एक्स्प्लोर

तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात 1995 च्या निवडणुकीत काँग्रेस 80 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र शिवसेना आणि भाजपला युतीचे सरकार स्थापन करण्यात यश आले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदारांनी 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. 2024 च्या सर्वात लक्षवेधी आणि राजकारणाची खिचडी झाली असतानाच 65.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांचे मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) झाला असून 76 टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात 84.79 टक्के मतदान झालं आहे.  

तब्बल 30 वर्षांनी राज्यात मतदानाचा आकडा वाढला 

2024 च्या विधानसभा निवडणुकीत बंपर मतदानामुळे राज्यातील 100 विधानसभा जागांवर निकराची लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत (Loksbha Election) महाराष्ट्रातील (Maharashtra) मतदारांनीही उत्साहाने मतदान केले होते. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी राज्यात मतदानाचा आकडा वाढला आहे. यापूर्वी 1995 मध्ये राज्यात विक्रमी 71.69 टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, महाराष्ट्रात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय 23 नोव्हेंबरला होणार आहे.

मतदानाची टक्केवारी का वाढली?

विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमक प्रचार केल्याचे जाणकारांचे मत आहे. भाजपच्या 'बनतेंगे तो काटेंगे' आणि 'एक है तो सेफ हैं'च्या घोषणांना महाविकास आघाडीने महाराष्ट्र धर्म बिंबवताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भावनिक आवाहनाने समर्थकांना घराबाहेर पडण्यास भाग पाडलं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 8.85 कोटी मतदार होते, जे आता 9.5 टक्क्यांनी वाढून 9.69 कोटी झाले आहेत.

वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार?

मतदानाचा टक्का वाढला की सत्ता बदलते, असा निवडणुकीचा कल राहिला आहे. मतांची टक्केवारी वाढल्यानंतर सत्ता बदलली आणि अनेक वेळा सत्ताधारी आघाडीलाही फायदा झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढले आणि महाविकास आघाडीने बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत राज्यात 61.39 टक्के मतदान झाले होते. महाविकास आघाडीला 43.91 टक्के, तर महायुतीला 42.71 टक्के मते मिळाली होती. 

2004 मध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाल्याचा फायदा झाला होता. 2004 मध्ये 63.44 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या आणि सत्ताधारी आघाडीचे पुनरागमन झाले. शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागा मिळाल्या. 2014 च्या निवडणुकीतही मतदानात चार टक्क्यांनी वाढ झाली होती आणि महाराष्ट्रात सरकार बदलले होते. 2014 मध्ये 63.38 टक्के मतदानानंतर भाजप 125 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवत 63 जागा जिंकता आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले होते. 

कमी मतदान होऊनही सत्ता बदलली नाही

महाराष्ट्राच्या गेल्या 30 वर्षांच्या निवडणूक इतिहासात असे प्रसंग आले आहेत की कमी मतदान होऊनही सरकार निवडून आले. मतदानाची टक्केवारी घसरली असतानाही 2009 मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत आली. 2009 मध्ये 59.68 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी घसरल्याचा फायदा सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसला झाला. काँग्रेसने 82 तर राष्ट्रवादीने 62 जागा जिंकून सत्तेत पुनरागमन केले. विरोधात बसलेल्या शिवसेना आणि भाजपला एकूण 110 जागा मिळाल्या. त्यावेळी मनसेने 13 जागा जिंकून महायुतीला धक्का दिला होता. 2019 मध्ये देखील 61.44 टक्के मतदान झाले, जे मागील निवडणुकीच्या तुलनेत 2 टक्के कमी आहे, परंतु सरकार बदलले नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.

1995 च्या निवडणुकीत काय झाले? 

वास्तविक, महाराष्ट्रात 1995 मध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात झाल्या. 12 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात आणि 9 मार्चला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. 13 मार्च रोजी निकाल लागला. या निवडणुकीत प्रमुख लढत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस यांच्यात होती. 1995 मध्ये 71.69 टक्के बंपर मतदान झाले होते, तेव्हा जनादेश शिवसेनेच्या बाजूने आला होता. त्यावेळी शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी जोरदार प्रचार भाजपकडून केला होता. 

1995 मध्ये कोणाची स्थिती होती?

महाराष्ट्रात 1995 च्या निवडणुकीत काँग्रेस 80 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र शिवसेना आणि भाजपला युतीचे सरकार स्थापन करण्यात यश आले. त्यावेळी शिवसेनेला 73 तर भाजपला 65 जागा मिळाल्या होत्या. तर मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास काँग्रेसला 31 टक्के, शिवसेनेला 16.4 टक्के आणि भाजपला 12.8 टक्के मते मिळाली. त्या निवडणुकीत कोल मतदारांची संख्या 5,50,93,862 होती आणि 3,94,98,861 मतदारांनी मतदान केले होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 15 December 2025 : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने मनातील इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
बिबटे आणि मनुष्यातील संघर्ष संपवण्यासाठी वनविभागाचं महत्वाचं पाऊल, जुन्नरमध्ये आत्तापर्यंत 68 बिबटे पकडले, नेमक्या काय आहेत उपाययोजना
Dharur News : ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
ओबीसी आंदोलक ॲड. मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला; अज्ञातांकडून दगडफेक, माजलगाव ते धारूर प्रवासादरम्यान घडली घटना
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Ahilyanagar : दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू
दबा धरून बसला, संधी मिळताच बिबट्याने सिद्धेशवर झडप घातली; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका
देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, अधिवेनावरुनही सरकारवर टीका
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास स्वंतत्र, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यास स्वंतत्र, पण आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
Indurikar Maharaj : महाराज, कार्यक्रम बंद करा! इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद; पोलीस आल्यानंतर पुण्यात नेमकं काय घडलं?
महाराज, कार्यक्रम बंद करा! इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद; पोलीस आल्यानंतर पुण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget