एक्स्प्लोर

निवडणूक आयोगाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'त्या' दोन प्रकरणी क्लीनचिट

आयोगाने या प्रकरणी देखील त्यांना क्लीनचिट दिली होती. या प्रकरणात दिलेल्या क्लीनचिटबाबत एका निवडणूक आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी दोन प्रकरणांमध्ये क्लीनचिट दिली आहे. मोदींनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक कायद्याचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन केलेलं नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मोदींनी 23 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये रोड शोचं आयोजन केलं होतं, जे आचारसंहितेचं उल्लंघन होतं, असा आरोप कॉंग्रेसने केला होता. निवडणूक आयोगाने कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये 9 एप्रिल रोजी मोदींनी केलेल्या प्रचारसभेतील भाषणात नवीन मतदारांना बालाकोट हल्ल्यातील शहीदांना समर्पित करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लीनचिट दिली आहे. याच दिवशी महाराष्ट्रातील लातूरच्या औसामध्ये देखील मोदींनी असेच आवाहन केले होते. आयोगाने या प्रकरणी देखील त्यांना क्लीनचिट दिली होती. या प्रकरणात दिलेल्या क्लीनचिटबाबत एका निवडणूक आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. आयोगाने अद्याप या दोन्ही प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही प्रकरणांसह आतापर्यंत आठ प्रकरणांमध्ये मोदींना क्लीनचिट दिली आहे. आयोगाकडून अमित शाहांना दोनदा तर राहुल गांधींना एकदा क्लीनचिट   गुजरात निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रथमदर्शनी अशा पध्दतीचं कुठलंही उल्लंघन केल्याचे आढळलेले नाही. मोदींनी मताधिकार बजावल्यानंतर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत रोडशो केला होता आणि राजकीय भाष्य केलं होतं, असा आरोप कॉंग्रेसने केला होता. निवडणूक आयोगाने आधी अशा प्रकारे तक्रार आलेल्या नरेंद्र मोदींच्या सहा, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या दोन तर राहुल गांधी यांच्या एका भाषणाला क्लीनचिट दिली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report
Sunil Kedar : नागपूर ग्रामीण काँग्रेसमधली गटबाजी चव्हाट्यावर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget