एक्स्प्लोर

भाजपसाठी 80 टक्के हिंदूच भारतीय, इतर धर्मीय देशातील पाहुणे; मणिशंकर अय्यर यांचा हल्लाबोल

Mani Shankar Aiyar काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. या देशातील हिंदूशिवाय इतर नागरिक भारतीय नाही असे भाजप नेत्यांना वाटत असल्याचे अय्यर यांनी म्हटले.

Manishankar Aiyar on BJP : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सत्तेत बसलेल्या लोकांसाठी फक्त 80 टक्के जनताच भारतीय आहे. इतर नागरिकांनी फक्त पाहुण्यांप्रमाणेच रहावे असे त्यांना वाटते असे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले. आमच्यादृष्टीने या देशातील सर्वच नागरिक हे भारतीय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील हिंदू आणि हिंदूत्वाच्या उल्लेखावरून वाद निर्माण झाला आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदूत्व हे भिन्न असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारसरणी देशासाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

मणिशंकर अय्यर काय म्हणाले? 

अय्यर यांनी म्हटले की, राहुल गांधी यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी हिंदू धर्म आणि हिंदूत्व यामध्ये फरक असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला जोडूनच म्हणेल की, आम्ही हिंदू धर्मावर विश्वास ठेवतो. आम्ही 100 टक्के भारतीय आहोत. या देशातील सर्व नागरिक भारतीय आहेत. सत्तेत असलेल्यांच्या दृष्टीने 80 टक्के हिंदू धर्मीय हेच भारतीय आहेत. इतर भारतीय नाहीत. 

भाजपवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, भाजपच्या दृष्टीने इतर धर्मीय हे भारतीय नाहीत. देशात त्यांनी फक्त पाहुणे म्हणूनच रहावे असे त्यांना वाटते. मनात येईल तेव्हा त्यांना या देशाबाहेर काढू. आमच्या धोरणांवर, मार्गावर त्यांनी वाटचाल करावी असे सत्तेत बसलेल्या लोकांना वाटत असल्याचे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले. 

नेहरू यांनाच भारतातील विविधता खोलवर समजली

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीचे स्मरण करताना अय्यर यांनी म्हटले की, भारतातील विविधता जवाहरलाल नेहरू यांच्याशिवाय कोणालाच अधिक समजली नाही. भारतात अनेक भाषा आहेत. अनेक वर्ण आहेत, अनेक प्रकारचे साहित्य, भाषा, कविता आहेत. याची त्यांना अधिक जाणीव होती असेही अय्यर यांनी म्हटले. 

वादाची सुरुवात कशी झाली?

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी आपल्या एका पुस्तकात हिंदुत्ववाद्यांची तुलना बोको हराम, आयसिससोबत केली होती. खुर्शीद यांच्या पुस्तकातील वादावरून काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आले. काँग्रेस नेत्यांनी हिंदू धर्म आणि हिंदूत्व भिन्न असल्याचे म्हटले. तर, भाजपने काँग्रेसवर निशाणा साधताना काँग्रेस हिंदू विरोधी असल्याचे म्हटले होते.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Live Blog Updates: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
Oracle Layoff : आयटी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ! जगप्रसिद्ध कंपनीकडून एकाचवेळी तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ, 12 हजार भारतीयांचा संसार उद्ध्वस्त
आयटी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ! जगप्रसिद्ध कंपनीकडून एकाचवेळी तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ, 12 हजार भारतीयांचा संसार उद्ध्वस्त?
Census 2027 : तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
Commercial LPG Cylinder: युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget