एक्स्प्लोर

'ही' एक चूक कराल तर होऊ शकतो मोठा तोटा, पोस्ट ऑफिसच्या योजनांचा लाभ घेता येणार नाही!

पोस्ट ऑफिसच्या योजना घेण्यासाठी पॅनवरील माहिती ही योग्य आणि बरोबर असणे गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला या योजनांचा लाभ घेता येणार नाही.

मुंबई : तुमच्याकडच्या पैशांची गुंतवणूक करून कोणताही धोका न पत्करता तुम्हाला चांगले रिटर्न्स देणाऱ्या अनेक योजना आहेत. यातही पैसे बुडू नयेत म्हणून गुंतवणूकदार सरकारी योजनांनाच प्राधान्य देतात. दरम्यान, पोस्ट ऑफिसच्याही अशा अनेक योजना आहेत, ज्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात.  मात्र अशा प्रकारच्या सर्वच योजनांसाठी काही समान नियम असतात. पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनांसाठी असाच एक नियम आहे. या नियमाअंतर्गत घालून देण्यात आलेल्या अटी पूर्ण न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. 

पोस्ट ऑफिसच्या योजनांसाठी आधार, पॅनची माहिती देणे अनिवार्य

पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पॅनकार्ड आणि आधार कार्डची माहिती देणे अनिवार्य असते. पोस्ट ऑफिसने 7 मे रोजी एक सूचना जारी केली होती. या सूचनेनुसार पॅन व्हेरिफिकेशनशी संबंधित Protean सिस्टिमला 1 मे, 2024 रोजी अपडेट करण्यात आले आहे. या सिस्टिमध्ये काही दुरुस्ती करण्यात आली आहे. आता पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्याआधी पोस्ट ऑफिस विभाग तुम्ही दिलेल्या पॅन क्रमांकाची माहिती प्राप्तिकर विभागाला विचारणार आहे. तुम्ही दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून घेतली जाणार आहे. तुमचे पॅन कार्ड हे आधार कार्डशी संलग्न आहे की नाही हे तपासणे हाच यामागचा प्रमुख उद्देश आहे.  

पॅनवरील माहिती चुकीची असल्यास येणार अडचण

पोस्ट ऑफिस विभाग प्राप्तिकर विभागाशी संपर्क करून तुम्ही दिलेल्या पॅन कार्डची चौकशी करणार आहे. तुमच्या पॅनकार्डवर नमूद असलेल्या माहितीनुसार तुम्ही जन्मदिन तसेच नावाची माहिती बरोबर न दिल्यास तुम्हाला पोस्टाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.  छोट्या बचत योजनांत गुंतवणूक करायची असेल तर आधार कार्ड आणि पॅनकार्ड अनिवार्य 

सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही

PPF, NSC किंवा अन्य छोट्या बचत योजनांत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कागदपत्रे एकमेकांशी लिंक झालेली असायला हवीत. पॅनकार्ड हे आधार कार्डशी लिंक नसल्यावर तुम्हाला या योजनांचा फायदा घेता येणार नाही. 

पॅन आधार लिंक नसल्यास काय तोटा होणार? 

पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक नसतील तर तुम्हाला अनेक तोटे हेऊ शकतात. तुम्हाला शासकीय योजनांचा फायदा घेता येणार नाही. तसेच विमान, म्यूच्यूअल फंड किंवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला तुमचा टीडीएसदेखील तुमच्या बँक खात्यावर जमा करायला अडचणी येऊ शकतात. 

हेही वाचा :

चला चला घाई करा! 'या' चार बँका एफडीवर देतायत भरघोस व्याज, मालामाल होण्याची नामी संधी!

बिझनेसमध्येही विराट-अनुष्क सुस्साट! 4 वर्षांपूर्वी गुंतवले अडीच कोटी, आता मिळवणार थेट तिप्पट रिटर्न्स

आयटीआर भरण्यासाठी फॉर्म 16 हवाय? चिंता सोडा 'असा' करा डाऊनलोड!

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget