एक्स्प्लोर

Manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार? पाहा काय सांगतोय एबीपी माझाचा एक्झिट पोल

manipur Exit Poll 2022 : ABP Cvoter यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये मणिपूरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

manipur Exit Poll 2022 : मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही असा अंदाज ABP Cvoter एक्झिट पोलमध्ये (Exit Poll 2022) बांधण्यात येत आहे. मणिपूरमध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील. त्याखालोखाल काँग्रेसला जागा मिळतील अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. मणिपूर विधानसभेचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे. परंतु, त्याआधी एबीपी माझाच्या एक्झिट पोलमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  
 
एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार, 2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. 60 जागांसाठी  मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान झाले. सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. एबीपी माझाच्या एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये भाजप युतीला 23 ते 27 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाला 12 ते 16 जागा मिळू शकतात, तर एनपीएफला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावे लागेल. एनपीपीला 10 ते 14 जागा मिळतील. तर 2 ते 6 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 
पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. मणिपूरच्या कुचिंगमध्ये 2 मार्चच्या रात्री उशिरा काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला होता.   

दोन टप्प्यात मतदान
मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. यामध्ये अनेक मतदान केंद्रांवर बूथ कॅप्चरिंग आणि ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचे आरोप झाले होते. या प्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने अनेक मतदान केंद्रांवर पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश दिले.5 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी  झाले.  

पहिल्या टप्प्यात 78 टक्के मतदान
मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी ७८.०३ टक्के मतदान झाले होते.तर दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 76.62 टक्के मतदान झाले होते.

एक्झिट पोलमधून तंतोतंत आकडेवारी समोर येत नसली, तरी मतदारांचे प्रश्न तात्पुरत्या स्वरुपात शमतात. कारण एक्झिट पोलमधून वर्तवले जाणारे अंदाज हे बहुतांश वेळा अंतिम निकालाच्या जवळपास जाणारे असतात.  

एक्झिट पोल मेथॉडोलॉजी काय?

सध्याच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि अंदाज C-Voter एक्झिट पोल/पोस्ट पोल मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवसानंतर राज्यभरातील 18 वर्षावरील व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारित आहेत. सर्व मतदारांनी दिलेले तपशील, माहिती, अंदाज त्या दिवसावर आधारीत आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात डेटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळेस ही संख्या 100 च्या प्रमाणात नाही. आमचा अंतिम डेटा हा राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणातील सामाजिक-आर्थिक स्तराच्या  +/- 1%  प्रमाणात आहे. आम्ही संभाव्य निकालाच्या अगदी सर्वात जवळचा अंदाज वर्तवू शकतो असा आमचा विश्वास आहे.

या सर्वेंसाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील नमुने घेण्यात आले आहेत. MoE मॅक्रो स्तरावर +/- 3% आणि सूक्ष्म स्तरावर +/- 5%  इतके आहे. विश्लेषणासाठी आम्ही आमच्या अल्गोरिदमचा वापर केला आहे. प्रांतीय आणि विभागीतय मतांचे विश्लेषण करण्यासाठी Split-Voter  घटकाचा वापर केला आहे. याच घटकाचा वापर मतदानाची टक्केवारी, जागा किती मिळू शकतात, याचा अंदाज वर्तवण्यासाठी केला आहे. मिळणार असलेल्या मतांच्या टक्केवारीचा अंदाज आणि मिळणाऱ्या अंदाजित जागा यासाठी अंकगणिताचा शास्त्रीय वापर करण्यात आला आहे. संभाव्य मिळणाऱ्या जागांचा अंदाज वर्तवणे हा सर्वेक्षण विज्ञानाचा भाग नाहीत.

सी वोटर एक्झिट पोलसाठीचा डेटा हा मतदान केल्यानंतर मतदारांकडून घेतला जातो. निवडणूक संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. एकाच राज्यासाठी ही मुलाखती घेतल्या जातात. यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघात यादृच्छिकपणे मतदान केंद्र निवडले जातात. अंदाज योग्य पद्धतीने वर्तवण्यासाठी आम्ही अल्गोरिदम प्रक्रियेचा वापर केला आहे.

सर्वेक्षणासाठी आम्ही यादृच्छिकपणे डेटा जमा केला आहे. जणगणनेनुसार असलेल्या स्थानिक लोकसंख्या, त्यातील वैविध्य आदींचा विचार करण्यात आला आहे. आम्ही  WAPOR कोडचा (World Association of Public Opinion Research) वापर केला आहे. असोसिएशन ऑफ पब्लिक ओपिनियन रिसर्च आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे ही आम्ही SOP म्हणून मान्य केली आहेत.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Supreme Court: आंदोलनातील पोलिसांच्या अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही, लाठीमाराची चौकशी झाली पाहिजे: सर्वोच्च न्यायालय
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब द्यावा लागणार, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Dharmendra Pradhan Education Minister: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडताच वात पेटली, वणवा पसरला, 'या' तीन राज्यांमध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडताच वात पेटली, वणवा पसरला, 'या' तीन राज्यांमध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Embed widget