एक्स्प्लोर

छटपूजेत काही केलं नाही मग निवडणुकीत फक्त हरियाणातून बिहारला 4 विशेष रेल्वे का चालवल्या? ते परतून आले की नाहीत? कपिल सिब्बलांकडून गंभीर सवाल

बिहारला गेलेले हजारो लोक हे ‘व्यावसायिक मतदार’ (Professional Voters) आहेत जे एका ठिकाणाहून दुसऱ्या मतदारसंघात मतदानासाठी नेले जातात, असा गंभीर आरोप कपिल सिब्बल यांनी केला.

Kapil Sibal on Haryana Bihar Special Trains Before Polling: 6 नोव्हेंबरला बिहारमध्ये मतदान होत असताना, त्याच्या तीन दिवस आधी हरियाणातून चार विशेष रेल्वेगाड्या बिहारकडे  धावल्याने कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय आणि भाजपवर थेट आरोपांचा भडीमार केला आहे. सिब्बल यांनी हा प्रकार “सिस्टमॅटिक धांदलेबाजीचा नमुना” असल्याचं सांगत निवडणुकीपूर्वीचा हा मोठा घोटाळा असल्याचा दावा केला आहे. त्यांनी रेल्वे मंत्र्यांना आव्हान दिलं की, या गाड्यांचे बुकिंग कोणी केलं, आणि भाडं कोणी भरलं, हे देशासमोर स्पष्ट करावं.

हे प्रवासी नाहीत, ‘व्यावसायिक मतदार’ आहेत

सिब्बल यांनी दावा केला की, या ट्रेनमधून बिहारला गेलेले हजारो लोक हे ‘व्यावसायिक मतदार’ (Professional Voters) आहेत जे एका ठिकाणाहून दुसऱ्या मतदारसंघात मतदानासाठी नेले जातात. त्यांच्या मते, या लोकांकडे बनावट ओळखपत्रे असू शकतात, ईव्हीएम आणि मतदार यादीतील फेरफारात भाजप निष्णात आहे, आणि निवडणूक आयोग त्यांना अप्रत्यक्ष मदत करत आहे.

खर्च कोणी केला?  सिब्बल यांची विचारणा

या विशेष गाड्यांचा खर्च सरकारने केला की पक्षाने, यावर सिब्बल यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. “जर सरकारने खर्च केला, तर जनतेच्या पैशावर ही राजकीय सोय का? आणि जर सरकारने नाही, तर कोणत्या पक्षाने? आम्हाला माहिती आहे हा खर्च भाजपनेच केला आहे.” सिब्बल म्हणाले की, “हे लोक 3 ते 6 नोव्हेंबरदरम्यान बिहारमध्येच होते. त्यांना कुठेतरी ठेवण्यात आलं, खानपान देण्यात आलं, आणि त्यांनी मतदानात ‘काम’ केलं. आता प्रश्न असा आहे की,  हे लोक परत आलेत का? परतीची ट्रेन का नव्हती?” सिब्बल यांनी गंभीर आरोप केला की, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देऊन या गाड्या चालवल्या गेल्या, आणि त्यांना हरियाणा भाजप अध्यक्ष मोहन लाल व सरचिटणीस डॉ. अर्चना गुप्ता यांच्याशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले. सरकारकडून उत्तर मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत सिब्बल यांनी माध्यमांना थेट आवाहन केलं. “देशातील माध्यमांनी स्वतः या गाड्यांची सत्यता तपासावी. सरकारकडून उत्तर मिळणार नाही, पण लोकांसठी सत्य बाहेर आणणं ही माध्यमांची जबाबदारी आहे.”

सिब्बल यांचा रेल्वेमंत्र्यांना थेट सवाल

सिब्बल यांनी उघड केलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणातून बिहारसाठी चार विशेष ट्रेन धावल्या, ज्यामधून सुमारे 6,000 लोक बिहारला पोहोचले.

  • पहिली ट्रेन सकाळी 10 वाजता करनालहून बरौनीसाठी,
  • दुसरी सकाळी 11 वाजता करनालहून भागलपूरसाठी,
  • तर उर्वरित दोन गाड्या दुपारी 3 आणि 4 वाजता गुरुग्रामहून निघाल्या.

फक्त हरियाणातूनच या गाड्या चालवल्या गेल्या

सिब्बल म्हणाले की, “या चार गाड्या खरोखरच नमूद केलेल्या वेळी धावल्या होत्या का? याची सार्वजनिक पुष्टी करा.” ते  म्हणाले की, देशभरातील कोणत्याही दुसऱ्या राज्यातून नव्हे, तर फक्त हरियाणातूनच या गाड्या चालवल्या गेल्या. “छठ पूजेसाठी रेल्वेने ट्रेन चालवणे कठीण झालं होतं, पण निवडणुकीच्या तोंडावर मात्र विशेष गाड्या धावतात, का?” ते पुढे म्हणाले की, जर हे लोक बिहारचे खरे मतदार असतील, तर नियमित गाड्यांची सोय का नव्हती? आणि जर ते मतदार नसतील, तर हे स्पष्टच आहे की ‘धांदलेबाज मतदार’ पाठवले गेले. सिब्बल यांनी लक्ष वेधले की, या गाड्या ३ नोव्हेंबरला पोहोचल्या आणि मतदान ६ नोव्हेंबरला झालं. त्यामुळे दोन्ही घटनांमधील संबंध “अत्यंत स्पष्ट” असल्याचं त्यांनी म्हटलं.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget