एक्स्प्लोर

Celebs On Pahalgam Terrorist Attack: 'आपल्याच देशात किती काळ भीतीनं जगणार...'; पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड सुन्न

Pahalgam Terrorist Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या स्टार्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय कुमारपासून ते अनुपम खेरपर्यंत सर्वांनी या हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

Celebs On Pahalgam Terrorist Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं देश हादरला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे आणि त्याव्यतिरिक्त अनेक लोक जखमी झाले आहेत. पहलगाममधील या वेदनादायक हल्ल्यानं बॉलिवूडपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतच्या स्टार्सना धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत, सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहुयात कोणी काय प्रतिक्रिया दिली ते सविस्तर... 

संजय दत्त (Sunjay Dutt)

संजय दत्तनं त्याच्या एक्स अकाउंटवरून ट्वीट केलं की, त्यांनी आमच्या लोकांना निर्घृणपणे मारलंय. हे माफ करता येणार नाही. या दहशतवाद्यांना हे कळलं पाहिजे की, आपण गप्प बसणार नाही. आपल्याला याचं योग्य उत्तर द्यावंच लागेल. मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंहजी यांना विनंती करतो की, त्यांनी योग्य ती शिक्षा द्यावी.

अजय देवगण (Ajay Devgn)

अभिनेता अजय देवगणनंही पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलंय आणि म्हटलंय की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून मला खूप दुःख आणि धक्का बसला आहे. या घटनेचे बळी ठरलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय, ते सर्व निर्दोष होते. जे घडलं ते हृदयद्रावक आणि पूर्णपणे अमानवी आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत.

सोनू सूद (Sonu Sood)

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये त्यानं लिहिलंय की, "काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. सुसंस्कृत जगात दहशतवादाला स्थान नसावं आणि हे भ्याड कृत्य अस्वीकार्य आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी मी प्रार्थना करतो."

कब तक अपने ही देश में डरकर जिएंगे', पहलगाम हमले पर बॉलीवुड सितारों ने किया रिएक्ट

अक्षय कुमार (Akshay Kumar)

अक्षय कुमारनं इंस्टाग्रामवर पोस्ट करून पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेत्यानं लिहिलंय की, "ही बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणं, हे घोर पाप आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करतो."

अनुपम खेर (Anupam Kher)

अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून या हल्ल्याचा निषेध केला आहे. यासोबत त्यांनी लिहिलंय की, "चुकीचं, चुकीचं, चुकीचं. पहलगाम हत्याकांड!! आज शब्द शक्तिहीन झालेत."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary)

गुरमीत चौधरी यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, "हृदयद्रावक घटना. शांतता आणि सौंदर्यासाठी असलेल्या ठिकाणी पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. पीडितांसाठी प्रार्थना."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gurmeet Choudhary (@guruchoudhary)

मनोज मुंतशीर (Manoj Muntashir)

मनोज मुंतशीर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, "दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, दहशतवादी हिंदू किंवा मुस्लिम नसतो, तो फक्त एक दहशतवादी असतो. हे देवा, पुढच्या जन्मात मला लांडगा बनव म्हणजे, मी अशा गोष्टी बोलणाऱ्या बुद्धिजीवींचे चेहरे फाडू शकेन."

आम्रपाली दुबे (Amrapali Dubey)

भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे हिनंही या हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे आणि न्यायाची मागणी केली आहे. इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना अभिनेत्रीनं लिहिलंय की, "आपण आपल्याच देशात किती काळ भीतीनं जगणार आहोत... ते पर्यटक होते. हे खूप दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळाला पाहिजे."

कब तक अपने ही देश में डरकर जिएंगे', पहलगाम हमले पर बॉलीवुड सितारों ने किया रिएक्ट

रवि किशन (Ravi Kishan)

रवि किशन यांनी त्यांच्या एक्स वरील पोस्टमध्ये लिहिलंय की, "त्यांनी राज्याबद्दल विचारलं नाही, त्यांनी भाषेबद्दल विचारलं नाही, त्यांनी जातीबद्दल विचारलं नाही, त्यांनी धर्माबद्दल विचारलं..."

कब तक अपने ही देश में डरकर जिएंगे', पहलगाम हमले पर बॉलीवुड सितारों ने किया रिएक्ट

हिना खान (Hina Khan)

हिना खाननंही इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट पोस्ट केली आहे. अभिनेत्रीनं लिहिलंय की, "पहलगाम, का, का का...?"

कब तक अपने ही देश में डरकर जिएंगे', पहलगाम हमले पर बॉलीवुड सितारों ने किया रिएक्ट

शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim)

टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिम पत्नी दीपिका कक्कर आणि मुलगा रुहानसोबत सुट्टीसाठी काश्मीरला गेला होता. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर, अभिनेत्यानं चाहत्यांना एक अपडेट दिलंय की, "तो हल्ल्यापूर्वीच काश्मीर सोडून परतण्यासाठी निघाला होता."

कब तक अपने ही देश में डरकर जिएंगे', पहलगाम हमले पर बॉलीवुड सितारों ने किया रिएक्ट

इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करताना त्यानं लिहिलंय की, "नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्वजण आमच्यासाठी काळजीत आहात. आम्ही सर्व सुरक्षित आणि ठीक आहोत. आम्ही आज सकाळी काश्मीर सोडलं आणि दिल्लीला सुखरूप पोहोचलो. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार. लवकरच नवीन व्लॉग येत आहे..." 

Celebs On Pahalgam Terrorist Attack: 'आपल्याच देशात किती काळ भीतीनं जगणार...'; पहलगाम हल्ल्यानंतर बॉलिवूड सुन्न

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pahalgam Terror Attack  : तुम्ही मोदींना डोक्यावर चढवलंय असं म्हणत माझ्या डोळ्यासमोर वडिलांना, काकांना गोळ्या घातल्या; जखमी झालेल्या असावरी जगदाळेंनी काय सांगितलं?

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget