एक्स्प्लोर

अशोक गहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जबाबदारी स्वीकारत 25 मे रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो प्रस्ताव सर्व नेत्यांनी फेटाळून लावला.

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत लवकरच राहुल गांधी यांच्या जागी पक्षाचे नवे अध्यक्ष बनू शकतात. काँग्रेसमध्ये याबाबत तयारी झाली असून अशोक गहलोत यांना यासाठी तयार राहण्यासही सांगितलं आहे. 'नवभारत टाईम्स'ने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे. मात्र अशोक गहलोत एकटे काँग्रेसचे अध्यक्ष असणार की आणखी दोन-तीने नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं जाणार हे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पंरतु येत्या काही दिवसात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असून तो गांधी कुटुंबातील नसेल. अशोक गहलोत यांनी बुधवारी (19 जून) राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, देश आणि जनहितासाठी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहा, असा आग्रह केला होता. परंतु गहलोत यांनी मनधरणी करुनही राहुल गांधी यावर सहमत झाले नाहीत आणि पक्ष जोपर्यंत नवा अध्यक्ष निवडत नाही, तोपर्यंत नवी सुरुवात शक्य नाही, असं त्यांनी सांगितलं. राहुल गांधींनी हे देखील स्पष्ट केलं की, त्यांच्या जागी प्रियांका गांधींच्या नावावरही विचार होऊ नये. भाजप कायमच काँग्रेसला घराणेशाहीवरुन टीका करत आली आहे. त्यामुळे राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर आणि पक्षाचा दुसरा नेता अध्यक्ष बनल्यानंतर हा मुद्दा कायमचा संपेल. या कारणांमुळे अशोक गहलोत यांची चर्चा! * संघटना चालवण्यासाठी जुना आणि गाढा अनुभव आहे. 2017 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उत्तम कामगिरीमागे गहलोत यांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं. * मागासवर्गीयांचं प्रधिनिधित्त्व करतात. काँग्रेसला जर गमावलेला जनाधार परत मिळवायचा असेल, तर या समुदायाकडून मतं मिळवण्याचं मोठं आव्हान असेल. * सोनिया आणि राहुल गांधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांसोबतही त्यांचे संबंध चांगले आहेत. ...तर सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री? सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक गहलोत काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतर राजस्थानचं नेतृत्त्व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे सोपवलं जाऊ शकतं. काही दिवसांपूर्वी गहलोत आणि पायलट गटामध्ये वादाचं वृत्त आलं होतं. मात्र अशोक गहलोत अध्यक्ष बनल्यानंतर ही अडचणही दूर होईल असं पक्षाला वाटतं. राजीनाम्याचा प्रस्ताव काँग्रेस कार्यकारिणीने फेटाळला लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जबाबदारी स्वीकारत 25 मे रोजी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो प्रस्ताव सर्व नेत्यांनी फेटाळून लावला. मात्र राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत.

आणखी वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget