एक्स्प्लोर

परीक्षा होत नाहीत, शुल्क परत मिळत नाही, जिल्हा परिषद भरती रद्द झाल्यानंतर विद्यार्थी आक्रमक 

Zilla Parishad recruitment exam 2019 : राज्यभरातील तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी 2019 मध्ये परीक्षा साठी शुल्क भरले होते. परीक्षेतील घोळामुळे ही भरती प्रक्रियेसाठी होणारी परीक्षा रद्द झाली आहे.

लातूर : राज्य सरकारने 2019 मध्ये घोषित केलेली जिल्हा परिषदेची भरती (Zilla Parishad recruitment exam 2019 ) रद्द केली आहे. अद्याप त्या भरती प्रक्रिया बाबत कोणतीही हालचाल नाही. बारा लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेची वाट पाहत आहेत. परीक्षा होत नाही, परीक्षा शुल्क परत मिळत नाही, अशा अडचणीत विद्यार्थी अडकून पडले आहेत. परीक्षार्थींना दरवर्षी फक्त तारीख मिळत आहे. यातून एक प्रश्न मात्र अनुत्तरीत राहतोय तो म्हणजे गोळा झालेली 25 कोटी पेक्षा जास्त परीक्षा शुल्क गेला कुठे ?

राज्यभरातील तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी 2019 मध्ये परीक्षा साठी शुल्क भरले होते. परीक्षेतील घोळामुळे ही भरती प्रक्रियेसाठी होणारी परीक्षा रद्द झाली आहे. प्रक्रिया होणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. मात्र अद्याप याबाबत कोणाच निर्णय झालेला नाही.  उमेदवारांकडून शुल्कापोटी घेतलेले 25 कोटी 87 हजार रुपये आता नक्की कुणाकडे आहेत, असा प्रश्न 12 लाख 72 हजार उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

अतिशय हलकीच्या परिस्थितीत हे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात असतात. परीक्षा शुल्क भरणे, त्यासाठी तयारी करणे, परीक्षा सेंटर पर्यंत जाण्याचा खर्च, असा हजारोंचा खर्च हे विद्यार्थी करत असतात. मात्र, परीक्षा रद्द झाल्यानंतर त्या परीक्षा शुल्काचं काय होतं असा प्रश्न आता विद्यार्थ्यांना पडलाय?  एक वेळ सरकार परीक्षा शुल्क परत करेल. मात्र परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी तयारी करतात त्या परीक्षेचे पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होताय. 

 परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या विविध संघटना आता एकत्रितपणे समोर येते आहेत. राज्य सरकारतर्फे मार्च 2023 पर्यंत जिल्हा परिषदेची परीक्षा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, नवीन जाहिरात येईल की नाही आणि मार्चमध्ये तरी परीक्षा होतील किंवा नाही? याबद्दल आम्हाला विश्वास नाही. रद्द केलेल्या जिल्हा भरतीची जाहिरात आणि परीक्षा एका महिन्याच्या आत घ्यावी या एकाच मागणीसाठी आम्ही आंदोलन करणार आहोत असा इशारा विद्यार्थ्यांकडून  देण्यात आल्याची माहिती राहुल कवठेकर  या विद्यार्थ्याने दिली. 

"साडेसहा एकर कोरडवाहू शेती असलेले वडील महिन्याला पाच हजार रुपये पाठवतात. मागील पाच वर्षापासून वडिलांच्या आर्थिक मदतीवर लातूरमध्ये विविध परीक्षांची तयारी करतोय. अडीच हजार रुपये मेस, पाचशे रुपये अभ्यासिका आणि उर्वरित पैशांमध्ये खोली भाडे व इतर खर्च अशा अडचणीत राहतोय. आर्थिक अडचणीत असताना देखील परीक्षा शुल्क भरून 2019 मध्ये तयारी केली. परंतु, ही परीक्षाच आता रद्द झालीय. शिवाय रद्द झालेल्या परीक्षेचे पैसे अद्याप मिळाले नाहीत, अशी कैफियत  संतोष चोथवे या विद्यार्थ्याने मांडली हे. 

घडी बावीस एकर कोरडवाहू शेती आहे. पैशाच्या ओढाताणीमध्ये  लातूरमध्ये मागील पाच वर्षापासून विविध परीक्षेची तयारी करतोय. 2019 ला परीक्षा शुल्क भरले होते. ते अद्याप परत मिळाले नाही. कम्बाईन ,आरटीओ, रेल्वे ,आरोग्य विभाग अशा अनेक परीक्षेची मी तयारी करतोय. आमच्या परीक्षा वेळेवर घ्या, वेळेवर निकाल लावा, वय निघून जात आहे अशी खंत मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या माऊली काळे या विद्यार्थ्याने व्यक्त केलीय.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Education : इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; जूनपासून लागू होणार नवा आराखडा
इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; जूनपासून लागू होणार नवा आराखडा
Palghar : पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Maharashtra HSC Exam Result 2026: बारावीच्या निकालात कोकण विभागाची सरशी, तर मुलींनी मारली बाजी नागपूरसह विदर्भाची टक्केवारी किती?
बारावीच्या निकालात कोकण विभागाची सरशी, तर मुलींनी मारली बाजी; नागपूरसह विदर्भाची टक्केवारी किती?

व्हिडीओ

Vijay Thalapathy TVK : दोन वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना, विजय यांचा सर्वात मोठा पक्ष होण्याचा चमत्कार
Indian National Developmental Inclusive Alliance Collaps : निवडणुकीत भांडण; आता 'इंडिया'ची आठवण
Pune Nasrapur Bhor Crime Special Report : सर्वात क्रूर, नसरापूरचा 'असूर' | ABP Majha
RSS Role in West Bengal Victory : भाजपच्या वाढत्या ताकदीमागे नेमकं कोण? | Special Report
West Bengal BJP Win Inside Story : पश्चिम बंगालमध्ये भगवा राज, विजयची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DC Vs CSK: सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
सॅमसनच्या वादळात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव, चेन्नई सुपर किंग्ज सुस्साट, 8 विकेटनं दणदणीत विजय
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
स्टेट बँक ऑफ इंडियाचं कामकाज चार दिवस बंद राहणार, कर्मचाऱ्यांकडून देशव्यापी संप, जाणून घ्या तारखा 
Supreme Court : सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या वाढणार, केंद्र सरकारकडून मंजुरी, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होणार?
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
ठाण्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त; एक्साईज विभागाची कारवाई, कंटेनर पकडला, 1.65 कोटींचा साठा
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
राज्यात एकीकडे उन्हाच्या झळा, मराठवाडा अन् विदर्भात अवकाळीने गारवा; गारांचा पाऊस, शेतकऱ्यांची पिके धोक्यात
Badlapur : बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
बदलापूरच्या पीडित चिमुकलीची शाळेची फी शासनाने भरलीच नाही; नुसता घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाहीच
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
ना गॅस गोडाऊन, ना कुठला ओटीपी; निलंग्यात चक्क माळरानावर गॅस सिलेंडरची बोगस विक्री, अधिकाऱ्यांकडून व्हिडिओची दखल
Mamata Banerjee : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांच्या पदरी अपयश, नेमकं कारण काय?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
Embed widget