एक्स्प्लोर

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर झारखंडमध्ये रोखलं, ATC कडून परवानगी न मिळाल्यानं थांबून राहावं लागलं,काँग्रेसचा दावा

Jharkhand Election 2024: काँग्रेसनं बराच वेळ राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली नाही, असं म्हटलं. जाणीवपूर्वक हे करण्यात आलं,असं काँग्रेसनं म्हटलं.  

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी आलेल्या राहुल गांधी (Rahul gandhi ) यांना काही वेळ थांबावं लागलं. राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर थांबवण्यात आलं होतं. क्लिअरन्स न मिळाल्यानं राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर महागामा येथे थांबवण्यात आलं. राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर जवळपास पाऊण तास थांबवण्यात आलं होतं, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. पीएम नरेंद्र मोदी आज झारखंडमध्ये प्रचार करण्यासाठी पोहोचले आहेत. चकाई येथे त्यांची प्रचारसभा आहे. यामुळं राहुल गांधी यांचं हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारण्यात आली.   

राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये काय म्हटलं?

झारखंडच्या गोड्डा मधील मेहरमा येथे राहुल गांधी यांनी प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदी अब्जाधीश यांची कठपतुळी आहते. अब्जाधीश जे म्हणतील ते नरेंद्र मोदी करतात, असं राहुल गांधी म्हणाले. मोदींनी गरिबांकडून पैसे काढून घेत अब्जाधीशाचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं आहे. महाराष्ट्रातील मविआचं सरकार जमीन हडवण्यासाठी पाडण्यात आलं, असं त्यांनी म्हटलं.  

राहुल गांधी म्हणाले आम्ही विचारधारेची लढाई लढली आहे. काँग्रेस आणि  INDIA  आघाडीचे लोक संविधान वाचवण्याचं काम करत आहेत. दुसरीकडे भाजप आरएसएस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत,असा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी म्हणतात राहुल गांधी लाल पुस्तक दाखवतात, त्यांना सांगणं आहे, पुस्तकाच्या रंगाचा विचार करु नका, पुस्ताक जे लिहिलं आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही जर संविधान वाचलं असतं तर लोकांमध्ये त्यांनी द्वेष पसरवला नसता, एकमेकांमध्ये लढायला लावलं नसतं, असं राहुल गांधी म्हणाले. आपलं संविधान भारताचा आत्मा आहे. देशाचा इतिहास आहे, दलितांचा सन्मान, मागासवर्गीयांची भागिदारी, शेतकरी आणि मजुरांचं स्वप्न आहे. मात्र भाजप-आरएसएसच्या लोकांना ते संपवायचं आहे, असं राहुल गांधी म्हणाले. 

झारखंडसाठी  INDIA आघाडीच्या 7 गॅरंटी   

INDIA आघाडीनं झारखंड विधानसभेसाठी सात गॅरंटी जाहीर केल्या आहेत. सरना धर्म कोडला मान्यता, महिलांना दरमहा 2500 रुपये, एसटी-एससी आणि ओबीसींचं आरक्षण 28 टक्के, 12 टक्के आणि 27 टक्के करण्यात येणार, अशी गॅरंटी देण्यात आली आहे. महिलांना 450 रुपयांना गॅस सिलिंडर, प्रत्येक व्यक्तीला 7 किलो रेशन, 10 लाख नोकऱ्या, 15 लाखांपर्यंत आरोग्य विमा, शेतकऱ्यांना धानाला 3200 रुपये हमीबाव, इतर  पिकांच्या हमीभावात 50 टक्के वाढ, अशा गॅरंटी देण्यात आल्या आहेत.  

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
Who is Ramrao Wadkute: राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
Rajya Sabha Election 2026: मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
मोठी बातमी : नुकतंच निवडून आलेल्या नगरसेविकेला भाजपने थेट राज्यसभेवर पाठवलं, कोण आहेत मायाताई इवनाते?
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?

व्हिडीओ

Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget