एक्स्प्लोर

Chardrapur Crime : आर्थिक विवंचनेतून दोन चिमुकल्यांना विष देत वडिलांनीही संपवलं आयुष्य

चंद्रपूर : वरोरा शहरातील दोन चिमुकल्यांना विष देत पित्यानंही आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक विवंचनेतून हे सर्व झाल्याचे उघड झाले आहे.

Chardrapur Suicide : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील दोन चिमुकल्यांना विष देत पित्यानेही आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे आलेल्या आर्थिक विवंचनेतून हे सर्व झाल्याचे उघड झाले आहे. वरोरा शहरातील बोर्डा गावात कांबळे कुटुंब राहत होते. संजय कांबळे, त्यांची पत्नी, सहा वर्षीय स्मित आणि तीन वर्षीय मिष्टी असे कुटुंब. यातील पिता संजय कांबळे घरीच खाजगी शिकवणी वर्ग घेत होता. तर पत्नी एका महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहे.

कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली

कोरोना आधी संजय कांबळे यांचे शिकवणी वर्ग उत्तम चालत होते. मात्र कोरोनानंतर शिकवणी वर्ग ठप्प झाले. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालविणं अशक्य झाल्यानं त्यांनी अनेकदा निराशा व्यक्त केली होती. मला ही मुले पोसता येत नसतील तर त्यांचा जीव घ्यावा लागेल असंही त्यांनी जवळच्या व्यक्तींजवळ बोलून दाखविलं होतं. शुक्रवारी घरात कुणीही नसताना स्मित आणि मिष्टी या दोघांनाही विष देत संपवून घराला कुलूप लावत संजय कांबळे फरार झाला होता. कामावरून घरी परतलेल्या कांबळे यांच्या पत्नीला हा सारा प्रकार कळताच तिनं मुलांना रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

मुलांना विष देत पित्याची आत्महत्या

ही दुर्दैवी घटना लक्षात घेता पोलिसांनी तपासाची दिशा आणि वेग वाढवत शोध पथकं गठीत केली आणि फरार आरोपीचा शोध चालवला. यात खबरी जाळ्याच्या माध्यमातून त्यांना वर्धा जिल्ह्यातल्या गिरड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साखरा शेतशिवारात एक मृतदेह आढळल्याची बातमी मिळाली. हा मृतदेह संजय कांबळे याचाच असल्याची पुष्टी झाली. स्वतः विषप्राशन करत संजय कांबळेने आत्महत्या केली होती. पोलिसांनी आता याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल

बेताची आर्थिक स्थिती, कोरोना काळानंतर बिघडलेले कौटुंबिक बजेट आणि महागाईचा फटका यामध्ये कुटुंबाचा गाडा हाकणं अवघड झाल्याची स्थिती या घटनेनं स्पष्ट केली आहे. कांबळे यांनी घेतलेल्या टोकाच्या पाऊलामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे. अशा स्थितीत कोणालाही समुपदेशन आवश्यक असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केलं आहे. मात्र आर्थिक विवंचनेमुळे एक हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त झालं हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
ATM Scam : पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींचा ATM फ्रॉड, दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता; मग पैसे कोणी चोरले? गूढ कायम
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget