एक्स्प्लोर

Beed Crime News : पत्नी-पत्नीचा वाद टोकाला, गळफास लावून केली दोघांनी आत्महत्या; बीड जिल्ह्यातील घटना

Beed News : राहत्या घरात पती-पत्नीने सोबतच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे.

बीड: जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे धक्कादायक घटना समोर आली असून, पती-पत्नीमध्ये अचानक सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान आत्महत्येमध्ये झाले. ज्यात घरात पती-पत्नीने सोबतच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. राजू बंडू चव्हाण (वय 31 वर्षे) आणि सोनाली राजू चव्हाण (वय 27 ववर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नावं आहेत. 

अधिक माहिती अशी की, जातेगाव येथील राजू बंडू चव्हाण हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. गावात फिरून चक्कर मारली. यानंतर जातेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणीय उपोषणास सुरु होते. या उपोषणाला भेट देऊन ते घरी परतले. घरी गेल्यावर त्यांनी कुटुंबासोबत जेवणही केले. परंतु जेवणांनतर पती-पत्नीत टोकाचे भांडण झाले. वाद एवढा टोकाला गेला की, दोघांनी सोबतच घरातील आडूला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. 

बराच वेळ झाला पण आई-वडील खोलीबाहेर येत नसल्याने मोठ्या मुलीने दरवाजा ठोठवत आवाज दिला. मात्र, आतून कसलाही प्रतिसाद न आल्याने तिने ही गोष्ट तिच्या चुलत आजीला सांगितली. घटना कळताच गावकरी जमा झाले. घरावरील पत्र काढून खोलीत प्रवेश केला असता राजू आणि त्यांच्या पत्नीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दोघांचे मृतदेह खाली उतरवून याची माहिती तलवाडा पोलिसांनी देण्यात आली. 

पोलिसांची घटनास्थळी धाव...

या घटनेची माहीती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, फौजदार स्वप्नील कोळी, बीट जमादार नारायण काकडे, महेश झिकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास पाठविले. दरम्यान, आत्महत्येचे कारण वैद्यकीय तपासणीनंतर निष्पन्न होईल असे शंकर वाघमोडे सांगीतले. मात्र या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

पत्नीच्या वाढदिवसासाठी आले होते गावी...

राजू चव्हाण हे नाशिकला असतात. परंतु, मागील आठवड्यात पत्नी सोनालीचा वाढदिवस असल्याने गावी आले होते. दरम्यान मंगळवारी ते घराबाहेर पडल्यावर मराठा आंदोलनस्थळी गेले. त्यानंतर ते घरी गेले. घरी पती-पत्नीसह दोन मुलींनी सोबत जेवणही केले. परंतु, त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातूनच दोघांनीही राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

भीषण वास्तव! मराठवाड्यात रोज 3 शेतकरी संपवतायत जीवन, शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक; कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक संख्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू

व्हिडीओ

Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Akshay Kumar Car Accident : जूहूत 3 गाड्यांचा अपघात, अपघातग्रस्त रिक्षाची अक्षय कुमारच्या कारला धडक
Samadhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही
Prashant Jagtap: मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना....; प्रशांत जगतापांनी सगळंच काढलं बाहेर
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरू
NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध
Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Embed widget