एक्स्प्लोर

Crime News: विठुरायाचं दर्शन घेतलं, पंढरपूरवरुन परतताना बुलढाण्याच्या वारकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, झाडाला दोर लटकवून....

Crime News: पंढरपूरमध्ये विठुरायाला डोळे भरुन पाहून घेतलं अन् घरी जाताना आयुष्याची 'वारी' संपवली, बुलढाण्यातील भाविकाचं टोकाचं पाऊल

बुलढाणा : आषाढी एकादशीच्या काही दिवस आधीच बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक दुःखद घटना समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीहून परतणाऱ्या एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना रुईछतीश गावाजवळ घडली असून, 62 वर्षीय सुखदेव लक्ष्मण रावे यांनी झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. सुखदेव रावे हे चिखली तालुक्यातील मिसाळवाडीचे रहिवासी होते. त्यांचा सलूनचा व्यवसाय शेळगाव आटोळ येथे होता. गेली 25 वर्षे ते पंढरपूरच्या वारीत नियमित सहभागी होत होते आणि वारकरी संप्रदायात त्यांची ओळख आदराने घेतली जात होती.(Buldhana News)

घटनेची माहिती मिळताच अंधेरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, "सुखदेव रावे हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे आणि साधं जीवन जगणारे होते. वारीमध्ये त्यांचा नियमित सहभाग असायचा, त्यामुळे त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे." सुखदेव रावे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ना कोणती चिठ्ठी सापडली, ना कोणती स्पष्ट कारणे समोर आली आहेत.

गावकऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, सुखदेव रावे पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षांपासून अगदी उत्साहाने सहभागी होत होते. ते 25 वर्षांपासून मिसाळवाडीत वास्तव्यास होते. त्यांचा शेळगाव आटोळ येथे सलूनचा व्यवसाय होता. अनेक वर्षांपासून सुखदेव रावे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत असल्याने त्यांनी वारकरी सांप्रदायात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

विठुरायाची भेट अपूर्णच राहिली! पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं

पंढरीच्या वाटेवर धाराशिवच्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू झाला. शनिवारी रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास वाखरीजवळ रस्त्यावरून जात असताना त्यांना वाहनाने धडक दिली. रोड कॉस करताना महिलेला दिंडीतील वाहनाने(ट्रक) चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. उषा व्यवहारे यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि वारीत सहभागी झालेल्या इतर महिलां हळहळ व्यक्त करत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या उषाताईंना पंढरीच्या विठोबाचे केवळ काही अंतरच उरले होते. पंढरीच्या वाटेवरच महिलेनं जीव सोडल्यामुळे इतर वारकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश

व्हिडीओ

NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
BMC Election 2026: राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
Embed widget