एक्स्प्लोर

Happy Relationship साठी 'या' 3 बाऊंड्रीज सेट करा, नातं होईल घट्ट, जोडीदाराचं वाढेल प्रेम

Relationship : जर तुम्हाला तुमचं नातं आयुष्यभर आनंदी ठेवायचं असेल, तर तुम्ही काही सीमा निश्चित केल्या पाहिजेत. जाणून घ्या.

Relationship Tips : एखाद्या नात्यात जेव्हा खूप प्रेम आणि विश्वास असतो, तेव्हा दोन्ही जोडीदार खूप आनंदी राहतात. आपल्या नात्यातील प्रेम आयुष्यभर असेच राहावे अशी अनेकांची इच्छा असते. असं म्हणतात ना, की नातं टिकवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण यासोबतच नात्यात काही सीमा असणंही खूप गरजेचं आहे. अनेकदा लोक त्यांच्या नात्यात सीमांना जास्त महत्त्व देत नाहीत. त्यांना असे वाटते की, यामुळे त्यांच्या नात्यात किंवा जोडीदाराशी अंतर वाढेल, परंतु प्रत्यक्षात तसे नाही.

 

नात्यात तुमचे वेगळे व्यक्तिमत्त्व जपू शकता

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण काही हेल्दी बाऊंड्रीज म्हणजेच काही सीमा तुमचं नातं आणखी घट्ट करतात. याच्या मदतीने तुम्हीृ रिलेशनशिपमध्ये असतानाही तुमचे वेगळे व्यक्तिमत्त्व जपू शकता. जेव्हा नातेसंबंधात या सीमा असतात, तेव्हा दोन्ही जोडीदारांना गुदमरल्यासारखे वाटत नाही आणि ते नात्यात मुक्तपणे श्वास घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही हेल्दी सीमांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे नाते आणखी आनंदी राहते-


दोघांच्या वेळेचा, गरजेचा आदर करा

जेव्हा निरोगी सीमांचा विचार केला जातो, तेव्हा पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या जोडीदाराला त्याची पर्सनल स्पेस देणे. हे तुम्हा दोघांना तणाव कमी करण्यास आणि तुमचे इतर नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत करते. अनेक वेळा जोडप्यांना त्यांच्या जोडीदाराने सर्व वेळ त्यांच्यासोबत घालवावा असे वाटते, परंतु अशा स्थितीत नात्यात गुदमरल्यासारखे वाटू लागते. म्हणून, दोघांनीही एकमेकांच्या पर्सनल स्पेसचा आदर करणं गरजेचं आहे. तसेच एकमेकांसोबत एकत्र दर्जेदार वेळ घालवणे आणि एकमेकांना स्पेस देणे यात संतुलन साधू शकता.


काहीही बोलण्याचा अधिकार नाही

अनेक वेळा लोकांना असे वाटते की, जर ते रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांना त्यांच्या पार्टनरला काहीही बोलण्याचा अधिकार आहे. आपलं नातं वाचवण्यासाठी समोरची व्यक्तीही ते ऐकून घेते. मात्र, नातेसंबंधात आपण अशी बाऊंड्री सेट केली पाहिजे की कोणीही आपला स्वाभिमान दुखावू नये. निरोगी आणि आनंदी नातेसंबंधाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही जोडीदार एकमेकांशी आदराने वागतात, एकमेकांच्या मतांची कदर करतात आणि एकत्र निर्णय घेतात.


आर्थिक सीमा 

असे म्हणतात की, जिथे प्रेम असते तिथे पैशाला किंमत नसते. हे जरी खरे असले, तरीही पैसा हे बहुतेक नाती तुटण्याचे कारण आहे. म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की तुम्ही तुमच्या नातेसंबंधात काही आर्थिक सीमा निश्चित करा. संपूर्ण आर्थिक भार फक्त एकाच जोडीदारावर पडू नये यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न करा की तुम्ही दोघे बसून खर्च आणि बचत याबद्दल बोला. तसेच, आर्थिक उद्दिष्टे निश्चित करा. जॉइंट अकाऊंटसोबतच तुम्ही वैयक्तिक खर्चासाठी स्वतंत्र खातीही तयार करावीत. जेणेकरून तुमच्या नात्यावर दबाव न आणता तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.

 

हेही वाचा>>>

Relationship : काय तर म्हणे.. कधी नूडल्सवरून...कधी उशीरा उठल्यानं...एकापेक्षा एक घटस्फोटाची कारणं वाचून तुम्हालाहा बसेल धक्का!

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget