एक्स्प्लोर

भारताला पुढची 10 वर्षे स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज : अजित डोभाल

भारताला सक्षम बनण्यासाठी पुढे जायचं असेल तर स्थिर सरकारची गरज असल्याचं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी व्यक्त केलंय. आघाड्यांचं सरकार हे निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतं. त्यामुळे भारताला किमान 10 वर्ष तरी स्थिर सरकारची गरज असल्याचं ते म्हणाले.

नवी दिल्ली : देशात राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढची दहा वर्ष एक मजबूत, स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज असल्याचं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं. कमकुवत आघाडी सरकार हे देशासाठी वाईट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. गेल्या चार वर्षात देशाची राष्ट्रीय इच्छाशक्ती जागृत झाल्याचं त्यांनी सांगितलं. ऑल इंडिया रेडिओकडून आयोजित सरदार पटेल स्मृती व्याख्यानात बोलताना अजित डोभाल यांनी हे मत मांडलं. लोकशाही ही भारताची ताकद असून ती सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. कमकुवत लोकशाहीमध्ये देशाला कमकुवत बनवणाऱ्या प्रवृत्ती असतात. या दृष्टीने भारताला पुढची काही वर्षे कमकुवत राहणं परवडणारं नाही. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं ते म्हणाले.
अजित दोभाल देशातील सर्वात शक्तिशाली नोकरशाह बनले!
''भारताची ताकद कमी झाली तर आपल्याला तडजोड करावी लागेल. तडजोड करावी लागत असेल तर तुमचं राजकीय अस्तित्व देशहितापेक्षा मोठं बनतं. अस्थिर राजकारण भारताला इच्छाशक्तीच्या दृष्टीने वाटचाल करणं कठीण करेन, कारण कमकुवत सरकार निर्णय घेण्यासाठी असमर्थ असतं,'' असं मत अजित डोभाल यांनी व्यक्त केलं.
स्पेशल रिपोर्टः अजित डोभाल... भारताचा चाणक्य
''भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. असे निर्णय हे लोकप्रियतेसाठीच असावेत हे देखील गरजेचं नाही. यासाठीच भारताला आपली राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान पुढची दहा वर्ष मजबूत, स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज आहे,'' असं अजित डोभाल म्हणाले. ''आघाड्यांचं सरकार हे देशासाठी चांगलं नाही. अस्थिर सरकार कोसळण्याची किंवा भ्रष्टाचार वाढण्याची भीती अधिक असते आणि स्थानिक राजकारणाचं हितच देशापेक्षा मोठं बनतं,'' अशी चिंताही अजित डोभाल यांनी व्यक्त केली.
उरी हल्ला : अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल
या भाषणात अजित डोभाल यांनी ब्राझीलचंही उदाहरण दिलं, जो देश जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत आहे, पण राजकीय अस्थिरतेमुळे ब्राझीलसमोर अनेक संकटं आहेत. 2030 पर्यंत भारताला निर्णायक सरकार आणि निर्णायक नेतृत्त्वाची गरज आहे, असं म्हणत धार्मित प्रतिबद्धतेसोबतच कायद्याचं सरकार ठेवण्यावरही त्यांनी भर दिला. संबंधित बातम्या :
एसपीजीच्या परवानगीविना मंत्री, खासदारांनाही मोदींच्या जवळ जाता येणार नाही
पीडीपीचा पाठिंबा काढण्याआधी अजित डोभाल, अमित शाहांची चर्चा
तणावादरम्यान अजित डोभाल चीन दौऱ्यावर जाणार!
दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ‘डोभाल प्लॅन’
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांचा अजित डोभाल यांना कॉल
देशविरोधी घोषणांवर समाजाचं मौन देशासाठी घातक : अजित डोबाल
भारत-पाक चर्चा रद्द झाल्याच्या वृत्ताचं अजित डोभालांकडून खंडन

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget