्व रस्ते सीआरपीएफच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण असून त्यांनी आवश्यक वस्तू खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. तर स्थानिक पोलिसांची उपस्थिती नाममात्र आहे. याआधी केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल काश्मीर दौऱ्यावरुन परत येताच दहा हजार जवान तिथे पाठवण्याचा आदेश दिला होता. जेणेकरुन बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची घडी बसवता येईल आणि दहशतवादविरोधी अभियान आणखी वेगाने करता येईल. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. "सरकारच्या या निर्णयाने काश्मीर खोऱ्यात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे," असं ट्वीट त्यांनी केलं आहे. एअरलिफ्ट करुन सीआरपीएफ जवान काश्मीरमध्ये देशातील विविध भागात तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांना एअरलिफ्ट करुन थेट काश्मीरला पोहोचवलं जात आहे. या कामासाठी हवाई दलाची मालवाहतूक विमानांचा वापर केला जात आहे. जम्मू-काश्मीरचे महासंचालक दिलबाग सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या 100 आणखी कंपन्या तैनात केल्या जात आहेत. प्रत्येक कंपनीत 100 जवान असतील. गृह मंत्रालयाने 25 जुलै रोजी सीआरपीएफच्या अतिरिक्त 100 कंपन्या तैनात करण्याचा आदेश दिला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल गुपचूप काश्मीर खोऱ्यातून श्रीनगरमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळी बैठक केली. यामध्ये राज्यपालांचे सल्लागार के. विजय कुमार, मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यन, पोलिस महासंचालक दिलबाग सिंह, पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त यांचा समावेश होता. काश्मीर दौऱ्यावर दिल्लीतून आयबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीमही डोभाल यांच्यासोबत होती. काही धार्मिक स्थळांची सुरक्षा कमी केली काही धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. परदेशी दहशतवादी इथे तैनात पोलिसांवर हल्ला करण्याचा प्लॅन करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याचं अधिकार्यांनी सांगितलं. शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुवारी सुरु झालेली उन्हाळ्याची सुट्टी पुढील दहा दिवस असेल. अमरनाथ यात्रेसाठी सुरु असलेले लंगरही बंद करण्यात आले आहेत. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सुमारे 40 हजार जवान दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये अजूनही राज्यपाल राजवट आहे. याआधी 24 फेब्रुवारीला देशभरातून केंद्रीय निमलष्कर दलाच्या 100 कंपन्या काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त व्यवस्था आवश्यक असल्याचं तेव्हा सांगितलं होतं. मात्र अमरनाथ यात्राच्या सुरक्षेसाठी अजूनही केंद्रीय निमलष्करी दलाचे सुमारे 40 हजार अतिरिक्त जवान तैनात केलेले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
PM किसानसंदर्भात शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 2000 रुपये हवे असल्यास 'हे' काम करा, अन्यथा...
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
छोटी गुंतवणूक, मोठा फायदा! पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेद्वारे उभारा लाखो रुपयांचा निधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget