एक्स्प्लोर

Chitra Wagh on Badlapur Protest: 10 वाजल्यानंतर बाहेरुन लोंढा आला अन्... बदलापूर आंदोलनाबात चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Badlapur Crime case: आम्ही फेसबुकवर चालणारे नाही , फिल्डवर उतरणारं सरकार आहोत, बदलापूर प्रकरणानंतर चित्रा वाघ कडाडल्या. आंदोलकांची चौकशी केली तेव्हा कोण चेंबुरहून आले होते, कोण नवी मुंबईतून, कोण ठाण्याहून आले होते

बदलापूर: अवघ्या चार वर्षांच्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूरमध्ये मंगळवारी उग्र आंदोलन झाले होते. या आंदोलकांनी विकृत घटना घडलेल्या शाळेची तोडफोड केली होती. तसेच आंदोलकांच्या एका जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर उतरत वाहतूक रोखून धरली होती. तब्बल 10 तास सुरु असलेल्या या आंदोलनावेळी राज्य सरकार आणि पोलिसांविरोधात प्रचंड रोष दिसून आला होता. मात्र, भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आता या आंदोलनाबाबत काही धक्कादायक आरोप केले आहे. चित्रा वाघ आणि भाजपचे स्थानक आमदार किसन कथोरे यांनी बुधवारी बदलापूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित घटनेची आणि कालच्या आंदोलनाची माहिती घेतली. यानंतर  प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी आंदोलकांवर गंभीर आरोप केले.

चित्रा वाघ यांनी आंदोलकांच्या हेतूबाबत शंका व्यक्त केली. राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर मार्गाने शक्य त्या सर्व गोष्टी केल्या. मी आज पोलीस ठाण्यात जाऊन कालच्या आंदोलनाबाबत माहिती घेतली. स्थानिक आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांच्याशी बोलले. हे आंदोलक कुठून आले होते, याबद्दल विचारणा केली. बदलापूरमधील (Badlapur) काही महिलांनी मला सांगितले की, चित्राताई, सकाळी 10 वाजेपर्यंत बदलापूरमधील लोकांनी आंदोलन केले. त्यानंतर त्यानंतर माहिती नाही कुठून लोकं आली, कशी लोकं आली. हा जमाव अचानक आला. कोण शाळेत घुसलं, एक लोंढा रेल्वे ट्रॅकवर गेला. या सगळ्यांनी आमच्या बदलापूरला बदनाम करुन टाकलं, असे काही महिलांनी आपल्याला सांगितल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला.

झालेली घटना दुर्दैवी आहे. पण आंदोलनकर्त्यांच्या हातात, 'लाडकी बहीण योजना रद्दा करा', असे फलक का होते? मला कळलंच नाही, विषय कुठला होता आणि या लोकांच्या हातात असे बॅनर्स का होते? यापैकी काही आंदोलकांची चौकशी केली तेव्हा कोण चेंबुरहून आले होते, कोण नवी मुंबईतून आले होते, कोण ठाण्याहून आले होते, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. या सगळ्यानंतरही आमचे दीपक केसरकर आणि गिरीश महाजन हे दोन मंत्री तिकडे गेले होते. आम्ही फेसबुकवरून सरकार चालवणारे नाही, आमचं सरकार फिल्डवर उतरणारं आहे, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला.

पोलिसांना गु्न्हा दाखल करण्यासाठी वेळ का लागला? चित्रा वाघ यांनी सांगितलं कारण

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात प्रचंड दिरंगाई केल्याने परिस्थिती चिघळली, असा आरोप केला जात आहे. याबाबत बोलताना चित्रा वाघ यांनी म्हटले की, बदलापूरमध्ये घडलेली घटना मनाला वेदना देणारी आहे. चार वर्षांच्या मुलींसोबत घडलेला प्रकार वेदनादायी आहे. मी याबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. माझ्यासोबत असलेले किसन कथोरे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यात होते. याप्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई घडल्याचे सांगितले जाते. 

पण जेव्हा लहान मुलीची आई तिला पोलीस ठाण्यात घेऊन आली तेव्हा तिला वैद्यकीय चाचणीला पाठवण्यात आले. तिथे चेकअपसाठी किमान तीन-चार तास लागतात. त्यानंतर चिमुरडीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ज्या मुलीला अजून शरीराची ओळख नाही, तिच्याकडून वदवून घेणं, तिच्यासोबत नक्की काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी वेळ लागला. मुलींच्या स्टेटमेंटशिवाय गोष्टी पुढे सरकू शकत नव्हत्या. मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर सरकारने शक्य त्या सर्व गोष्टी केल्या, असा दावा चित्रा वाघ यांनी केला.

आणखी वाचा

चिमुकल्या लेकींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे येईना, कल्याण कोर्टात काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd ODI LIVE Score : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
IND vs SA LIVE : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Jay Pawar Rutuja Patil wedding: जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd ODI LIVE Score : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
IND vs SA LIVE : विराट-रोहित किती वाजता अ‍ॅक्शनमध्ये दिसणार ते दुसरा सामना मोफत कसा पाहायचा? जाणून घ्या सर्वकाही....
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Jay Pawar Rutuja Patil wedding: जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
पलाश मुच्छलला कथित लफड्यांमुळे आलिया भोगासी असावे सादर? आता नेमका गेला कुठं? त्याला वाटतं 18 नंबर जर्सीचे संकट तिथं सुटेल!
पलाश मुच्छलला कथित लफड्यांमुळे आलिया भोगासी असावे सादर? आता नेमका गेला कुठं? त्याला वाटतं 18 नंबर जर्सीचे संकट तिथं सुटेल!
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Maharashtra Nagarparishad: मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
मतदारराजाचा कौल मतपेटीत कैद; राज्यभरातली नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची अंतिम टक्केवारी किती? वाचा सविस्तर
Embed widget